शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालयावर जप्तीचे संकट

By admin | Updated: December 4, 2014 23:05 IST

२००३-०४ मध्ये जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे गणवेश शिलाईचे कंत्राट चार बचत गटांना देण्यात आले. मात्र आजपर्यंत या कंत्राटाचे पूर्ण देयक अदा करण्यात आले नाही.

न्यायालयाचे आदेश : गणवेश शिलाईची बचतगटांची रक्कम थकीतचंद्रपूर : २००३-०४ मध्ये जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे गणवेश शिलाईचे कंत्राट चार बचत गटांना देण्यात आले. मात्र आजपर्यंत या कंत्राटाचे पूर्ण देयक अदा करण्यात आले नाही. त्यामुळे बचत गटांनी न्यायालयात धाव घेतली. ६ डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषदेने थकित असलेले तीन लाख रुपये भरावे, असा आदेश न्यायालयाने दिला असून थकित रक्कम भरली नाही तर जिल्हा परिषदेवर जप्तीची कारवाई केली जाण्याची दाट शक्यता आहे. २००३-०४ मध्ये शासनाने जिल्हा परिषदेला शालेय गणवेश व लेखन साहित्य योजनेंतर्गत ५५ लाख ९८ हजार रुपयांचा निधी दिला. या योजनेतून २० टक्के रक्कम लेखण साहित्यासाठी तर उर्वरित ८० टक्के रक्कम शालेय गणवेशासाठी खर्च करायची होती. सुमारे १२ लाखांचा निधी लेखन साहित्यांवर खर्च करण्यात आला. उर्वरित निधीत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश द्यायचा होता. जिल्हा परिषद प्रशासनाने शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेत कापड खरेदी केली. सोबतच गणवेश शिलाईसाठी रमाबाई महिला बचत गट, पडोली, प्रेरणा महिला बचत गट, घोडपेठ, सावित्रीबाई महिला बचत गट तळोधी बा. व रागिनी महिला बचत गट पळसगाव (खुर्द) यांना कंत्राट दिले. या कामासाठी बचत गटांना ९ लाख १२ हजार ९६८ रुपये देण्याचे ठरविण्यात आले. मात्र कापड खरेदी केल्यानंतर शालेय गणवेश व लेखन साहित्य योजनेच्या नावाखाली शासनाकडून आलेल्या ५५ लाख ९८ हजारांच्या निधीमधून जिल्हा परिषदेकडे केवळ सहा लाख ३१ हजार ३४७ रुपयेच शिल्लक होते. चार बचत गटांनी गणवेशची शिलाई करून गणवेश जिल्हा परिषदेला सुपूर्द केले व आपली रक्कम अदा करण्याची मागणी केली. जिल्हा परिषदेने सहा लाख ३१ हजार ३४७ रुपयेच जवळ असल्याने ते बचत गटांना दिले. उर्वरित दोन लाख २८ हजार रुपयांची रक्कम मिळण्यासाठी बचत गटांच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार जिल्हा परिषदेकडे तगादा लावला. परंतु २००७ पर्यंत ही रक्कम बचत गटांना मिळाली नाही. त्यानंतर बचत गटांनी चंद्रपूरच्या न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, न्यायालयाने मागील वर्षी एक आदेश देत जिल्हा परिषदेने बचत गटांना थकित असलेली रक्कम द्यावे, असे सूचविले होते. परंतु न्यायालयाच्या आदेशानंतरही बचत गटांना ही रक्क़म मिळाली नसल्याने पुन्हा बचत गटांनी न्यायालयात धाव घेतली व रक्कम मिळण्यासाठी विनंती केली. यावर न्यायालयाने ३ डिसेंबर रोजी जप्तीचे आदेश काढले असून ६ डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषदेने बचत गटांना थकित असलेले रक्कम अदा करावी, असे निर्देश दिले आहे. रक्कत अदा झाली नाही तर जि.प.वर जप्तीची नामुष्की ओढवू शकते. (शहर प्रतिनिधी)