शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय प्रबोधनात्मक कीर्तनाने सर्वधर्म परिषदेचा समारोप

By admin | Updated: February 19, 2017 00:39 IST

मानवता धर्म मेरा, इंसान ही पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना ही धर्म मेरा हा मंत्र मानवतेचे पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिला.

निळकंठराव हळदे महाराज : मानवता हाच खरा धर्मघुग्घुस : मानवता धर्म मेरा, इंसान ही पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना ही धर्म मेरा हा मंत्र मानवतेचे पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिला. हा मंत्र अंगी बाळगावा, असे प्रतिपादन गुरूकुंज मोझरीचे निळकंठराव हळदे महाराज यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यस्मरण व संताच्या स्मृती प्रित्यार्थ आयोजित सर्वधर्म परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सर्वधर्म परिषदेचे उद्घाटनाप्रसंगी घुग्घुस येथील सीएनए चर्चचे जान जार्ज, धम्मचारी बौद्ध प्रतिनिधी मनोहर कवाडे, इस्लाम धर्माचे सामिउल्ला खान, गुरुद्वारा कमेटीचे समनसिंग आदी उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्धवराव गाडेकर महाराज होते.यावेळी गुरूकुंज मोझरीचे निळकंठराव हळदे महाराज म्हणाले, घुग्घुस येथे मागील १२ वर्षांपासून धर्म परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. अशा परिषदेची आज गरज आहे. असे ते म्हणाले. दोन दिवसीय कार्यक्रमात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर महिला मेळाव्याचे उद्घाटन इंदिरा ग्रामीण विद्यालय पडोलीच्या मुख्याध्यापिका संध्या गोहोकार यांचे हस्ते करण्यात आले. तर विशेष अतिथी म्हणून चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष प्रतिभा जीवतोडे उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून अमरावती टाकडखेडच्या पौर्णिमा सवाई तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रियदर्शनी कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य स्मिता ठाकरे, सरपंचा पुष्पा मेश्राम, माजी पं.स. सदस्या नवले उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिलांना प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी रक्तदान शिबिर, स्वरबंध, भजनसंध्या व उद्धव गाडेकर महाराजाचे राष्ट्रीय प्रबोधनात्मक जाहीर किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवंदनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी मंचावरील सर्व धर्मियांच्या मान्यवरांनी आपल्या धर्माबद्दल विस्तृत माहिती देवून मानवता प्रेम बंधू भावना अंगी बाळगण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन रमाकांत मांढरे तर आभार प्रा. चंद्रशेखर बोबडे यांनी केले. या कार्यक्रमात सर्वधर्मियांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मंडळाचे अध्यक्ष प्रेमलाल पारधी, जयंत जोगी, शामराव बोबडे, सुरेश ठवस, नथ्थू बल्की, गोपाळ शिरपूरकर, रमाकांत मांढरे, इबादुल सिद्धीकी, राजेंद्र घोटकर, आदींनी अथक परिश्रम घेतले. (वार्ताहर)