शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

पोलीस भरती प्रशिक्षण राबवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:30 IST

कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची करावी चंद्रपूर : शहरातील काही प्रभागांत रस्त्यावरच कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. महापालिकेने कचराकुंड्यांची संख्या वाढविली; ...

कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची करावी

चंद्रपूर : शहरातील काही प्रभागांत रस्त्यावरच कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. महापालिकेने कचराकुंड्यांची संख्या वाढविली; परंतु नागरिक रस्त्यावरच कचरा टाकतात. त्यामुळे याकडे लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे आहे. चंद्रपूर शहर स्वच्छतेमध्ये राज्यात गौरविण्यात आले होते; परंतु काही जणांच्या रस्त्यावर कचरा टाकण्यामुळे गालबोट लागत आहे.

निराधार योजनेचे अनुदान थकीत

चंद्रपूर : जिल्ह्यातील काही गावांत श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे अनुदान थकीत आहे. परिणामी, लाभार्थ्यांना अडचण जात आहे. कोरोनामुळे संकटानंतर आता लाभार्थ्यांना आर्थिक कोंडी होत आहे. लाभार्थी बँकेत दररोज पैशासाठी चक्करा मारत आहेत. मात्र, पैसे आले नसल्याने त्यांना गेल्यापावली परत जावे लागते. लॅाकडाऊनमुळे अनेक जण आर्थिक अडचणीत आहेत.

सिग्नल सुरू करण्याची मागणी

चंद्रपूर : येथील वरोरा नाका चौकामध्ये अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी नव्याने उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे या चौकाला विशेष महत्त्व आले आहे. मात्र, येथून भरधाव वेगाने वाहन नेणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे प्रशासनाने येथे सिग्नल सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, येथे दोन दिवसांपूर्वीच कंटेनर पलटी झाला होता.

हातपंप दुरुस्तीकडे लक्ष द्यावे

चंद्रपूर : जिवती, गोंडपिपरी तालुक्यातील अनेक गावांचे हातपंप नादुरुस्त आहेत. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. संबंधित विभागाकडे लक्ष देऊन हातपंप दुरुस्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

चिखलाच्या रस्त्यातून शेतकऱ्यांचा प्रवास

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यातच जिल्ह्यातील बहुतांश पांदण रस्त्यांचे खडीकरण करण्यात आले नसल्याने शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गुडघाभर चिखलातून वाट शोधावी लागत आहे. दुसरीकडे शेतीसाठी लागणारे साहित्य नेतानाही मोठी कसरत करावी लागत आहे.