शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

सवलतीची वीज बंद; उद्योगवाढीला ब्रेक, नोकऱ्या कशा मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वेकोलिकडून बऱ्यापैकी रोजगार मिळत होता. परंतु आज तशी परिस्थिती राहिली नाही. कोळसा खाणीचे खासगीकरण झाल्याने रोजगारावर मर्यादा आल्या. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील उद्योगही सुस्थितीत नाहीत. एमआयडीसीमध्ये अधिग्रहीत केलेले बरेच भूखंड रिकामे आहेत. उद्योगवाढीसाठी  पायाभूत सुविधा नसल्यास कोणताही रोजगार टिकणार नाही. राज्य शासनाने लघू मध्यम व सूक्ष्म उद्योगांसाठी वीजमाफीची योजना तयार केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : उद्योग प्रधान म्हणून ओळखणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाकाळापासून उद्योगांची स्थिती अजूनही १०० टक्के रुळावर आली नाही. लघू व सूक्ष्म उद्योगांची स्थिती आहे. अशातच वीज सवलतीची योजना बंद करण्याचा  निर्णय राज्य शासनाने घेतल्याने उद्योगवाढ आणि नोकऱ्यांचे काय होणार, अशा प्रश्न निर्माण झाला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वेकोलिकडून बऱ्यापैकी रोजगार मिळत होता. परंतु आज तशी परिस्थिती राहिली नाही. कोळसा खाणीचे खासगीकरण झाल्याने रोजगारावर मर्यादा आल्या. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील उद्योगही सुस्थितीत नाहीत. एमआयडीसीमध्ये अधिग्रहीत केलेले बरेच भूखंड रिकामे आहेत. उद्योगवाढीसाठी  पायाभूत सुविधा नसल्यास कोणताही रोजगार टिकणार नाही. राज्य शासनाने लघू मध्यम व सूक्ष्म उद्योगांसाठी वीजमाफीची योजना तयार केली होती. त्या अंतर्गत ७.५ टक्के ईलेक्ट्रिसिटी ड्यूटी आणि प्रति युनिट ८५ पैसे सवलतीच्या दोन सबसिडी मिळत होत्या. त्या आता बंद होणार आहे.

काय दिली जात होती सवलत ? उद्योगांना चालणा देण्यासाठी यापूर्वी राज्य शासनाकडून ७.५ टक्के इलेक्ट्रिसिटी ड्यूटी सवलत मिळत होती.उत्पादनाचा खर्च कमी व्हावा, यासाठी प्रति युनिट ८.५ सवलतीचे दोन अनुदान उद्योगांना मिळत होते.  

 उद्योग वाढविणार की घटविणार? 

चंद्रपूर : एमआयडीसी वसाहतीत अनेक भूखंड रिकामे आहेत.  सुरू असलेले कसेबसे तग धरून आहेत. मात्र, वाढता विजेचा खर्च कसा कमी करावा, हा प्रश्न उद्योगांपुढे आहे.

भद्रावती : तालुक्यात लघू व सूक्ष्म उद्योगांची संख्या बरीच आहेत. कोरोनापासून हे उद्योग आता सावरू लागले. अशा स्थितीत यापूर्वीची वीज सवलत कायम राहिल्यास उद्योगांना चालना मिळू शकते.

बल्लारपूर : तालुक्यात सूक्ष्म व मध्यम लघू उद्योग आहेत. काही वर्षांपासून कृषी प्रक्रियेवर आधारित सूक्ष्म प्रकल्प काहींनी सुरू केले. बँकेकडून भांडवल व वीज सवलत मिळत असल्याने अडचणी वाढल्या.

ब्रह्मपुरी : नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात पिकविला जातो. मागील काही वर्षांपासून धानाच्या दरात वाढ झाली नाही. त्यामुळे शेतीशी निगडित मूल्यवर्धन प्रकल्प सुरू करण्याची काहींची तयारी आहे. अशावेळी शासनाने वीज सवलत दिल्यास नवीन व्यावसायिकांचा आत्मविश्वास  वाढेल.

उद्योगवाढीला बसणार खीळ

उद्योगांना संकटातून बाहेर काढायचे असेल तर शासनाकडून मदतीची गरज आहे. चंदपूर जिल्ह्यात विजेचे उत्पादन सर्वाधिक होते. परंतु जिल्ह्यातील उद्योगांना स्वस्त दरात वीज मिळत नाही - मधुसूदन रुगंठा, अध्यक्ष, एमआयडीसी, चंद्रपूर

जिल्ह्यामध्ये कृषीवर आधारित मोठा प्रकल्प उद्योग नाही. शेतकऱ्यांचे गट तयार करून छोटे प्रयोग सुरू आहेत. अशावेळी शासनाने वीज सवलतीसाठी झुकते माफ दिल्यास चालना मिळेल.- शदर चाैधरी, व्यवसायिक,चंद्रपूर  

 

 

टॅग्स :jobनोकरीUnemploymentबेरोजगारी