शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

टेंभुर्डा उपसा जलसिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करा

By admin | Updated: May 19, 2016 00:44 IST

टेंभुर्डा उपसा जलसिंचन प्रकल्पाची प्रस्तावित कामे मार्च २०१७ पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी टेंभुर्डा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दिले.

मुख्यमंत्र्यांचे निर्देश : चंद्रपूर जिल्ह्यातील समस्यांवर मुंबईत बैठकचंद्रपूर : टेंभुर्डा उपसा जलसिंचन प्रकल्पाची प्रस्तावित कामे मार्च २०१७ पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी टेंभुर्डा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दिले.टेंभुर्डा उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मुबंईच्या सह्याद्री अतिथिगृह येथे बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विकास कामासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठक घेतली. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विकास कामासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठक घेतली. बैठकीला केंद्रीय रसायने व खत राज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार राजू तोडसाम, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, वरोराचे उपविभागीय अधिकारी लोंढे, जिल्हा खनिकर्म अधिकारी आवाडे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या प्रकल्पावर आतापर्यंत १९३५.५५ कोटी रुपये एवढा खर्च झाला असून सन २०१६-१७ साठी ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्य कालव्याची ६५ किमी लांबी पूर्ण करण्यासाठी नियोजन झालेले आहे. उर्वरित कामे मार्गी लावण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्तांच्या जादा मोबदल्यासंदर्भात शासन सकारात्मकचंद्रपूर : जिल्ह्यात असलेल्या वर्धा नदीवरील दिंडोरा बॅरेज प्रकल्पाच्या संपादित जमिनीसाठी देण्यात आलेल्या मोबदल्यामध्ये वाढ करण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत सांगितले. दिंडोरा बॅरेजसाठी संपादित केलेल्या शेतजमिनीचा शेतकऱ्यांना अल्प मोबदला देण्यात आला आहे. हा मोबदला वाढवून मिळावा, अशी मागणी ना. अहीर यांनी केली. या प्रकल्पासाठी एकूण १४०० हेक्टर जमिनीपैकी ११०० हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली असून त्याचा मोबदला देण्यात आला आहे. आणखी ३०० हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही. जमीन अधिग्रहित केलेल्या शेतकऱ्यांना जास्त मोबदला मिळावा, अशी शासनाची भूमिका आहे. या प्रकल्पाचा लाभ उद्योगांना होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पातील शेतकऱ्यांना उद्योग विभागामार्फत जास्त मोबदला देता येईल का याचा शासन विचार करेल, असे सांगितले.