शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
4
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
5
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
6
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
7
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
8
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
10
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
11
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
12
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
13
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
14
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
15
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
16
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
17
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
18
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
19
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
20
ओठ फुटलेत-कोरडे झालेत? मॉइश्चरायझर म्हणून लिप बाम चांगला की ऑइल बाम, ‘असं’ ठरवा..

टेंभुर्डा उपसा जलसिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करा

By admin | Updated: May 19, 2016 00:44 IST

टेंभुर्डा उपसा जलसिंचन प्रकल्पाची प्रस्तावित कामे मार्च २०१७ पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी टेंभुर्डा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दिले.

मुख्यमंत्र्यांचे निर्देश : चंद्रपूर जिल्ह्यातील समस्यांवर मुंबईत बैठकचंद्रपूर : टेंभुर्डा उपसा जलसिंचन प्रकल्पाची प्रस्तावित कामे मार्च २०१७ पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी टेंभुर्डा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दिले.टेंभुर्डा उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मुबंईच्या सह्याद्री अतिथिगृह येथे बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विकास कामासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठक घेतली. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विकास कामासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठक घेतली. बैठकीला केंद्रीय रसायने व खत राज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार राजू तोडसाम, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, वरोराचे उपविभागीय अधिकारी लोंढे, जिल्हा खनिकर्म अधिकारी आवाडे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या प्रकल्पावर आतापर्यंत १९३५.५५ कोटी रुपये एवढा खर्च झाला असून सन २०१६-१७ साठी ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्य कालव्याची ६५ किमी लांबी पूर्ण करण्यासाठी नियोजन झालेले आहे. उर्वरित कामे मार्गी लावण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्तांच्या जादा मोबदल्यासंदर्भात शासन सकारात्मकचंद्रपूर : जिल्ह्यात असलेल्या वर्धा नदीवरील दिंडोरा बॅरेज प्रकल्पाच्या संपादित जमिनीसाठी देण्यात आलेल्या मोबदल्यामध्ये वाढ करण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत सांगितले. दिंडोरा बॅरेजसाठी संपादित केलेल्या शेतजमिनीचा शेतकऱ्यांना अल्प मोबदला देण्यात आला आहे. हा मोबदला वाढवून मिळावा, अशी मागणी ना. अहीर यांनी केली. या प्रकल्पासाठी एकूण १४०० हेक्टर जमिनीपैकी ११०० हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली असून त्याचा मोबदला देण्यात आला आहे. आणखी ३०० हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही. जमीन अधिग्रहित केलेल्या शेतकऱ्यांना जास्त मोबदला मिळावा, अशी शासनाची भूमिका आहे. या प्रकल्पाचा लाभ उद्योगांना होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पातील शेतकऱ्यांना उद्योग विभागामार्फत जास्त मोबदला देता येईल का याचा शासन विचार करेल, असे सांगितले.