शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

जन-वन विकास योजनेतून ताडोबात २९ कोटींची कामे पूर्ण

By admin | Updated: September 20, 2016 00:40 IST

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना ताडोबाच्या बफर क्षेत्रातील गावांसाठी विकासाला चालना देणारी ठरली आहे.

३८ हजार ४७४ कामे पूर्ण : ताडोबाचे बफर क्षेत्र विकासाकडेचंद्रपूर : डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना ताडोबाच्या बफर क्षेत्रातील गावांसाठी विकासाला चालना देणारी ठरली आहे. या योजनेसह वन विभागाच्या विविध योजनेंतर्गत या गावांमध्ये तब्बल ३८ हजार ४७४ कामे करण्यात आली आहेत. यावर २९ कोटी सात लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. यातून पायाभूत विकासासह अत्यावश्यक गरजांची अनेक कामे पूर्ण झाल्याने ही योजना गावकऱ्यांना मोठा दिलासा देणारी ठरली आहे. वन विभागाच्यावतीने ताडोबा बफर क्षेत्राच्या विकासाठी विविध प्रकारच्या योजना, उपक्रम राबविले जात आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने या योजना राबविल्या जातात. विभागाच्या विविध योजनांसह नव्याने सुरू झालेल्या डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेंतर्गतही अनेक कामे हाती घेण्यात आली आहे. त्यातून बफर क्षेत्रात सध्या विकासाची हजारो कामे होत आहेत. गावांच्या गरजा लक्षात घेता कामे हाती घेण्यात येत असल्याने बफरमधील गावे स्वयंपूर्णतेकडे जात आहे. ७२ प्रकारची विविध कामे या क्षेत्रात घेतली जात आहेत. आतापर्यंत करण्यात आलेल्या विविध कामांमध्ये ई-लर्निंग सुविधेची १०१ कामे, सहा हजार ५६४ पाणी फिल्टर यंत्रांचा पुरवठा, ४२९ दुधाळू जनावरांचे वाटप, १९ हजार ६१९ एलपीजी गॅसचा पुरवठा, दोन हजार २६६ शौचालयांचे बांधकाम, ४३६ विहीरींच्या कठड्यांचे बांधकाम अशा मुलभूत बाबींचा समावेश आहे.आतापर्यंत पूर्ण झालेल्या कामांमध्ये जन-वन योजनेतून १९ हजार ४७७ तर इतर योजनेतून १८ हजार ९९७ अशा एकूण ३८ हजार ४७४ कामांचा समावेश आहे. ताडोबाच्या बफर जंगलासह वाघ व अन्य प्राण्यांचे रक्षण करून ताडोबाला आंतरराष्ट्रीय दजार्चा व्याघ्र प्रकल्प म्हणून विकसित करण्यासाठी बझर क्षेत्रातील गावांचा मोठा हातभार लागला आहे. त्यामुळे ही गावे विकासाच्या बाबतीत मागे राहू नये म्हणून जन-वन विकास योजना राबविली जात आहे. जन-वन व विभागाच्या इतर योजनेतून बफर क्षेत्रातील या गावांवर २९ कोटी सात लाख रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)विविध कामे पूर्णत्वासचार हजार ८८ गॅस ओट्यांचे बांधकाम, एक हजार ९८३ दगडी बंधारे, आठ मृद संधारणाची कामे, १९ सिमेंट बंधारे, १४२ तलावांचे खोलीकरण, ३६ बोअरवेल, पाच विहीरींचे बांधकाम, ३९ सोलर पंप, सात अगरबत्ती प्रकल्प, तीन चरखा उद्योग, २४ गाई गोठ्यांचे बांधकाम, ४६ स्मार्ट अंगणवाडी, ८५ हेक्टरवर दोन रोपवनांची निर्मीती, ४५० सोलर लाईट, ६९० सोलर कुंपन, १५ बांबू प्रकल्प प्रशिक्षण, ३६ पर्यटन जिप्सीसाठी अर्थसहाय्य यासह बोटींग प्रकल्प, जोडधंद्यासाठी मत्स्यव्यवसाय, दुधप्रकल्प, कुक्कुटपालन अशा कामांचा समावेश.