शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; २०२२ संपेपर्यंत झाले तरी मिळाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:23 IST

कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने २०० पेक्षा जास्त केंद्र सज्ज केली आहेत. पण जिल्ह्याला पुरेसा लससाठा मिळत नाही. त्यामुळे चंद्रपूर ...

कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने २०० पेक्षा जास्त केंद्र सज्ज केली आहेत. पण जिल्ह्याला पुरेसा लससाठा मिळत नाही. त्यामुळे चंद्रपूर महानगर पालिका आणि जिल्ह्यातील ७० पेक्षा जास्त केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. आता दुसरा डोस घेणाऱ्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना डोस देणे सुरू आहे. परंतु लस घेणाऱ्या प्राधान्य गटाच्या संख्येच्या तुलनेत डोस मिळत नाही. परिणामी चार दिवस लसीकरण सुरू ठेवल्यानंतर पाचव्या दिवशी केंद्र बंद करण्याची वेळ जिल्हा आरोग्य यंत्रणेवर येत आहे. बरेच आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स अद्याप दुसरा डोस घेऊ शकले नाही. लस घेतल्याने कोरोना झाल्यानंतर प्रकृतीत समस्या निर्माण होत नाही, अशा बऱ्याच घटना उघडकीस आल्या. त्यामुळे लस घेण्यासाठी केंद्रासमोर नागरिक गर्दी करीत आहेत. पण डिसेंबरपर्यंत उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे.

३ लाख ५५ हजार ६१० जणांचे लसीकरण

चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील केंद्रात आतापर्यंत १८ ते ४४ पुढील वयोगट, सहव्याधी, ज्येष्ठ नागरिक असे मिळून ३ लाख ५५ हजार ६१० जणांनी लस घेतली. पुरेसे डोस मिळत नसल्याने केंद्र बंद राहतात. प्रत्येक केंद्राला १०० ते ८० डोस मिळत आहेत. त्यामुळे ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्यासाठी सकाळी आठ वाजतापासूनच केंद्रांवर रांगा लावाव्या लागतात.

१८ वर्षांवरील १० हजार ८७ जणांनी घेतला डोस

१ मे पासून १८ वर्षांवरील तरूणाईसाठी लसीकरण मोहीम सुरू झाली. पण सुरूवातीला एकाही केंद्रावर १०० पेक्षा जास्त डोस उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे युवक- युवतींचा हिरमोड झाला.

केंद्र सरकारने १८ वर्षे वयोगटातील लसीकरण लांबणीवर टाकले. जिल्ह्यात १८ वर्षांवरील १० हजार ८७ जणांनी पहिला डोस घेतला. आता या वयोगटाचे लसीकरण बंद आहे. डोस उपलब्ध नसताना केंद्र सरकारने घोषणा का केली, असा संतप्त सवाल युवक-युवती करीत आहेत.

१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींचा तर केंद्र सरकारने अद्याप विचारच केला नाही. त्यामुळे मुलांच्या आरोग्याबाबत पालक काळजीत आहेत.

आरोग्य विभागाकडून लस मिळाल्यानंतर सकाळी १० वाजता लसीकरणाला सुरूवात होते. नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी चंद्रपूर मनपाने कुपन पद्धत सुरू केली. केंद्रात जेवढा डोस आला तेवढेच कुपन आधी वितरण केले जातात. नागरिक पहिल्यांदा कुपनसाठी रांगा लावतात. बऱ्याचदा केंद्रात लस किती उपलब्ध आहे, हे आरोग्य पथकाकडून सांगितले जात नाही. त्यामुळे १०० लस उपलब्ध असताना २०० ते २५० नागरिक केवळ कुपनसाठी रांगेत लागतात. हा प्रकार टाळण्यासाठी आधी डोस किती आहेत, हे जाहीर करण्याची सूचना नागरिकांनी केली आहे.

लसीकरणासाठी २५० केंद्र

लस देण्यासाठी जिल्ह्यात २५० पेक्षा जास्त केंद्र सज्ज आहेत. चंद्रपूर मनपा क्षेत्रातही नवीन केंद्र तयार करून ठेवले. सुरूवातील सर्व केंद्रांवर लसीकरण केल्या जात होते. मात्र, लसीचा तुटवडा सुरू झाल्यानंतर दररोज सुमारे १०० केंद्रांवरूनच लस दिली जात आहे.