शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:20 IST

वनविभागाने ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून चंद्रपूर जिल्ह्याचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून यावर्षीच्या ३३ कोटी वृक्ष लागवड अभियाना- संदर्भात जिल्ह्याचा विभागनिहाय आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक पार पडली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : शिल्लक लक्ष्यांक २५ पर्यंत सादर करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वनविभागाने ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून चंद्रपूर जिल्ह्याचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून यावर्षीच्या ३३ कोटी वृक्ष लागवड अभियाना- संदर्भात जिल्ह्याचा विभागनिहाय आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक पार पडली.महाराष्ट्र वन विभागाने ५० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष ठेवलेले होते. यामध्ये वर्ष २०१६मध्ये दोन कोटी वृक्ष लागवड तर २०१७ मध्ये चार कोटी वृक्ष लागवड करण्यात आले. तसेच २०१८ मध्ये १३ कोटी वृक्ष लागवड करण्यात आले. या वर्षीही वृक्षांची लागवड करण्याची मोहीम येत्या १ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. वनविभागाने यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट जुलै-आॅगस्ट आणि सप्टेंबर या ३ महिन्यांत साध्य करण्यासाठी जिल्हानिहाय उद्दिष्ट ठरवून दिले आहे.चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण १३ लक्ष ८७ हजार ८०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांना जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष्य वाटून दिलेले असून साध्य व शिल्लक उद्दिष्टांचा आढावा यावेळी जिल्हाधिकारी यांनी घेतला.शिल्लक लक्ष्यांक पूर्ण करून त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला २५ एप्रिलपर्यंत सादर करावी, अशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. सोबतच या बैठकीत कन्या वन समृद्धी योजनेचा आढावा घेण्यात आला. बैठकीला वनविभाग, महावितरण विभाग, आदिवासी विभाग आणि इतर विभागाचे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.संस्थांची घेणार दखलया ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शासकीय तथा खाजगी संस्थांची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दखल घेतल्या जाणार आहे. विशेष म्हणजे, जास्तीत जास्त संस्था संघटनांनी वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाºयांनी बैठकीप्रसंगी केले.

टॅग्स :forest departmentवनविभाग