शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जादुटोण्याची तक्रार दखलपात्र व अजामीनपात्र

By admin | Updated: September 27, 2014 01:26 IST

महाराष्ट्रात दरवर्षी जादुटोण्याच्या संशयावरुन अनेक लोकांचे बळी जातात. याची दखल घेऊन आणि अंधश्रद्धा निर्मूलन..

सिंदेवाही : महाराष्ट्रात दरवर्षी जादुटोण्याच्या संशयावरुन अनेक लोकांचे बळी जातात. याची दखल घेऊन आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या अथक परिश्रमातून महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३’ हा कायदा लागू करण्यात आला. त्यातही चंद्रपूर जिल्हा अंधश्रद्धाबाबात अतिशय संवेदनशील आहे. या जिल्ह्यात असे प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार करा, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हरिभाऊ पाथोडे यांनी केले आहे. या जिल्ह्यात दरवर्षी जादुटोणा, भूतकरणी, गुप्तधन या अंधश्रद्धापोटी बळी दिल्या जातो वा घेतल्या जातो. यावर्षी जुलै महिन्यात बल्लारपूर शहराजवळ बामणी गावात गुराख्याची जादुटोण्याच्या संशयापायी केलेली हत्या ताजी आहे. तरीही या घटनांची दखल घेवून चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३ हा कायदा लागू केला नाही, असे चित्र दिसत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात जादुटोण्याच्या तक्रारी येत आहेत. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३ कलम २ पोटकलम (१) (ख) नुसार अनुसूचीमधील सहा क्रमांकाच्या बाबीनुसार एखादी विशिष्ट व्यक्ती करणी करते, जादुटोणा करते किंवा भूत लावते, असे सांगून त्या व्यक्तीबाबत तसा संशय निर्माण करणे, त्रासदायक कृत्य करणे वा कठीण करणे हा अपराध दखलपात्र व अजामिनपात्र आहे. अशा गुन्ह्यांसाठी दोषी असलेली व्यक्ती, दोष सिद्ध झाल्यानंतर सात वर्षांपर्यंत फसू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि ५० हजार रुपयांपर्यंत असू शकेल एवढ्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र आहे. या अधिनियमानुसार तक्रार दाखल केल्या जात नाही. सर्व तक्रारी अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंदवून घेतात आणि न्यायालयात दाद मागण्याची समज देतात. (तालुका प्रतिनिधी)