शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
4
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
5
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
6
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
7
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
8
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
9
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
10
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
11
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
12
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
13
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
14
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
15
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
16
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
17
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
18
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

जादुटोण्याची तक्रार दखलपात्र व अजामीनपात्र

By admin | Updated: September 27, 2014 01:26 IST

महाराष्ट्रात दरवर्षी जादुटोण्याच्या संशयावरुन अनेक लोकांचे बळी जातात. याची दखल घेऊन आणि अंधश्रद्धा निर्मूलन..

सिंदेवाही : महाराष्ट्रात दरवर्षी जादुटोण्याच्या संशयावरुन अनेक लोकांचे बळी जातात. याची दखल घेऊन आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या अथक परिश्रमातून महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३’ हा कायदा लागू करण्यात आला. त्यातही चंद्रपूर जिल्हा अंधश्रद्धाबाबात अतिशय संवेदनशील आहे. या जिल्ह्यात असे प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार करा, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हरिभाऊ पाथोडे यांनी केले आहे. या जिल्ह्यात दरवर्षी जादुटोणा, भूतकरणी, गुप्तधन या अंधश्रद्धापोटी बळी दिल्या जातो वा घेतल्या जातो. यावर्षी जुलै महिन्यात बल्लारपूर शहराजवळ बामणी गावात गुराख्याची जादुटोण्याच्या संशयापायी केलेली हत्या ताजी आहे. तरीही या घटनांची दखल घेवून चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३ हा कायदा लागू केला नाही, असे चित्र दिसत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात जादुटोण्याच्या तक्रारी येत आहेत. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३ कलम २ पोटकलम (१) (ख) नुसार अनुसूचीमधील सहा क्रमांकाच्या बाबीनुसार एखादी विशिष्ट व्यक्ती करणी करते, जादुटोणा करते किंवा भूत लावते, असे सांगून त्या व्यक्तीबाबत तसा संशय निर्माण करणे, त्रासदायक कृत्य करणे वा कठीण करणे हा अपराध दखलपात्र व अजामिनपात्र आहे. अशा गुन्ह्यांसाठी दोषी असलेली व्यक्ती, दोष सिद्ध झाल्यानंतर सात वर्षांपर्यंत फसू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि ५० हजार रुपयांपर्यंत असू शकेल एवढ्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र आहे. या अधिनियमानुसार तक्रार दाखल केल्या जात नाही. सर्व तक्रारी अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंदवून घेतात आणि न्यायालयात दाद मागण्याची समज देतात. (तालुका प्रतिनिधी)