शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

जादुटोण्याची तक्रार दखलपात्र व अजामीनपात्र

By admin | Updated: September 27, 2014 01:26 IST

महाराष्ट्रात दरवर्षी जादुटोण्याच्या संशयावरुन अनेक लोकांचे बळी जातात. याची दखल घेऊन आणि अंधश्रद्धा निर्मूलन..

सिंदेवाही : महाराष्ट्रात दरवर्षी जादुटोण्याच्या संशयावरुन अनेक लोकांचे बळी जातात. याची दखल घेऊन आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या अथक परिश्रमातून महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३’ हा कायदा लागू करण्यात आला. त्यातही चंद्रपूर जिल्हा अंधश्रद्धाबाबात अतिशय संवेदनशील आहे. या जिल्ह्यात असे प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार करा, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हरिभाऊ पाथोडे यांनी केले आहे. या जिल्ह्यात दरवर्षी जादुटोणा, भूतकरणी, गुप्तधन या अंधश्रद्धापोटी बळी दिल्या जातो वा घेतल्या जातो. यावर्षी जुलै महिन्यात बल्लारपूर शहराजवळ बामणी गावात गुराख्याची जादुटोण्याच्या संशयापायी केलेली हत्या ताजी आहे. तरीही या घटनांची दखल घेवून चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३ हा कायदा लागू केला नाही, असे चित्र दिसत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात जादुटोण्याच्या तक्रारी येत आहेत. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३ कलम २ पोटकलम (१) (ख) नुसार अनुसूचीमधील सहा क्रमांकाच्या बाबीनुसार एखादी विशिष्ट व्यक्ती करणी करते, जादुटोणा करते किंवा भूत लावते, असे सांगून त्या व्यक्तीबाबत तसा संशय निर्माण करणे, त्रासदायक कृत्य करणे वा कठीण करणे हा अपराध दखलपात्र व अजामिनपात्र आहे. अशा गुन्ह्यांसाठी दोषी असलेली व्यक्ती, दोष सिद्ध झाल्यानंतर सात वर्षांपर्यंत फसू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि ५० हजार रुपयांपर्यंत असू शकेल एवढ्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र आहे. या अधिनियमानुसार तक्रार दाखल केल्या जात नाही. सर्व तक्रारी अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंदवून घेतात आणि न्यायालयात दाद मागण्याची समज देतात. (तालुका प्रतिनिधी)