शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

शेतकरी आत्महत्यांबाबत रामनगर ठाण्यात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 00:02 IST

शासन शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे. शेतकरीविरोधी धोरणे घेऊन एक प्रकारे शेतकºयांचा खूनच करीत आहे.

ठळक मुद्देशासन शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: शासन शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे. शेतकरीविरोधी धोरणे घेऊन एक प्रकारे शेतकºयांचा खूनच करीत आहे. या गुन्ह्यासाठी सरकारवर खटले दाखल करण्यात यावे, या आशयाची तक्रार शेतकरी संघटनांची सुकाणू समिती व किसान क्रांतीच्या वतीने आज शुक्रवारी रामनगर ठाण्यात केली.सरकारने सातत्याने शेतकरीविरोधी धोरणे घेतली आहेत. सरकारच्या या धोरणांमुळे शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. शेतकºयांच्या सरकारने केलेल्या या हत्याच आहेत. चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर शेतकºयांनी आंदोलन करीत सरकारकडे कर्जमुक्तीची मागणी केली. सरकारला आंदोलनामुळे कर्जमुक्तीची घोषणा करावी लागली. पण कर्जमुक्त करताना मात्र सरकारने आपले आश्वासन व शब्द न पाळता अनेक अटी लावत शेतकºयांची घोर फसवणूक केली आहे.सरकारने कर्जमाफीसाठी जाणीवपूर्वक आॅनलाईनचा व अटीशर्तीचा गोंधळ घातला आहे. लाखो शेतकरी या गोंधळामुळे कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे. केवळ निम्म्याच शेतकºयांना कर्जमाफीसाठी अर्ज भरता आले व उर्वरित तब्बल ३१ लाख शेतकरी कर्जमाफीचे साधे अर्जसुद्धा भरु शकले नाही. अर्ज भरलेल्या ५८ लाख शेतकºयांपैकी जे शेतकरी सरकारच्या अटीमध्ये बसतील, त्यांनाच केवळ कर्जमाफीचा लाभ होणार आहे. परिणामी अत्यंत थोड्या शेतकºयांना कर्जमाफी मिळणार असून बहुतांश शेतकरी कर्जमाफीतून वगळले जाणार आहे.शेतकरी संघटनाच्या सुकाणू समितीने सरकारच्या या ऐतिहासिक फसवणूकीचा बुरखा वारंवार फाडला आहे. जळगाव येथे झालेल्या राज्यव्यापी परिषदेतही सुकाणू समितीने सरकारची ही लबाडी लोकांच्या समोर उघड करुन याविरोधात रणशिंग फुंकण्याची हाक दिली आहे.दरम्यान, आज शुक्रवारी दुपारी २ वाजता सुकाणू समिती व किसान क्रांतीचे कार्यकर्ते जटपुरा गेट येथे जमा झाले. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविली. सरकावर फसवणुकीचा ४२०, शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडण्याचा ३०६ व शेतकºयांच्या हत्या केल्याप्रकरणी ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारीत केली. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख, प्रदीप बोबडे, बापुराव मडावी, गणेश झाडे, मारोती बुरवटकर, प्रकाश ताजने, ज्ञानेश आत्राम, महेश धोंगडे आदी उपस्थित होते.