शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतकरी आत्महत्यांबाबत रामनगर ठाण्यात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 00:02 IST

शासन शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे. शेतकरीविरोधी धोरणे घेऊन एक प्रकारे शेतकºयांचा खूनच करीत आहे.

ठळक मुद्देशासन शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: शासन शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे. शेतकरीविरोधी धोरणे घेऊन एक प्रकारे शेतकºयांचा खूनच करीत आहे. या गुन्ह्यासाठी सरकारवर खटले दाखल करण्यात यावे, या आशयाची तक्रार शेतकरी संघटनांची सुकाणू समिती व किसान क्रांतीच्या वतीने आज शुक्रवारी रामनगर ठाण्यात केली.सरकारने सातत्याने शेतकरीविरोधी धोरणे घेतली आहेत. सरकारच्या या धोरणांमुळे शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. शेतकºयांच्या सरकारने केलेल्या या हत्याच आहेत. चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर शेतकºयांनी आंदोलन करीत सरकारकडे कर्जमुक्तीची मागणी केली. सरकारला आंदोलनामुळे कर्जमुक्तीची घोषणा करावी लागली. पण कर्जमुक्त करताना मात्र सरकारने आपले आश्वासन व शब्द न पाळता अनेक अटी लावत शेतकºयांची घोर फसवणूक केली आहे.सरकारने कर्जमाफीसाठी जाणीवपूर्वक आॅनलाईनचा व अटीशर्तीचा गोंधळ घातला आहे. लाखो शेतकरी या गोंधळामुळे कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे. केवळ निम्म्याच शेतकºयांना कर्जमाफीसाठी अर्ज भरता आले व उर्वरित तब्बल ३१ लाख शेतकरी कर्जमाफीचे साधे अर्जसुद्धा भरु शकले नाही. अर्ज भरलेल्या ५८ लाख शेतकºयांपैकी जे शेतकरी सरकारच्या अटीमध्ये बसतील, त्यांनाच केवळ कर्जमाफीचा लाभ होणार आहे. परिणामी अत्यंत थोड्या शेतकºयांना कर्जमाफी मिळणार असून बहुतांश शेतकरी कर्जमाफीतून वगळले जाणार आहे.शेतकरी संघटनाच्या सुकाणू समितीने सरकारच्या या ऐतिहासिक फसवणूकीचा बुरखा वारंवार फाडला आहे. जळगाव येथे झालेल्या राज्यव्यापी परिषदेतही सुकाणू समितीने सरकारची ही लबाडी लोकांच्या समोर उघड करुन याविरोधात रणशिंग फुंकण्याची हाक दिली आहे.दरम्यान, आज शुक्रवारी दुपारी २ वाजता सुकाणू समिती व किसान क्रांतीचे कार्यकर्ते जटपुरा गेट येथे जमा झाले. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविली. सरकावर फसवणुकीचा ४२०, शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडण्याचा ३०६ व शेतकºयांच्या हत्या केल्याप्रकरणी ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारीत केली. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख, प्रदीप बोबडे, बापुराव मडावी, गणेश झाडे, मारोती बुरवटकर, प्रकाश ताजने, ज्ञानेश आत्राम, महेश धोंगडे आदी उपस्थित होते.