शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

शेतकरी आत्महत्यांबाबत रामनगर ठाण्यात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 00:02 IST

शासन शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे. शेतकरीविरोधी धोरणे घेऊन एक प्रकारे शेतकºयांचा खूनच करीत आहे.

ठळक मुद्देशासन शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: शासन शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे. शेतकरीविरोधी धोरणे घेऊन एक प्रकारे शेतकºयांचा खूनच करीत आहे. या गुन्ह्यासाठी सरकारवर खटले दाखल करण्यात यावे, या आशयाची तक्रार शेतकरी संघटनांची सुकाणू समिती व किसान क्रांतीच्या वतीने आज शुक्रवारी रामनगर ठाण्यात केली.सरकारने सातत्याने शेतकरीविरोधी धोरणे घेतली आहेत. सरकारच्या या धोरणांमुळे शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. शेतकºयांच्या सरकारने केलेल्या या हत्याच आहेत. चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर शेतकºयांनी आंदोलन करीत सरकारकडे कर्जमुक्तीची मागणी केली. सरकारला आंदोलनामुळे कर्जमुक्तीची घोषणा करावी लागली. पण कर्जमुक्त करताना मात्र सरकारने आपले आश्वासन व शब्द न पाळता अनेक अटी लावत शेतकºयांची घोर फसवणूक केली आहे.सरकारने कर्जमाफीसाठी जाणीवपूर्वक आॅनलाईनचा व अटीशर्तीचा गोंधळ घातला आहे. लाखो शेतकरी या गोंधळामुळे कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे. केवळ निम्म्याच शेतकºयांना कर्जमाफीसाठी अर्ज भरता आले व उर्वरित तब्बल ३१ लाख शेतकरी कर्जमाफीचे साधे अर्जसुद्धा भरु शकले नाही. अर्ज भरलेल्या ५८ लाख शेतकºयांपैकी जे शेतकरी सरकारच्या अटीमध्ये बसतील, त्यांनाच केवळ कर्जमाफीचा लाभ होणार आहे. परिणामी अत्यंत थोड्या शेतकºयांना कर्जमाफी मिळणार असून बहुतांश शेतकरी कर्जमाफीतून वगळले जाणार आहे.शेतकरी संघटनाच्या सुकाणू समितीने सरकारच्या या ऐतिहासिक फसवणूकीचा बुरखा वारंवार फाडला आहे. जळगाव येथे झालेल्या राज्यव्यापी परिषदेतही सुकाणू समितीने सरकारची ही लबाडी लोकांच्या समोर उघड करुन याविरोधात रणशिंग फुंकण्याची हाक दिली आहे.दरम्यान, आज शुक्रवारी दुपारी २ वाजता सुकाणू समिती व किसान क्रांतीचे कार्यकर्ते जटपुरा गेट येथे जमा झाले. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविली. सरकावर फसवणुकीचा ४२०, शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडण्याचा ३०६ व शेतकºयांच्या हत्या केल्याप्रकरणी ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारीत केली. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख, प्रदीप बोबडे, बापुराव मडावी, गणेश झाडे, मारोती बुरवटकर, प्रकाश ताजने, ज्ञानेश आत्राम, महेश धोंगडे आदी उपस्थित होते.