शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

जिल्ह्यातील ४५ शाळांवर संक्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 23:37 IST

जिल्हा परिषदेंतर्गत सुरू असलेल्या ज्या शाळांची पटसंख्या १० पेक्षा कमी आहे, अशा शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

ठळक मुद्दे१० पेक्षा कमी पटसंख्या : जि.प. शाळांमध्ये गुणवत्तेचा अभाव

परिमल डोहणे।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जिल्हा परिषदेंतर्गत सुरू असलेल्या ज्या शाळांची पटसंख्या १० पेक्षा कमी आहे, अशा शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील ४५ जि.प.शाळा बंद होणार आहेत. त्यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाकडून विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र कॉन्व्हेंटच्या वाढत्या संस्कृतीमुळे जि.प.च्या प्राथमिक शाळेतील पटसंख्या कमी होत असून कॉन्व्हेंटच्या पटसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दुसरीकडे जि.प. शाळेत कुठे एक तर कुठे दोन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येबाबत अहवाल मागितला होता. यावेळी दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर गुणवत्तेअभावी शाळेची पटसंख्या कमी आहे, असा ठपका ठेवत शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचे पत्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पाठविले आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेने या संदर्भात आता कार्यवाही सुरु केली आहे.शिक्षकांचे समायोजन होणारकमी पटसंख्या असलेल्या विद्यार्थी व शिक्षकांचे समायोजन एक किलोमीटरच्या आतील शाळेत करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने कार्यवाही सुरु केली असून विद्यार्थी व शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती आहे.विद्यार्थ्यांचे नुकसान होणारसमायोजन करुन विद्यार्थ्यांना दुसºया शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र सन २०१६-२०१७ चे शैक्षणिक सत्र अर्धे संपले आहे. आता शाळेत बदल होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वातावरणात बदल होणार असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याची प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त केली जात आहे.