शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जिल्ह्यातील ४५ शाळांवर संक्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 23:37 IST

जिल्हा परिषदेंतर्गत सुरू असलेल्या ज्या शाळांची पटसंख्या १० पेक्षा कमी आहे, अशा शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

ठळक मुद्दे१० पेक्षा कमी पटसंख्या : जि.प. शाळांमध्ये गुणवत्तेचा अभाव

परिमल डोहणे।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जिल्हा परिषदेंतर्गत सुरू असलेल्या ज्या शाळांची पटसंख्या १० पेक्षा कमी आहे, अशा शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील ४५ जि.प.शाळा बंद होणार आहेत. त्यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाकडून विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र कॉन्व्हेंटच्या वाढत्या संस्कृतीमुळे जि.प.च्या प्राथमिक शाळेतील पटसंख्या कमी होत असून कॉन्व्हेंटच्या पटसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दुसरीकडे जि.प. शाळेत कुठे एक तर कुठे दोन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येबाबत अहवाल मागितला होता. यावेळी दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर गुणवत्तेअभावी शाळेची पटसंख्या कमी आहे, असा ठपका ठेवत शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचे पत्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पाठविले आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेने या संदर्भात आता कार्यवाही सुरु केली आहे.शिक्षकांचे समायोजन होणारकमी पटसंख्या असलेल्या विद्यार्थी व शिक्षकांचे समायोजन एक किलोमीटरच्या आतील शाळेत करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने कार्यवाही सुरु केली असून विद्यार्थी व शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती आहे.विद्यार्थ्यांचे नुकसान होणारसमायोजन करुन विद्यार्थ्यांना दुसºया शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र सन २०१६-२०१७ चे शैक्षणिक सत्र अर्धे संपले आहे. आता शाळेत बदल होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वातावरणात बदल होणार असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याची प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त केली जात आहे.