शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

जंगली जनावरांच्या हैदोसामुळे होणाऱ्या पीक नुकसान भरपाईत दुप्पट वाढ

By admin | Updated: September 3, 2015 00:36 IST

जंगली जनावरांच्या हल्ल्यात मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत शासनाने वाढ केली आहे.

शासन निर्णय : शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक आधारबल्लारपूर : जंगली जनावरांच्या हल्ल्यात मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत शासनाने वाढ केली आहे. त्यामुळे जंगली जनावरांच्या हैदोसाने शेतपिकांच्या नुकसान भरपाईच्या रकमेतही शासनाने दुप्पट वाढ केली आहे, हे विशेष !जंगली जनावरांच्या हैदोसापायी शेत पिकांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन येथील प्रगतीशिल शेतकरी महिपाल आर्य यांनी राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना १५ दिवसांपूर्वी दिले होते. त्याचे उत्तर मुनगंटीवार यांच्याकडून आले आहे. जनावरांमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईत मिळणाऱ्या रकमेत आता दुप्पट वाढ झाली आहे. ही वाढ ९ जुलै २०१५ पासून लागू झाली असल्याचे त्यांना कळविले आहे. रान डुक्कर, हरिण, सारंग, कुरंग, रानगवा, रोही, निलगाय, माकड, वानर तसेच वन्यहत्ती या वन्यप्राण्यांपासून शेत पिकाला किंवा फळबागांना नुकसान झाल्यास शासननिर्णयाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येईल. शेतपिकाचे नुकसान १० हजार रुपये पर्यंत झाल्यास पूर्ण किंमत परंतु, १० हजारापेक्षा जास्त नुकसान झाल्यास ८० टक्के रक्कम (२५ हजार रुपयाचे कमाल मर्यादेत), उस पिकाच्या नुकसानीवर ८०० रुपये प्रती मे.टन प्रमाणे (२५ हजार रुपयाचे मर्यादेत), फळबागसाठी नारळ प्रति झाड ४८०० रुपये, कलमी आंबा प्रती झाड ३६०० रुपये, केळी प्रति झाड १२० रुपयेआणि इतर फळझाडे ५०० रुपये प्रती झाड नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. ही वाढ जंगलाला लागून असलेल्या शेती मालक शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असून काही प्रमाणात मदत प्राप्त होईल. (तालुका प्रतिनिधी)