शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

नुकसान भरपाई द्या, अन्यथा कार्यालयाला कुलूप ठोकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 22:38 IST

वरोरा तालुक्यातील वरोरा ते रायपूर (राजनांदगाव ) विद्युत कंपनीचे टॉवर उभारणीचे काम सुरू असून काही ठिकाणी टॉवर उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. टॉवर लाईनच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देटॉवर लाईनचे काम : बाळू धानोरकर यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : वरोरा तालुक्यातील वरोरा ते रायपूर (राजनांदगाव ) विद्युत कंपनीचे टॉवर उभारणीचे काम सुरू असून काही ठिकाणी टॉवर उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. टॉवर लाईनच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. मात्र त्यांना अद्यापही नुकसानीचा मोबदला देण्यात आला नाही. शेतकऱ्यांवर हा अन्याय दूर करावा, अन्यथा उपविभागीय अधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा आ. बाळू धानोरकर यांनी दिला आहे.या कामामुळे बाधित शेतकऱ्यांना ३१ मे २०१७ च्या शासननिर्णयानुसार मोबदला वाटपाची कार्यवाही पूर्ण केल्यानंतरच टॉवर उभारणीचे कामे पूर्ण करण्यास संबंधित कंपनीला निर्देश देण्याबाबत यापूर्वीच निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले होते. परंतु स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांचे लेखी स्वरूपात अर्ज सादर करूनही कंपनीने कोणत्याही प्रकारचा नुकसानीबाबतचा मोबदला न देता पोलिस संरक्षणामध्ये दबाव तंत्राचा वापर करून टॉवर उभारणीचे काम केले आहे, असे आ. धानोरकर यांनी म्हटले आहे.ज्या ठिकाणी टॉवर उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. तेथील बाधित शेतकऱ्यांना पिकांचा योग्य मोबदला देण्यात आला नाही. शेतकऱ्यांना सदर शासन निर्णयानुसार मदतीचे पूर्ण वाटप करण्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनदेखील शेतकऱ्यांना मोबदला दिल्या जात नाही, ही अतिशय खेदजनक बाब आहे. शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीवरून असे निदर्शनास आले की, सदर कंपनीचे कर्मचारी तिवारी हे शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना जादा मोबदल्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रक्कम उकळतात, असेही आ. धानोरकर यांनी म्हटले आहे.याबाबत वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतरही कुठलीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेतच आहेत. यामुळे त्यांची विवंचना वाढली आहे. १९ नाव्हेंबरपर्यंत सदर कंपनीकडून बाधित शेतकऱ्यांना पीक नुकसानीबाबत मोबदला न मिळाल्यास २० नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यलायाला कुलूप ठोकण्याचा इशारा आ. धानोरकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.