शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ग्रामस्थांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 22:46 IST

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी हॅबीटॅट सोसायटीने चारगाव परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. वन्यप्राण्यांचा संचार वाढल्याने चारगाव येथील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिसरातील शेतकरी शेतीवर निर्भर आहे. पण उभे पीक असल्याने ऐन हंगामाच्या वेळेवर वाया जाते. शेतकरी ताजने यांच्या शेतालगतच्या तळ्यात वाघाने भरदिवसा रानटी डुकराची शिकारी केली.

ठळक मुद्देहॅबीटॅट सोसायटीचा उपक्रम : वन विभागाने पर्यायी उपाययोजना करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी हॅबीटॅट सोसायटीने चारगाव परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला.वन्यप्राण्यांचा संचार वाढल्याने चारगाव येथील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिसरातील शेतकरी शेतीवर निर्भर आहे. पण उभे पीक असल्याने ऐन हंगामाच्या वेळेवर वाया जाते. शेतकरी ताजने यांच्या शेतालगतच्या तळ्यात वाघाने भरदिवसा रानटी डुकराची शिकारी केली. शिवाय काही दिवसांपूर्वी बैलांवर वाघाने हल्ला केला होता. परिणामी, शेतकरी शेतात जायला घाबरत आहेत. शेतीवरील संकट दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी मागणी शेतकºयांनी केली. संस्थेच्या तज्ज्ञांनी सरपंच व गावकºयांसोबत चर्चा केली. वनकर्मचारी गोधने व हॅबिटॅट कॉन्सर्व्हशन सोसायटीच्या सदस्यांनी समस्यावर तोडगा काढण्याचेच आश्वास दिले. महाऔष्णिक केंद्राच्या पाईप लाईन परिसरात काटेरी वनस्पती व झुडूपी जंगलाचे प्रमाण वाढले. शेतीचे नुकसान करत आहेत व वाघसुद्धा शिकारीसाठी रानटी डुक्करांच्या मागे गावाजवळ येत आहे. काही परिसर हा प्लाट करून विक्री झालेला आहे. तेथे कचरा खूप वाढल्याने आम्हाला धोका निर्माण झाला आहे. तरी हा परिसर स्वच्छ केल्यास वन्यप्राणी गावाजवळ येणार नाही, असे ग्रामस्थ म्हणाले.चारगाव परिसर हा पुनर्वसन होऊन तिथेच बाजूला वसलेला आहे. पुनर्वसन झालेल्या परिसरातच काटेरी वनस्पती वाढलेली असल्याने महाऔष्णिक केंद्राने तो परिसर स्वछ करावा अशी मागणी केली. त्यासाठी हॅबिटॅट कॉन्सर्व्हशन सोसायटीच्या वतीने महाऔष्णिक केंद्राचे मुख्यअभियंता जयंत बोबडे यांना निवेदन देण्यात आले. त्यांच्याकडून एकदा परिसर बघून खात्री करून तो परिसर स्वछ केल्या जाईल, असे सांगण्यात आले.चंद्रपूर वनविभाग हा ऊर्जानगर वसाहत, विचोळा, छोटा नागपूर, पाईप लाईन, अवंडा डॅम, तिरवंजा या परिसरात वर्षभरापासून वाघ-बिबट यांच्या हालचालीवर नजर ठेऊन आहे. हॅबिटॅट कॉन्सर्व्हशन सोसायटीचे दिनेश खाटे, रविकिरण गेडाम, प्रणय मगरे, चैतन्य खरतड, केशव कुळमेथे उपस्थित होते.