शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ग्रामस्थांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 22:46 IST

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी हॅबीटॅट सोसायटीने चारगाव परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. वन्यप्राण्यांचा संचार वाढल्याने चारगाव येथील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिसरातील शेतकरी शेतीवर निर्भर आहे. पण उभे पीक असल्याने ऐन हंगामाच्या वेळेवर वाया जाते. शेतकरी ताजने यांच्या शेतालगतच्या तळ्यात वाघाने भरदिवसा रानटी डुकराची शिकारी केली.

ठळक मुद्देहॅबीटॅट सोसायटीचा उपक्रम : वन विभागाने पर्यायी उपाययोजना करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी हॅबीटॅट सोसायटीने चारगाव परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला.वन्यप्राण्यांचा संचार वाढल्याने चारगाव येथील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिसरातील शेतकरी शेतीवर निर्भर आहे. पण उभे पीक असल्याने ऐन हंगामाच्या वेळेवर वाया जाते. शेतकरी ताजने यांच्या शेतालगतच्या तळ्यात वाघाने भरदिवसा रानटी डुकराची शिकारी केली. शिवाय काही दिवसांपूर्वी बैलांवर वाघाने हल्ला केला होता. परिणामी, शेतकरी शेतात जायला घाबरत आहेत. शेतीवरील संकट दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी मागणी शेतकºयांनी केली. संस्थेच्या तज्ज्ञांनी सरपंच व गावकºयांसोबत चर्चा केली. वनकर्मचारी गोधने व हॅबिटॅट कॉन्सर्व्हशन सोसायटीच्या सदस्यांनी समस्यावर तोडगा काढण्याचेच आश्वास दिले. महाऔष्णिक केंद्राच्या पाईप लाईन परिसरात काटेरी वनस्पती व झुडूपी जंगलाचे प्रमाण वाढले. शेतीचे नुकसान करत आहेत व वाघसुद्धा शिकारीसाठी रानटी डुक्करांच्या मागे गावाजवळ येत आहे. काही परिसर हा प्लाट करून विक्री झालेला आहे. तेथे कचरा खूप वाढल्याने आम्हाला धोका निर्माण झाला आहे. तरी हा परिसर स्वच्छ केल्यास वन्यप्राणी गावाजवळ येणार नाही, असे ग्रामस्थ म्हणाले.चारगाव परिसर हा पुनर्वसन होऊन तिथेच बाजूला वसलेला आहे. पुनर्वसन झालेल्या परिसरातच काटेरी वनस्पती वाढलेली असल्याने महाऔष्णिक केंद्राने तो परिसर स्वछ करावा अशी मागणी केली. त्यासाठी हॅबिटॅट कॉन्सर्व्हशन सोसायटीच्या वतीने महाऔष्णिक केंद्राचे मुख्यअभियंता जयंत बोबडे यांना निवेदन देण्यात आले. त्यांच्याकडून एकदा परिसर बघून खात्री करून तो परिसर स्वछ केल्या जाईल, असे सांगण्यात आले.चंद्रपूर वनविभाग हा ऊर्जानगर वसाहत, विचोळा, छोटा नागपूर, पाईप लाईन, अवंडा डॅम, तिरवंजा या परिसरात वर्षभरापासून वाघ-बिबट यांच्या हालचालीवर नजर ठेऊन आहे. हॅबिटॅट कॉन्सर्व्हशन सोसायटीचे दिनेश खाटे, रविकिरण गेडाम, प्रणय मगरे, चैतन्य खरतड, केशव कुळमेथे उपस्थित होते.