शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

मुनगंटीवार यांनी साधला नागरिकांशी सुसंवाद

By admin | Updated: November 29, 2015 01:52 IST

बल्लारपूर शहरातील गोकुलनगर वॉडार्तील कादरिया मस्जीद चौकात लाल दिव्याची गाडी ताफ्यासह पोहचते,

१४ वॉर्डात घेतल्या सभा : जनता आनंदली, तक्रारी व सूचनांचा वर्षावबल्लारपूर : बल्लारपूर शहरातील गोकुलनगर वॉडार्तील कादरिया मस्जीद चौकात लाल दिव्याची गाडी ताफ्यासह पोहचते, या ताफ्यात फिरते जनसंपर्क कार्यालय सुध्दा असते, लाल दिव्याच्या गाडीतून राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या सहकाऱ्यांसह उतरतात आणि सुरू होतो नागरिकांशी सुसंवाद. एकाच दिवशी बल्लारपूर शहरातील तब्बल १४ वॉर्डात फिरून ना. मुनगंटीवार यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांनी या भेटीने मोहरून जात तक्रारी व सूचनांचा वर्षाव केला. राज्याचे वित्त व वनमंत्री तसेच चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज शनिवारी बल्लारपुर शहरातील १४ प्रमुख चौकांमध्ये चौक जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून नागरिकांशी सुसंवाद साधला. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा नेते प्रमोद कडू, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस हरीश शर्मा, बल्लारपुर भाजपाचे अध्यक्ष शिवचंद द्विवेदी, रेणुका दुधे, अजय दुबे, निलेश खरबडे, किशोर मेश्राम, मनीष पांडे, धर्मप्रकाश दुबे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.कादरीया मस्जीद चौकानंतर विवेकानंद वॉर्ड, दिनदयाल वॉर्ड, मौलाना आझाद वॉर्ड, झाकीर हुसैन वॉर्ड, महाराणा प्रताप वॉर्ड, दादाभाई नौरोजी वॉर्ड, गणपती वॉर्ड, बालाजी वॉर्ड, महात्मा गांधी वॉर्ड, भगतसिंग वॉर्ड, लोकमान्य टिळक वॉर्ड, साईबाबा वॉर्ड, गौरक्षण वॉर्ड परिसरातील प्रमुख चौकांमध्ये वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जनसंपर्क करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. बल्लारपूर शहराच्या विकासासाठी आपण सदैव कटिबध्द असल्याची ग्वाही देत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या शहरातील नागरिकांनी भरभरून प्रेम दिले आहे. पाणी पुरवठा योजना, नाटयगृहाचे बांधकाम, उपकोषागार कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, स्टेडियमची निर्मिती, अशी विकासकामांची मोठी मालिका या शहरात आपण निर्माण केली आहे. नुकताच या शहराच्या विकासासाठी ३० कोटी रू. निधी आपण मंजूर करविला आहे. येत्या काळात २० कोटी रू. निधीला मंजुरी मिळणार आहे. या ५० कोटी रू. विकास निधीचे नियोजन कसे असावे, यादृष्टीने नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी आपण या चौक जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून येथे आलो आहे, असेही सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले. यापुवीर्ही बल्लारपूर विकास परिषदेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधुन बल्लारपूर शहर विकास आराखडा तयार करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतल्याचेही त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)