शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

प्रकल्पग्रस्त शेतकºयांना न्याय देण्यास कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:39 IST

वेकोलिच्या विविध प्रकल्पांसाठी शेतकºयांची जमिनी बळजबरीने घेणे अन्यायकारक असून भूमीअधिग्रहण कायद्यानुसारच प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यास केंद्र सरकार कटिबद्ध आहे, ....

ठळक मुद्देहंसराज अहीर : दिल्लीतील बैठकीत ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: वेकोलिच्या विविध प्रकल्पांसाठी शेतकºयांची जमिनी बळजबरीने घेणे अन्यायकारक असून भूमीअधिग्रहण कायद्यानुसारच प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यास केंद्र सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली़वेकोलिच्या विविध प्रकल्पांसाठी जमिनीचा दर व नोकरी संदर्भात दिल्ली येथे केंद्रीय कोळसा मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत पार पडलेल्या संयुक्त बैठकीत दिली़ना़ अहीर म्हणाले, वेकोलिमधील चालू आणि भविष्यात होणाºया प्रकल्पांमध्ये सी. बी. अ‍ॅक्ट १९५७ मधील कलम १४ (१) चा वापर करुन सर्व शेतकºयांना एकरी ८ ते १० लाख रुपये मोबदला देण्यात येणार आहे़ सीआयएलआर अ‍ॅण्ड आर पॉलिसी २०१२ प्रमाणे नोकºया दिल्या जातील वेकोलीच्या सात प्रकल्पांना याचा मोठा फायदा होणार आहे़ यामध्ये बल्लारपूर क्षेत्रातील पोवनी- ३, धोपटाळा विस्तारित चिंचोली तसेच वणी क्षेत्रातील बेल्लोरा नायगाव निलजई, मुंगोली एक्सटेंशन व वणी नॉर्थ क्षेत्रातील उकनी प्रकल्पांचा समावेश आहे़ कोल बेअरींग अ‍ॅक्ट १९५७ मध्ये जमिनीचे दर ठरविण्याच्या पद्धतीत १३ (५) व १४ (१) या दोन्ही कलमांची तरतुद आहे़ राज्य शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे करारनामा करुन मागील वर्षी एकरी ८ ते १० लाख रुपये दर दिला़ हा १४ (१) कलमाचाच उपयोेग करुन वेकोलिच्या १९ प्रकल्पामध्ये १५०० कोटींच्या वर रक्कम आणि ५ हजारांपेक्षा अधिक नोकºया दिल्या होत्या़, असेही ना़ अहीर म्हणाले़ शेतकरी व कंपनी यांच्यातील करारनामा हा कायद्यानुसार असल्यामुळे यापुढेही जमिनीचे दर द्यावे़ तसेच वेकोलिमध्ये भूमी अधिग्रहन नसताना व कोल बेअरींग अ‍ॅक्टमध्ये १४ (१) कलमचा कायद्याने उपयोग केला जात असताना वेकोली अधिकाºयांनी प्रकल्पग्रस्तांना अनावश्यक त्रास दिला, याकडेही त्यांनी दिल्ली येथील बैठकीत लक्ष वेधले़ ज्यांच्या भूमितून कोळसा निघणार त्यांना मानसिक त्रास देणे, अन्यायकारक आहे, अशी भूमिका ना. अहीर यांनी कोळसा मंत्र्यांकडे मांडली़वेकोलिच्या अधिकाºयांनी सी.बी. एक्ट १९५७ मधील १४ (१) कलमाचा केंद्राच्या नोटीफिकेशनमध्ये कुठेही उल्लेख नाही़ या कायद्यातील १३ (५) कलम कालबाह्य झाले असताना विनाकारण शेतकºयांची दिशाभूल करून राष्टÑीय उत्पन्नाचे नुकसान केले. केंद्रीय कोळसा मंत्री पियुष गोयल यांनी सीबी अ‍ॅक्टमधील १४ (१) कलमाचा वापर करून शेतकºयांना एकरी ८ ते १० लाख रुपये दर देऊ़ शिवाय, प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या मर्जीनेच काम करण्याचे निर्देश दिले़ कोळसा मंत्र्यांनी वेकोली अधिकाºयांच्या भूमिकेवरही नाराजी नाराजी व्यक्त केली़ कुठल्याही प्रकल्पाचा आर्थिक मोबदला देण्यासाठी विलंब करू नये़ त्यासंदर्भातील सर्व अहवाल तातडीने मंत्रालयात पाठवावे़, अशी सूचना केंद्रीय कोळसा मंत्री पियुष गोयल यांना दिले़ शेतकºयांवर अन्याय होऊ नये, यासाठी वेकोलिने नियमांची अंमलबजावणी करावी़ अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही या बैठकीत देण्यात आला़ केंद्रीय मंत्र्यांच्या या भूमिकेबद्दल जिल्ह्यातील शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे़ बैठकीला कोळसा मंत्रालयाचे मुख्य सचिव सुशिल कुमार तसेच भाजपाचे जिल्हा महामंत्री राहुल सराफ उपस्थित होते़