शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

‘मागेल त्याला शेततळे’ योजना थंडबस्त्यात

By admin | Updated: June 3, 2016 00:57 IST

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी पर्जन्यावर आधारीत कोरडवाहू शेतीत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी

कामासाठी यंत्रणाच नाही : पावसाळ्यापूर्वी शेततळे पूर्ण करण्याची शेतकऱ्यांची धावपळमूल : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी पर्जन्यावर आधारीत कोरडवाहू शेतीत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अंमलात आणली. मूल तालुक्यातील १११ गावातील शेतकऱ्यांना १४० शेततळे मंजुर करण्यात आले. मंजुर शेततळे तयार करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना आदेश सुद्धा दिले आहे. मात्र शेततळ्याचे काम शेतकऱ्यांनाच करायचे असल्याने खाजगी कंत्राटदाराची यंत्रणा मिळत नसल्याने काम थंडबस्त्यात दिसत आहे. पावसाळ्यापुर्वी शेततळ्याचे काम व्हावे, यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असली तरी यंत्रणेअभावी शेतकरी हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. दिवसेंदिवस पावसाचा सुरू असलेला लपंडाव व त्यामुळे पावसाची निर्माण होणारी टंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांना स्वत:ची सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना कृषी विभागाने कार्यान्वित केली. त्याला कृषी विभागाचे मूल येथील तालुका कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेऊन दिलेले १४० शेतकऱ्यांचे उद्दीष्ट पूर्ण केले. सदर शेततळे मंजुर झाल्यानंतर शेतकऱ्यांचा रितसर काम करण्यासाठी अटी व शर्ती टाकुन ४ मे २०१६ ला आदेश देण्यात आले व सदर काम १५ दिवसाच्या आत पूर्ण करावे अन्यथा सदर आदेश रद्द केला, जाईल असे सुचविण्यात आले. मात्र १५ दिवसाचा कालावधी लोटूनही काम करण्याची यंत्रणा मिळणे शेतकऱ्यांना कठीण झाल्याचे दिसून येत आहे.मूल तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती असून शेतकरी हतबल झाला आहे. सतत नापिकीमुळे तो निराशेच्या खाईत लोटल्या जात आहे. आर्थिक स्थिती सुद्धा बिकट स्वरूपाची असल्याने सिंचनाची सोय उपलब्ध होईल, या उद्देशाने शेततळ्यासाठी अर्ज केला. मात्र शेततळे शेतकऱ्यांनाच करायचे असल्याने आर्थिक विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. शेततळे कसे तयार करावे या विवंचनेत असताना दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे. मात्र काम करणाऱ्या यंत्रणा मिळत नसल्याने तो चिंतेत पडला आहे. (तालुका प्रतिनिधी)मूल तालुक्यात १४० शेततळे मंजुर झाले आहेत. सदर शेततळे शेतकऱ्यांनीच पूर्ण करायचे असल्याने शेतकऱ्यांनीच पुढाकार घेऊन पूर्ण करणे गरजेचे आहे. खाजगी यंत्रणांनी कृषी विभागाशी संपर्क करून आम्ही शेतकऱ्यांचे शेततळे तयार करून देतो. मात्र धनादेश आपल्या नावाने द्यावा असे सुचविले. शासनाच्या आदेशानुसार शेतकऱ्याचे बिल त्यांच्याच नावाने निघेल. यात कुठलाही फेरबदल करता येणार नाही, असे खाजगी यंत्रणेला सांगण्यात आले. शेतकऱ्यांनीच याबाबत पुढाकार घेऊन काम पूर्ण करावे.- प्रशांत राहाणे, तालुका कृषी अधिकारी, मूलशेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी शेततळ्याची योजना चांगली आहे. मात्र काम करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध होत नसल्याने काम थंडबस्त्यात आहे. यासाठी कृषी विभागानेच पुढाकार घेऊन शेततळे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा.- प्रशांत मेश्राम, युवा शेतकरी, मारोडा (सोमनाथ)