शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

‘मागेल त्याला शेततळे’ योजना थंडबस्त्यात

By admin | Updated: June 3, 2016 00:57 IST

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी पर्जन्यावर आधारीत कोरडवाहू शेतीत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी

कामासाठी यंत्रणाच नाही : पावसाळ्यापूर्वी शेततळे पूर्ण करण्याची शेतकऱ्यांची धावपळमूल : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी पर्जन्यावर आधारीत कोरडवाहू शेतीत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अंमलात आणली. मूल तालुक्यातील १११ गावातील शेतकऱ्यांना १४० शेततळे मंजुर करण्यात आले. मंजुर शेततळे तयार करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना आदेश सुद्धा दिले आहे. मात्र शेततळ्याचे काम शेतकऱ्यांनाच करायचे असल्याने खाजगी कंत्राटदाराची यंत्रणा मिळत नसल्याने काम थंडबस्त्यात दिसत आहे. पावसाळ्यापुर्वी शेततळ्याचे काम व्हावे, यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असली तरी यंत्रणेअभावी शेतकरी हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. दिवसेंदिवस पावसाचा सुरू असलेला लपंडाव व त्यामुळे पावसाची निर्माण होणारी टंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांना स्वत:ची सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना कृषी विभागाने कार्यान्वित केली. त्याला कृषी विभागाचे मूल येथील तालुका कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेऊन दिलेले १४० शेतकऱ्यांचे उद्दीष्ट पूर्ण केले. सदर शेततळे मंजुर झाल्यानंतर शेतकऱ्यांचा रितसर काम करण्यासाठी अटी व शर्ती टाकुन ४ मे २०१६ ला आदेश देण्यात आले व सदर काम १५ दिवसाच्या आत पूर्ण करावे अन्यथा सदर आदेश रद्द केला, जाईल असे सुचविण्यात आले. मात्र १५ दिवसाचा कालावधी लोटूनही काम करण्याची यंत्रणा मिळणे शेतकऱ्यांना कठीण झाल्याचे दिसून येत आहे.मूल तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती असून शेतकरी हतबल झाला आहे. सतत नापिकीमुळे तो निराशेच्या खाईत लोटल्या जात आहे. आर्थिक स्थिती सुद्धा बिकट स्वरूपाची असल्याने सिंचनाची सोय उपलब्ध होईल, या उद्देशाने शेततळ्यासाठी अर्ज केला. मात्र शेततळे शेतकऱ्यांनाच करायचे असल्याने आर्थिक विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. शेततळे कसे तयार करावे या विवंचनेत असताना दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे. मात्र काम करणाऱ्या यंत्रणा मिळत नसल्याने तो चिंतेत पडला आहे. (तालुका प्रतिनिधी)मूल तालुक्यात १४० शेततळे मंजुर झाले आहेत. सदर शेततळे शेतकऱ्यांनीच पूर्ण करायचे असल्याने शेतकऱ्यांनीच पुढाकार घेऊन पूर्ण करणे गरजेचे आहे. खाजगी यंत्रणांनी कृषी विभागाशी संपर्क करून आम्ही शेतकऱ्यांचे शेततळे तयार करून देतो. मात्र धनादेश आपल्या नावाने द्यावा असे सुचविले. शासनाच्या आदेशानुसार शेतकऱ्याचे बिल त्यांच्याच नावाने निघेल. यात कुठलाही फेरबदल करता येणार नाही, असे खाजगी यंत्रणेला सांगण्यात आले. शेतकऱ्यांनीच याबाबत पुढाकार घेऊन काम पूर्ण करावे.- प्रशांत राहाणे, तालुका कृषी अधिकारी, मूलशेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी शेततळ्याची योजना चांगली आहे. मात्र काम करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध होत नसल्याने काम थंडबस्त्यात आहे. यासाठी कृषी विभागानेच पुढाकार घेऊन शेततळे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा.- प्रशांत मेश्राम, युवा शेतकरी, मारोडा (सोमनाथ)