शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

कलर्स प्रस्तुत सखी मंचतर्फे ‘ तू माझा स्वाभिमान’ स्पर्धा

By admin | Updated: December 22, 2016 01:47 IST

आपल्या मुलांना जीवनाचा आनंद देणारे, त्यांना चांगले भविष्य देणारे त्यांचे पालक आणि कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आपली पसंत- नापसंत याकडे दुर्लक्ष करतात.

आई-मुलींचे सादरीकरण : आई-मुलींच्या भावविश्वावर आधारित कार्यक्रम चंद्रपूर : आपल्या मुलांना जीवनाचा आनंद देणारे, त्यांना चांगले भविष्य देणारे त्यांचे पालक आणि कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आपली पसंत- नापसंत याकडे दुर्लक्ष करतात. ते मुलांच्या करिअर आणि भविष्याचा मुख्य आधार असतात. यात आईची भूमिका अतिशय संवेदनशील ठरते. कर्तव्य आणि प्रेमाचा संगम आईमध्ये पाहावयास मिळतो. याच विषयावर लोकमत सखी मंच आणि कलर्सतर्फे तू माझा स्वाभिमान या कार्यक्रमाचे आयोजन येथील आयएमए सभागृहात गंजवार्ड चंद्रपूर येथे करण्यात आले. यात आई आणि मुलींच्या मैत्रीपूर्ण भावनात्मक नात्यावर आधारीत आम्ही दोघी माय- लेकी’ ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेच्या चार राऊंडमध्ये आई-मुलींच्या जोड्यांनी व्यासपीठावर प्रभावी सादरीकरण केले. स्पर्धेच्या पहिल्या रांऊडमध्ये आई आणि मुलींच्या जोडीने कविता, शेरी शायरीच्या अंदाजात एकमेकांची ओळख करुन दिली. दुसऱ्या राऊंडमध्ये आई-मुलीने गायन, नृत्य, रांगोळी, पाककृती, अभिनय आदी सादर केले. तिसरा राऊंड ‘सिच्युएशन राऊंड’ होता. यात परिक्षकांनी एकेका जोडीसमोर परिस्थिती निर्माण करुन त्यांच्याशी संबंधित प्रश्न विचारले.एका आई- मुलींच्या जोडीला विचारण्यात आले की, जर मुलीसाठी खूप श्रीमंत स्थळ आले आणि त्यांनी लग्नानंतर मुलीला नोकरी करण्यास मनाई केली तर काय करणार? जर कोणी आईचा अपमान केला तर काय कराल? या पद्धतीने विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या प्रश्नांचा सामना स्पर्धकांनी केला. चौथा राऊंड प्रश्नोत्तराचा होता. यात परीक्षकांनी आई आणि मुलीला त्यांच्या ऐकमेकींच्या आवडी- निवडीवर प्रश्न विचारले. स्पर्धेचे परिक्षण अ‍ॅड. संध्या मुसळे आणि सागर अदनकर यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून संगीनी क्लब आॅफ आयएमएच्या अध्यक्षा डॉ. विद्या बांगडे व सचिव डॉ. सिद्धीका शिवजी, लोकमतचे सहा. शाखा व्यवस्थापक विनोद बुले, यांना आमंत्रीत करण्यात आले. स्पर्धेत शहरातील १६ आई-मुलींच्या जोड्यांची निवड आॅडीशनच्या माध्यमातून करण्यात आली. संचालन पूजा ठाकरे यांनी केले. नेहमीच कौटुंबिक विषयांना घेऊन येणाऱ्या कलर्स चॅनलने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. २२ कलर्सवर १९ डिसेंबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता आई- मुलींच्या मजबूत नात्यावर ‘एक शृंगार... स्वाभिमान’ या मालिकेचे प्रसारण होत आहे. यात गणिताची शिक्षिका शारदा हिने आपल्या दोन मुलींना आधुनिक विचारांसोबतच स्वाभिमानाने आणि शिकविले. मुलींना कर्मठ करण्यासाठी आधी नोकरी आणि नंतर लग्न करण्याची भूमिका घेऊन शारदा समाजासमोर अनेक प्रश्न निर्माण करते. नौकरी करण्याचा उद्देश केवळ पैसे मिळविणे नसून स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग आहे. घर सांभाळून नोकरी करणारी स्त्री आदर्श आणि नोकरीच्या द्वारे करिअरला अधिक महत्व देणारी स्त्री आदर्श का नाही? असा प्रश्न शारदा समाजासमोर ठेवते. तिच्या सर्व प्रश्नाची उत्तरे काय आहेत हे या मालिकेत दाखवण्यात आले आहे. ‘आम्ही दोघी मायलेकी’ मध्ये एक दुसऱ्याना समजून घेणाऱ्या आई मुलींच्या जोड्यांना पुरस्कृत करण्यात आले. कार्यक्रमात प्रियंका वरघने यांनी लावणी व नृत्य सादर केले. उपस्थित सखीनी एक मिनिट गेम शोचा आनंद घेतला. (नगर प्रतिनिधी)