शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

नगरपरिषदेत समाविष्ट गावातील सामूहिक नेतृत्व ‘खालसा’

By admin | Updated: May 26, 2017 00:18 IST

नगरपरिषदेच्या माध्यमातून नागभीड नगरपरिषदेत समाविष्ट करण्यात आलेल्या त्या गावांचा विकास होईलही.

प्रत्येक कामासाठी नागभीडची वारी : गावातील सरपंच, उपसरपंच पदे लुप्तघनश्याम नवघडे । लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नगरपरिषदेच्या माध्यमातून नागभीड नगरपरिषदेत समाविष्ट करण्यात आलेल्या त्या गावांचा विकास होईलही. पण त्या गावांचे सामूहिक नेतृत्व कायमचे हिरावल्या गेले. त्यांचे छोटी-छोटी कामे गावातच होत होती. त्यासाठी त्यांना आता नागभीडलाच यावे लागणार अशा निराशाजनक प्रतिक्रिया नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर व्यक्त व्हायला लागल्या आहेत.नागभीड नगरपरिषदेची निवडणूक २४ मे रोजी झाली. या नगरपरिषदेत डोंगरगाव, बाम्हणी, बोथली, चिखलपरसोडी, भिकेश्वर या जर लांबच असलेल्या गावांना लोकसंख्येच्या पूर्ततेसाठी समाविष्ट करून घेण्यात आले. नवखळा, सुलेझरी, तुकुम या गावांचे ठिक होते. ही गावे नागभीडला लागूनच होती. पण बाकी गावांचे काय, असा प्रश्नही यानिमित्ताने विचारला जात आहे. भिकेश्वर-तुकुम-सुलेझरीमधून काँग्रेसने प्रतिक भसीन व भाजपने सचिन आकुलवार या बाम्हणी-डोंगरगाव या प्रभागातून काँग्रेसने दिनेश गावंडे व भाजपने नरेंद्र हेमणे या धनदांडग्यांना रिंगणात उतरविले यातील प्रतिक भसीन, दिनेश गावंडे, नरेंद्र हेमणे हे नागभीडचे रहिवासी आहेत. सचिन आकुलवार सुलेझरीचे सरपंच - उपसरपंच राहिले असले. तरी त्यांचीही कर्मभूमी नागभीडच राहिली आहे. नागभीडच्या उमेदवारांपासून नवखळा आणि बोथली-परोडी हे दोन प्रभाग यावेळेस सुटले असले तरी भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत या प्रभागावर अतिक्रमण होणार नाही कश्यावरून?भिकेश्वर-तुकुममधून भसीन किंवा आकुलवार, बाम्हणी-डोंगरगावमधून दिनेश गावंडे किंवा नरेंद्र हेमणे निवडून येतील. आपल्या राजकीय बळावर ते या गावांचा विकास करतीलही. पण या गावातील सामूहीक नेतृत्वाला जे ग्रहण लागले ते ग्रहण भविष्यातही सुटण्याची शक्यता नाही. बाम्हणी, डोंगरगाव, भिकेश्वर, बोथली, तुकुम या छोट्या छोट्या ग्रामपंचायती. या गावातील गावकरी आपआपल्या गावातुन सात-सात प्रतिनिधी निवडून द्यायचे. यातील एक सरपंच व्हायचा. एक उपसरपंच व्हायचा आणि हे ७ लोक आपल्या गावचा गाडा हाकायचे. गावातल्या समस्या गावातच सोडवायचे. आता या लोकांना प्रत्येक गोष्टीसाठी नागभीडवर अवलंबून राहावे लागणार आहे. साधा रहिवाशाचा दाखला लागला तरी नागभीडला यावे लागणार आहे. जेथे ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक गावकऱ्यांच्या तक्रारी ऐकण्याच्या मुडमध्ये नसायचा तेथे नगरपरिषदेचा मुख्याधिकारी आमचे खरच ऐकणार काय, अशी संतप्त भावनाही या गावकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. सरपंच, उपसरपंच आणि ग्रा.पं. सदस्य म्हणून मिरवणारे व गावाचे नेतृत्व करणारे या गावातील हे सामूहिक नेतृत्व आता कायमचे पडद्याआड गेले आहे.