शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

जिल्ह्यात थंडीची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:00 IST

चंद्रपूरसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या थंडीची लाट आली आहे. चंद्रपूरचा पारा १०.८ अंशावर आला असून ब्रह्मपुरीत तर ९.९ अंशापर्यंत पारा घसरला आहे. या हुडहुडीमुळे जनजीवनावरही परिणाम होत आहे.

ठळक मुद्दे ग्रामीण भागातही हुडहुडी : चंद्रपूर १०.८ तर ब्रह्मपुरी ९.९ अंश सेल्सिअस

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या थंडीची लाट आली आहे. चंद्रपूरचा पारा १०.८ अंशावर आला असून ब्रह्मपुरीत तर ९.९ अंशापर्यंत पारा घसरला आहे. या हुडहुडीमुळे जनजीवनावरही परिणाम होत आहे.चंद्रपूर जिल्हा तसा तप्त उन्हाळ्यामुळे राज्यभर प्रसिध्द आहे. उन्हाळ्यात बाहेर जिल्ह्यातील नागरिक चंद्रपुरात यायला घाबरतात, एवढी उन्हाची दाहकता असते. यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळा चांगलाच तापला. सूर्याचा पारा ४८ अंशापार गेला होता. मात्र त्यानंतर पावसाळ्याने ऋतुचक्राला बगल दिली. प्रारंभी दमदार आलेला पाऊस पुढे कुठे गायब झाला, कळले नाही. पावसाने जिल्ह्यात सरासरीही गाठली नाही. अत्यल्प पावसामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. पावसाळ्याने दगा दिला. त्यामुळे मागील वर्षीसारखा हिवाळाही दगा देईल, असे वाटत होते. प्रारंभी तसे वाटायलाही लागले. मात्र पुढे चांगली थंडी पडू लागली. हिवाळ्यात चांगली थंडी पडत असल्याने रबी पिकांना त्याचा फायदा होत आहे.एरवी दिवाळीपासून थंडीला सुरूवात होते. मात्र यावेळी दिवाळी आॅक्टोबर महिन्यातच आल्यामुळे थंडी जाणवली नाही. उलट उन्ह तापत असल्याने अनेकांनी घरातील कुलर काढलेच नाही. नोव्हेंबर महिन्यातही थंडीचा फारसा जोर नव्हता. दुपारचा उकाडा कायम होता. नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात थोडीफार गुलाबी थंडी जाणवू लागली. मात्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच थंडीचा अचानक जोर वाढला. डिसेंबरच्या पंधरवाड्यात तर पारा चांगलाच खाली आला होता. पहाटे आणि रात्रीच्या सुमारास कडाक्याची थंडी जाणवू लागली होती.मात्र मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. पहाटे आणि रात्रीच्या सुमारास जाणवणारी थंडी आता दिवसभरही जाणवत आहे. चौकाचौकात नागरिक उन्हात उभे राहताना दिसत आहे. शनिवारी चंद्रपुरात १०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दिवसेंदिवस पारा आणखी खाली घसरत आहे.ग्रामीण भागात शेकोट्याग्रामीण भागात तर थंडीचा जोर अधिक आहे. ब्रह्मपुरीत शनिवारी ९.९ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरल्याची नोंद झाली आहे. ग्रामीण भागातील चौकाचौकात शेकोट्या पेटवून नागरिक थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. याशिवाय एरवी पहाटे५ वाजताच आपली दिनचर्या सुरू करणारे ग्रामीण नागरिक आता सकाळी ७ वाजताउठू लागले आहेत.