शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

जिल्ह्यात थंडीची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:00 IST

चंद्रपूरसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या थंडीची लाट आली आहे. चंद्रपूरचा पारा १०.८ अंशावर आला असून ब्रह्मपुरीत तर ९.९ अंशापर्यंत पारा घसरला आहे. या हुडहुडीमुळे जनजीवनावरही परिणाम होत आहे.

ठळक मुद्दे ग्रामीण भागातही हुडहुडी : चंद्रपूर १०.८ तर ब्रह्मपुरी ९.९ अंश सेल्सिअस

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या थंडीची लाट आली आहे. चंद्रपूरचा पारा १०.८ अंशावर आला असून ब्रह्मपुरीत तर ९.९ अंशापर्यंत पारा घसरला आहे. या हुडहुडीमुळे जनजीवनावरही परिणाम होत आहे.चंद्रपूर जिल्हा तसा तप्त उन्हाळ्यामुळे राज्यभर प्रसिध्द आहे. उन्हाळ्यात बाहेर जिल्ह्यातील नागरिक चंद्रपुरात यायला घाबरतात, एवढी उन्हाची दाहकता असते. यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळा चांगलाच तापला. सूर्याचा पारा ४८ अंशापार गेला होता. मात्र त्यानंतर पावसाळ्याने ऋतुचक्राला बगल दिली. प्रारंभी दमदार आलेला पाऊस पुढे कुठे गायब झाला, कळले नाही. पावसाने जिल्ह्यात सरासरीही गाठली नाही. अत्यल्प पावसामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. पावसाळ्याने दगा दिला. त्यामुळे मागील वर्षीसारखा हिवाळाही दगा देईल, असे वाटत होते. प्रारंभी तसे वाटायलाही लागले. मात्र पुढे चांगली थंडी पडू लागली. हिवाळ्यात चांगली थंडी पडत असल्याने रबी पिकांना त्याचा फायदा होत आहे.एरवी दिवाळीपासून थंडीला सुरूवात होते. मात्र यावेळी दिवाळी आॅक्टोबर महिन्यातच आल्यामुळे थंडी जाणवली नाही. उलट उन्ह तापत असल्याने अनेकांनी घरातील कुलर काढलेच नाही. नोव्हेंबर महिन्यातही थंडीचा फारसा जोर नव्हता. दुपारचा उकाडा कायम होता. नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात थोडीफार गुलाबी थंडी जाणवू लागली. मात्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच थंडीचा अचानक जोर वाढला. डिसेंबरच्या पंधरवाड्यात तर पारा चांगलाच खाली आला होता. पहाटे आणि रात्रीच्या सुमारास कडाक्याची थंडी जाणवू लागली होती.मात्र मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. पहाटे आणि रात्रीच्या सुमारास जाणवणारी थंडी आता दिवसभरही जाणवत आहे. चौकाचौकात नागरिक उन्हात उभे राहताना दिसत आहे. शनिवारी चंद्रपुरात १०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दिवसेंदिवस पारा आणखी खाली घसरत आहे.ग्रामीण भागात शेकोट्याग्रामीण भागात तर थंडीचा जोर अधिक आहे. ब्रह्मपुरीत शनिवारी ९.९ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरल्याची नोंद झाली आहे. ग्रामीण भागातील चौकाचौकात शेकोट्या पेटवून नागरिक थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. याशिवाय एरवी पहाटे५ वाजताच आपली दिनचर्या सुरू करणारे ग्रामीण नागरिक आता सकाळी ७ वाजताउठू लागले आहेत.