शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

अखेर कोलारी गाव होणार चकाचक !

By admin | Updated: December 7, 2015 05:16 IST

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वसलेल्या कोलारा गावाला व्याघ्र प्रकल्पामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

लोकमत वृत्ताची दखल : तातडीची बैठक घेऊन आमदारांनी दिल्या सूचनाराजकुमार चुनारकर ल्ल खडसंगीताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वसलेल्या कोलारा गावाला व्याघ्र प्रकल्पामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रकल्पास देश- विदेशातील पर्यटक पर्यटनासाठी येत असल्यामुळे कोलारा जगाच्या पटलावर आले आहे. गाव जगाच्या पटलावर असले तरी या गावाचा पाहिजे तसा विकास नाही. हागणदारीयुक्त रस्त्यावरून पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करावा लागतो. याबाबत लोकमतने सतत दोन दिवस वृत्त प्रकाशित केले. याची आमदारांकडून दखल घेण्यात आली असून याबाबत संबंधितांना दिशानिर्देश देण्यात आले आहे.कोलारी गावाला बफर झोनचे क्षेत्र नसल्याने व कोअरझोन लगतच शेतजमिनी असल्यामुळे येथील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या दहशतीत शेतीची मशागत व राखण करावी लागते. त्यामुळे या गावातील अनेकांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी पडावे लागत आहे. या प्रकारामुळे अजूनही ‘भय इथले संपत नाही असा प्रकार या गावात सुरू आहे.‘विदेशी पर्यटकांना काढावी लागते हागणदारीतून वाट’ या शिर्षकाखाली दैनिक लोकमतने वृत्त प्रकाशित करीत प्रशासनासह जनप्रतिनिधीनीचे लक्ष वेधले. या वृत्ताची दखल चिमूर विधानसभेचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी घेतली. त्यांनी तातडीने तहसील कार्यालयात याबाबत आढावा बैठक घेतली. कोलारा गावाला हागणदारीमुक्त, स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टीने रोडच्या लगतचे शेनखताचे खड्डे हटवित रोड चकाचक करण्याच्या सूचना या बैठकीत अधिकाऱ्यांना व गावाच्या सरपंचांना दिल्या. यामुळे कोलारा गावातून व्याघ्र प्रकल्पाकडे जाणारा रस्ता आता चकाचक होणार असून पर्यटकांना घाणीपासून मुक्ती मिळणार आहे.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची प्रसिद्धी साता समुद्रापलिकडे पोहचली असली तरी प्रकल्पाला लागून असलेल्या दोन हजार लोकसंख्याच्या गावाला अनेक समस्यांनी वेढले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते, नाल्या, स्वच्छता, लाईटची व्यवस्था या प्राथमिक सुविधेसह रोजगाराचीसुद्धा समस्या मोठ्या प्रमाणात आहे. व्याघ्र प्रकल्पामुळे काही युवकांना जिप्सी व गाईडच्या माध्यमातून रोजगार मिळाला. मात्र गावातील मजुरांना बांबूचा पुरवठा करता येत नसल्याने बांबूवर अवलंबून असलेल्या मजुरांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. गावाला बफर झोनचे क्षेत्र नसल्यामुळे एखादी दुर्घटना झाल्यास मोबदलासुद्धा मिळत नाही. मात्र गावाकऱ्यांना शेतीसाठी व इतर कामासाठी बफर झोनमध्ये जावेच लागते. यामुळे गावकऱ्यांची इकडे- आड- तिकडे विहीर, अशी अवस्था झाली आहे. यासह नळाच्या पाण्याची समस्यासुद्धा अनेक दिवसांपासून गावात आहे. तसेच आरोग्य उपकेंद्र नावालाच असल्याने आरोग्यासह शिक्षणाचीसुद्धा मोठी समस्या गावकऱ्यांपुढे आहे.जगाच्या पटलावर आलेल्या कोलारी गावाच्या समस्यांबाबत लोकमतने सातत्याने दोन दिवस वृत्त प्रकाशित केले. याची प्रशासनानेही दखल घेत कोलारा गावाच्या प्राथमिक सुविधा सोडविण्यास पुढाकार घतला असून गावाचा मुख्य रस्ता स्वच्छ - सुंदर करण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केला जाणार आहे. कोलारा गावावरुन देश-विदेशातील पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येतात. त्यामुळे या गावातील मुख्य रस्त्याच्या लगत असलेले खताचे खड्डे हटवून महसूल विभागाची दुसरी जागा देण्यात येणार आहे. गावापासून गेटपर्यंत दोन्ही बाजूने वृक्ष लावण्यात येणार आहेत. तसेच गावातील पाठी पुरवठा योजनाही कार्यान्वित करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. या गावाकडे विशेष लक्ष देवून स्वच्छ सुंदर व हागणदारी मुक्त करण्याचा प्रयत्न गावकऱ्यांच्या सहभागातून करणार आहोत.- कीर्तीकुमार भांगडिया, आमदार,चिमूर विधानसभा क्षेत्र