शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

अखेर कोलारी गाव होणार चकाचक !

By admin | Updated: December 7, 2015 05:16 IST

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वसलेल्या कोलारा गावाला व्याघ्र प्रकल्पामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

लोकमत वृत्ताची दखल : तातडीची बैठक घेऊन आमदारांनी दिल्या सूचनाराजकुमार चुनारकर ल्ल खडसंगीताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वसलेल्या कोलारा गावाला व्याघ्र प्रकल्पामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रकल्पास देश- विदेशातील पर्यटक पर्यटनासाठी येत असल्यामुळे कोलारा जगाच्या पटलावर आले आहे. गाव जगाच्या पटलावर असले तरी या गावाचा पाहिजे तसा विकास नाही. हागणदारीयुक्त रस्त्यावरून पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करावा लागतो. याबाबत लोकमतने सतत दोन दिवस वृत्त प्रकाशित केले. याची आमदारांकडून दखल घेण्यात आली असून याबाबत संबंधितांना दिशानिर्देश देण्यात आले आहे.कोलारी गावाला बफर झोनचे क्षेत्र नसल्याने व कोअरझोन लगतच शेतजमिनी असल्यामुळे येथील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या दहशतीत शेतीची मशागत व राखण करावी लागते. त्यामुळे या गावातील अनेकांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी पडावे लागत आहे. या प्रकारामुळे अजूनही ‘भय इथले संपत नाही असा प्रकार या गावात सुरू आहे.‘विदेशी पर्यटकांना काढावी लागते हागणदारीतून वाट’ या शिर्षकाखाली दैनिक लोकमतने वृत्त प्रकाशित करीत प्रशासनासह जनप्रतिनिधीनीचे लक्ष वेधले. या वृत्ताची दखल चिमूर विधानसभेचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी घेतली. त्यांनी तातडीने तहसील कार्यालयात याबाबत आढावा बैठक घेतली. कोलारा गावाला हागणदारीमुक्त, स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टीने रोडच्या लगतचे शेनखताचे खड्डे हटवित रोड चकाचक करण्याच्या सूचना या बैठकीत अधिकाऱ्यांना व गावाच्या सरपंचांना दिल्या. यामुळे कोलारा गावातून व्याघ्र प्रकल्पाकडे जाणारा रस्ता आता चकाचक होणार असून पर्यटकांना घाणीपासून मुक्ती मिळणार आहे.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची प्रसिद्धी साता समुद्रापलिकडे पोहचली असली तरी प्रकल्पाला लागून असलेल्या दोन हजार लोकसंख्याच्या गावाला अनेक समस्यांनी वेढले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते, नाल्या, स्वच्छता, लाईटची व्यवस्था या प्राथमिक सुविधेसह रोजगाराचीसुद्धा समस्या मोठ्या प्रमाणात आहे. व्याघ्र प्रकल्पामुळे काही युवकांना जिप्सी व गाईडच्या माध्यमातून रोजगार मिळाला. मात्र गावातील मजुरांना बांबूचा पुरवठा करता येत नसल्याने बांबूवर अवलंबून असलेल्या मजुरांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. गावाला बफर झोनचे क्षेत्र नसल्यामुळे एखादी दुर्घटना झाल्यास मोबदलासुद्धा मिळत नाही. मात्र गावाकऱ्यांना शेतीसाठी व इतर कामासाठी बफर झोनमध्ये जावेच लागते. यामुळे गावकऱ्यांची इकडे- आड- तिकडे विहीर, अशी अवस्था झाली आहे. यासह नळाच्या पाण्याची समस्यासुद्धा अनेक दिवसांपासून गावात आहे. तसेच आरोग्य उपकेंद्र नावालाच असल्याने आरोग्यासह शिक्षणाचीसुद्धा मोठी समस्या गावकऱ्यांपुढे आहे.जगाच्या पटलावर आलेल्या कोलारी गावाच्या समस्यांबाबत लोकमतने सातत्याने दोन दिवस वृत्त प्रकाशित केले. याची प्रशासनानेही दखल घेत कोलारा गावाच्या प्राथमिक सुविधा सोडविण्यास पुढाकार घतला असून गावाचा मुख्य रस्ता स्वच्छ - सुंदर करण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केला जाणार आहे. कोलारा गावावरुन देश-विदेशातील पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येतात. त्यामुळे या गावातील मुख्य रस्त्याच्या लगत असलेले खताचे खड्डे हटवून महसूल विभागाची दुसरी जागा देण्यात येणार आहे. गावापासून गेटपर्यंत दोन्ही बाजूने वृक्ष लावण्यात येणार आहेत. तसेच गावातील पाठी पुरवठा योजनाही कार्यान्वित करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. या गावाकडे विशेष लक्ष देवून स्वच्छ सुंदर व हागणदारी मुक्त करण्याचा प्रयत्न गावकऱ्यांच्या सहभागातून करणार आहोत.- कीर्तीकुमार भांगडिया, आमदार,चिमूर विधानसभा क्षेत्र