शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

युती सरकारला शिवसैनिकांकडून घरचा अहेर

By admin | Updated: March 8, 2015 00:35 IST

राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे आत्महत्येच्या मार्गाला लागला असताना राज्यातील युती सरकार आणि केंद्रातील भाजपा नेतृत्वातील सरकार केवळ शेतकऱ्यांची उपेक्षाच करीत आहे, ...

चंद्रपूर: राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे आत्महत्येच्या मार्गाला लागला असताना राज्यातील युती सरकार आणि केंद्रातील भाजपा नेतृत्वातील सरकार केवळ शेतकऱ्यांची उपेक्षाच करीत आहे, असा आरोप करीत चंद्रपुरात शिवसैनिकांनी चक्क आंदोलनादरम्यान निषेधात्मक मुंडन करून आपल्याच सरकारला घरचा अहेर दिला.आपल्या पूर्वनियोजित आंदोलनानुसार शिवसेना आमदार तथा जिल्हाध्यक्ष बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे देण्यात आले. या दरम्यान सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त करून घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकारला एक निवेदनही पाठविण्यात आले.शिवसेनेने आंदोलनादरम्यान केलेल्या मागण्यांमध्ये भूसंपादन विधेयक रद्द करण्याची प्रमुख मागणी आहे. यासोबतच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत ९ हजार रुपये मदत, अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत द्या, औद्योगिक जिल्ह्यामुळे प्रदूषण असल्याने कर्मचाऱ्यांना प्रदूषण भत्ता तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रदूषणामुळे नुकसान होत असल्याने शेतपिकांना मोबदला, स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्यांचे निराकरण आदी मागण्यांचा समावेश आहे. सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत धरणा देण्यात आला. यात आमदार बाळू धानोरकर, सतीश भिवगडे, अनिल धानोरकर, दिलीप कपूर, किशोर जोरगेवार, राजू महाजन, बाळू चिंचोलकर, नितीन मत्ते, अनिल वनकर, प्रतिभा धानोरकर, कुसुम उदार, विलास डांगे, गजानन बुटके, प्रफुल्ल चटकी, भास्कर ताजणे, सचिन भोयर आदींचा प्रामुख्याने समावेश होता. (नगर प्रतिनिधी)