शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

युती सरकारला शिवसैनिकांकडून घरचा अहेर

By admin | Updated: March 8, 2015 00:35 IST

राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे आत्महत्येच्या मार्गाला लागला असताना राज्यातील युती सरकार आणि केंद्रातील भाजपा नेतृत्वातील सरकार केवळ शेतकऱ्यांची उपेक्षाच करीत आहे, ...

चंद्रपूर: राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे आत्महत्येच्या मार्गाला लागला असताना राज्यातील युती सरकार आणि केंद्रातील भाजपा नेतृत्वातील सरकार केवळ शेतकऱ्यांची उपेक्षाच करीत आहे, असा आरोप करीत चंद्रपुरात शिवसैनिकांनी चक्क आंदोलनादरम्यान निषेधात्मक मुंडन करून आपल्याच सरकारला घरचा अहेर दिला.आपल्या पूर्वनियोजित आंदोलनानुसार शिवसेना आमदार तथा जिल्हाध्यक्ष बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे देण्यात आले. या दरम्यान सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त करून घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकारला एक निवेदनही पाठविण्यात आले.शिवसेनेने आंदोलनादरम्यान केलेल्या मागण्यांमध्ये भूसंपादन विधेयक रद्द करण्याची प्रमुख मागणी आहे. यासोबतच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत ९ हजार रुपये मदत, अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत द्या, औद्योगिक जिल्ह्यामुळे प्रदूषण असल्याने कर्मचाऱ्यांना प्रदूषण भत्ता तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रदूषणामुळे नुकसान होत असल्याने शेतपिकांना मोबदला, स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्यांचे निराकरण आदी मागण्यांचा समावेश आहे. सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत धरणा देण्यात आला. यात आमदार बाळू धानोरकर, सतीश भिवगडे, अनिल धानोरकर, दिलीप कपूर, किशोर जोरगेवार, राजू महाजन, बाळू चिंचोलकर, नितीन मत्ते, अनिल वनकर, प्रतिभा धानोरकर, कुसुम उदार, विलास डांगे, गजानन बुटके, प्रफुल्ल चटकी, भास्कर ताजणे, सचिन भोयर आदींचा प्रामुख्याने समावेश होता. (नगर प्रतिनिधी)