शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलितून जातो बंद उद्योगांनाही कोळसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

फ्युल सप्लाय करारनामा (एफएसए) नुसार वकोलि महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाने दिलेल्या उद्योगांच्या यादीनुसार राज्यातील सुमारे ४०० लघू उद्योगांना दर महिन्याला ६० हजार मेट्रीक टन कोळशाची आवश्यकता आहे. यामध्ये काही उद्योग बंद तर काही बोगस उद्यांगांचाही समावेश आहे. मंदी व इतर कारणास्तव महाराष्ट्रातील ३० टक्के उद्योगच व्यवस्थित सुरू असून ७० टक्के उद्योग बंद आहेत.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी । तक्रारकर्त्यालाच जिवे मारण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वेकोलितून बंद असलेल्या लघू उद्योगांनाही कोळसा पुरवठा होत असल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणाऱ्या दीपक दीक्षित यांना एका व्हॉटस्अ‍ॅप कॉलच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी १९ मार्च रोजी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. दीक्षित यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत कोट्यवधी रुपयांचा कोळसा घोटाळा होत असल्याची बाब नमुद केली आहे.फ्युल सप्लाय करारनामा (एफएसए) नुसार वकोलि महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाने दिलेल्या उद्योगांच्या यादीनुसार राज्यातील सुमारे ४०० लघू उद्योगांना दर महिन्याला ६० हजार मेट्रीक टन कोळशाची आवश्यकता आहे. यामध्ये काही उद्योग बंद तर काही बोगस उद्यांगांचाही समावेश आहे. मंदी व इतर कारणास्तव महाराष्ट्रातील ३० टक्के उद्योगच व्यवस्थित सुरू असून ७० टक्के उद्योग बंद आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ व वेकोलि अधिकाऱ्यांच्या संगणमताने सुमारे ४२ हजार मे. टन कोळसा काळ्या बाजारात जात आहे. अधिकारी, दलाल व कोल माफिया हा कोळसा ७ हजार रुपये मे.टन ने खुल्या बाजारात विकत असून याची अंदाजे किमत ३१ कोटींच्या घरात आहे. ज्यामधून १० कोटी वजा जाता प्रत्येक महिन्याला २१ कोटी रुपये महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, वेकोलि अधिकारी, दलाल व कोल माफिया कमवत आहे. अशी तक्रार करून प्रकरणाची एसआयटी गठित करून वा केंद्र सरकारच्या अधिनस्त सीबीआयमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी दीपक भारतसिंह दीक्षित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या तक्रारीमुळे कोळसा माफियांचे धाबे दणाणले आहे. परिणामी तक्रारकर्ते दीपक दीक्षित यांनी शहजाद नावाने असलेल्या व्हॉटस्अ‍ॅप क्रमांकावर कॉल करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दरम्यान कॉल करणाऱ्या इसमाने महाराष्ट्र मायनिंग कार्पोरेशनच्या कोळसा घोटाळासंबंधी तुने तक्रार केल्यामुळे डब्लूसीएलने कोळसा देणे बंद केले आहे. त्यामुळे आम्हा चौघांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले असून आमचे कोळशाचे काम बंद झाले आहे. यावेळी अश्लाघ्य शब्दांचा वापर करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दीपक दीक्षित यांनी १९ मार्च रोजी रामनगर पोलीस ठाण्यात केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मात्र अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.