शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

राजुरा विधानसभा क्षेत्रातील १० कंपन्या बंद

By admin | Updated: April 14, 2016 01:11 IST

राजुरा विधानसभा क्षेत्रातील विकासाची कडी जुळत असताना मागील दशकात राजुरा विधानसभा क्षेत्रातील जवळपास १० कंपन्या बंद झाल्या.

कंपनीमालक गेले कुठे ? : दोन हजार कामगारांवर उपासमारीची पाळीराजुरा : राजुरा विधानसभा क्षेत्रातील विकासाची कडी जुळत असताना मागील दशकात राजुरा विधानसभा क्षेत्रातील जवळपास १० कंपन्या बंद झाल्या. यामुळे दोन हजार कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे.कंपन्या सुरू करताना बँकेचे ऋण घेऊन कोट्यवधीची सबसीडी काही कंपन्यांनी हडप करून पसार झाले आहे. त्यामुळे या भागातील सुशिक्षित बेरोजगार आणि ज्याच्या शेतजमिनी या कंपन्यांनी घेतल्या, त्या शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.नुकतेच कोरपना तालुक्यातील मुर्ली अ‍ॅग्रो कंपनीने टाळेबंदी घोषित केली. हजारो कार्यरत कर्मचारी बेरोजगार झाले. याला जबाबदार कोण? कंपनी सुरू करताना एखादा उद्देश असतो आणि कंपनीचा शुभारंभ होतो. कालांतराने ही कंपनी बंद पडते. मग शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या असतील तर त्या नोकऱ्या गेल्या. आता हे बेरोजगाार युवक जगणार कसे, हा प्रश्न आहे. कंपनी बंद करण्यात कोण जबाबदार आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. राजुरा तालुक्यातील चुनाळा येथे हरिगंगा सिमेंट कंपनी सुरू झाली. काही काळानंतर बंद झाली. चुनाळा परिसरातील अनेकांच्या जमिनी गेल्या. परिसरातील नागरिकांचे रोजगार गेले. मात्र या कंपनीच्या मालकावर अजूनपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. जोपर्यंत कडक उद्योग धोरण राहणार नाही, तोपर्यंत बेरोजगारांची, शेतकऱ्यांची अशीच थट्टा होत राहील. हरिगंगा सिमेंट कंपनी बंद झाल्यानंतर याच ठिकाणी गुप्ता मेटल सुरू झाले. काही वर्षानंतर मोठा अपघात झाला. अनेकांना प्राण गमवावे लागले. याचीसुद्धा योग्य चौकशी झाली नाही.चुनाळ्यातील असे शेतकरी ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांचे हाल झाले आहे. या भागातील नागरिकांची थट्टा होत असताना एक राजकीय नेता पुढे येऊन कंपनी बुडविणाऱ्या मालकावर कारवाईची मागणी करत नाही, फक्त मागणी करून आजच्या काळात काहीच होत नाही, जनहित याचिका टाकावी लागते, हेदेखील पुढाऱ्यांना कळायला हवे.राजुरा विधानसभा क्षेत्रामधील कंपन्यांना शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी देण्याचा करारा झाला. शेतकरी हतबल झाला तरी चालेल; पण कंपन्यांचे हित जोपासले जाते. टॅक्समध्येसुद्धा सुट देण्यात आली. यातून राजकीय नेते कंपन्यांची पाठराखन करीत आहे. (शहर प्रतिनिधी)