शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
3
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
4
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
5
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
6
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
7
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
8
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
9
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
10
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
11
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
12
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
13
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
14
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
15
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
16
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
17
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
18
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
19
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
20
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित

राजुरा विधानसभा क्षेत्रातील १० कंपन्या बंद

By admin | Updated: April 14, 2016 01:11 IST

राजुरा विधानसभा क्षेत्रातील विकासाची कडी जुळत असताना मागील दशकात राजुरा विधानसभा क्षेत्रातील जवळपास १० कंपन्या बंद झाल्या.

कंपनीमालक गेले कुठे ? : दोन हजार कामगारांवर उपासमारीची पाळीराजुरा : राजुरा विधानसभा क्षेत्रातील विकासाची कडी जुळत असताना मागील दशकात राजुरा विधानसभा क्षेत्रातील जवळपास १० कंपन्या बंद झाल्या. यामुळे दोन हजार कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे.कंपन्या सुरू करताना बँकेचे ऋण घेऊन कोट्यवधीची सबसीडी काही कंपन्यांनी हडप करून पसार झाले आहे. त्यामुळे या भागातील सुशिक्षित बेरोजगार आणि ज्याच्या शेतजमिनी या कंपन्यांनी घेतल्या, त्या शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.नुकतेच कोरपना तालुक्यातील मुर्ली अ‍ॅग्रो कंपनीने टाळेबंदी घोषित केली. हजारो कार्यरत कर्मचारी बेरोजगार झाले. याला जबाबदार कोण? कंपनी सुरू करताना एखादा उद्देश असतो आणि कंपनीचा शुभारंभ होतो. कालांतराने ही कंपनी बंद पडते. मग शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या असतील तर त्या नोकऱ्या गेल्या. आता हे बेरोजगाार युवक जगणार कसे, हा प्रश्न आहे. कंपनी बंद करण्यात कोण जबाबदार आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. राजुरा तालुक्यातील चुनाळा येथे हरिगंगा सिमेंट कंपनी सुरू झाली. काही काळानंतर बंद झाली. चुनाळा परिसरातील अनेकांच्या जमिनी गेल्या. परिसरातील नागरिकांचे रोजगार गेले. मात्र या कंपनीच्या मालकावर अजूनपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. जोपर्यंत कडक उद्योग धोरण राहणार नाही, तोपर्यंत बेरोजगारांची, शेतकऱ्यांची अशीच थट्टा होत राहील. हरिगंगा सिमेंट कंपनी बंद झाल्यानंतर याच ठिकाणी गुप्ता मेटल सुरू झाले. काही वर्षानंतर मोठा अपघात झाला. अनेकांना प्राण गमवावे लागले. याचीसुद्धा योग्य चौकशी झाली नाही.चुनाळ्यातील असे शेतकरी ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांचे हाल झाले आहे. या भागातील नागरिकांची थट्टा होत असताना एक राजकीय नेता पुढे येऊन कंपनी बुडविणाऱ्या मालकावर कारवाईची मागणी करत नाही, फक्त मागणी करून आजच्या काळात काहीच होत नाही, जनहित याचिका टाकावी लागते, हेदेखील पुढाऱ्यांना कळायला हवे.राजुरा विधानसभा क्षेत्रामधील कंपन्यांना शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी देण्याचा करारा झाला. शेतकरी हतबल झाला तरी चालेल; पण कंपन्यांचे हित जोपासले जाते. टॅक्समध्येसुद्धा सुट देण्यात आली. यातून राजकीय नेते कंपन्यांची पाठराखन करीत आहे. (शहर प्रतिनिधी)