शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

बंद रेल्वे गेटमुळे नागरिक त्रस्त

By admin | Updated: July 30, 2015 00:59 IST

राजुरा रेल्वे गेट बंद असल्यामुळे नागरिकांना अनेक वर्षांपासून अडचणीचा सामना करावा लागत आहे.

देवाडा : राजुरा रेल्वे गेट बंद असल्यामुळे नागरिकांना अनेक वर्षांपासून अडचणीचा सामना करावा लागत आहे. अनेकवेळा हे फाटक बंद राहत असते. या मार्गात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र असून देवाडा- चिंचोली, विरुर स्टे. व जिवती तालुक्यातील नागरिक याच मार्गाने जातात.महाराष्ट्राच्या सीमेला तेलंगाणा राज्याची सीमा असून तेलंगाणाच्या रुग्णवाहिकेलाही फाटक उघडेपर्यंत ताटकळत राहावे लागत असते. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. देवाडाच्या २० कि.मी अंतरावर राजुरा मार्गावर एक रेल्वे गेट आहे. या मार्गावरुन नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहनांचे आवागमन होत असते. मात्र या वर्दळीच्या मार्गावरील रेल्वे गेट नेहमीच अनेकवेळा बंद राहते. त्यामुळे या ठिकाणी अनेक वेळा वाहतुकीची कोंडी निर्माण होते. याचा फटका अनेक नागरिकांना बसत असतो. त्यामुळे रेल्वे गेट सध्या नागरिकांसाठी डोकेदुखीचे ठरले आहे. राजुरा तालुक्यातील ग्रामीण भागात वेगवेगळे ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असून रुग्णांना उपचार करण्याकरीता त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये भरती करण्यात येतो. परंतु आरोग्य केंद्रात औषधीच्या साठा नसल्यामुळे त्यांना पुढील उपचार करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय राजुरा किंवा जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात येतो. नेहमीप्रमाणे राजुरा मार्गावरील रेल्वे गेट सतत बंद राहत असल्याने त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होते. यासोबतच कॉलेज, शासकीय आयटीआय, एस.टी. महामंडळ आगार, वनविभाग बगिचा, पोलीस विभाग कार्यालय, न्यायमंदिर, तहसील कार्यालयात पोहचण्यात या गेटमुळे अडचणी येत असतात. येथे व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)