शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

वीज केंद्रातील एक संच बंद करा

By admin | Updated: November 7, 2015 00:43 IST

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील संच क्र. २ हा प्रदूषणाच्या मापदंडापेक्षा अधिक प्रदूषण करीत असल्याने स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

संच अति प्रदूषित : प्रदूषणविषयक संमती मूल्यांकन समितीचे आदेशचंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील संच क्र. २ हा प्रदूषणाच्या मापदंडापेक्षा अधिक प्रदूषण करीत असल्याने स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. चंद्रपुरातील विविध सामाजिक तसेच पर्यावरण संरक्षण व संवर्धनाशी निगडित असलेल्या संस्था व संघटना सदर केंद्र तातडीने बंद करण्याची मागणी सातत्याने करीत होते. या मागणीची दखल घेऊन प्रदूषणविषयक संमती मूल्यांकन समितीने हा संच बंद करण्याचे आदेश दिले आहेत.या संचामुळे होत असलेल्या प्रदूषणाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करुन हे संच तातडीने बंद करण्याच्या आवश्यकतेवर भर देऊन तसे निर्देश या समितीने प्रदूषण नियंत्रण मंडळास दिले असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांना प्रदूषण नियंत्रण व पर्यावरणविषयक आढावा बैठकीत देण्यात आली. यावेळी ना. अहीर यांनी संच क्र. २ बंद करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले.अहीर यांनी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रास आकस्मिक भेट देऊन अतिप्रदूषित असलेल्या या संचाची पाहणी केली होती. तसेच या संचामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या तीव्रतेची माहिती घेतली होती. केंद्रीय मंत्री महोदयांच्या या भेटीची गांभीर्याने दखल घेवून उपरोक्त निर्णयाप्रत संमती मुल्यांकन समिती पोहचली असून सदर संच बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.या आढावा बैठकीत भद्रावती तालुक्यातील चारगाव व तेलवासा या गावांना प्रत्यक्ष भेट देवून वेकोलिच्या ब्लास्टिंगमुळे तेथील घरांना पडलेल्या भेगांची पाहणी करुन या संबंधातील अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशही अहीर यांनी संबंधित अधिकारी व जिल्हा प्रशासनास दिले. प्रशासनाने अहवाल सादर केल्यानंतर आपण ब्लास्टिंगबाबत वेकोलि अधिकाऱ्यांशी चर्चा करुन हा प्रकार थांबविण्याच्या सूचना करु, असेही ते म्हणाले. यावेळी अंबुजा सिमेंट उद्योगाद्वारे जाळण्यात आलेल्या विघातक रासायनिक पदार्थाच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने या गंभीर प्रकरणाची चौकशी करुन नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी याच उद्योगाने आपल्या कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी ट्युबवेलची निर्मिती केल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या विहीरी तसेच ट्युबवेलच्या पाण्याची पातळी खालावली आहे. याबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी असल्याने त्याबाबतही प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.या आढावा बैठकीत ना. अहीर यांनी इरई नदीचे संरक्षण व संवर्धनासाठी वेकोलि प्रबंधनाद्वारा स्थानिक पठाणपुरा गेटच्या बाहेरील इरई नदीचे पात्र वळविले असल्याने या नदीचे अस्तित्व धोक्यात असून याबाबत जिल्हा प्रशासनाने मोक्का चौकशी करुन नदीचे अस्तित्व बचावण्यासाठी कडक उपाययोजना अंमलात आणाव्यात असे निर्देश दिलेत.या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी पी.एम. जोशी, पर्यावरण तज्ज्ञ प्रा. सुरेश चोपणे, प्रा. सचिन वझलवार, भाजपाचे जिल्हा सचिव राहुल सराफ, ओम मांडवकर, मनपाच्या झोन सभापती अंजली घोटेकर, सुभाष कासनगोट्टूवार यांच्यासह अनेक विभागाचे प्रमुख व शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)