शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

धानोऱ्यातील ‘फिल्टर प्लांट’ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:53 IST

चिचाळा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत आठ गावांना पाणी पुरवठा केला जातो. पाणी शुद्ध करण्यासाठी धानोरा येथे ‘फिल्टर प्लांट’ लावण्यात आले आहे. सदर प्लांट मागील सहा महिन्यांपासून बंद आहे.

ठळक मुद्देआठ गावे तहानलेली : नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चिचाळा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत आठ गावांना पाणी पुरवठा केला जातो. पाणी शुद्ध करण्यासाठी धानोरा येथे ‘फिल्टर प्लांट’ लावण्यात आले आहे. सदर प्लांट मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यातच दररोज पाईपलाईन लिकेज होण्याचे प्रकार घडत असल्याने परिसरातील आठ गावांमध्ये पाण्याची बोंब सुरु आहे. पाण्यासाठी भटंकती सुरु आहे.चंद्रपूर तालुक्यातील शेणगाव, वेंढली, चिंचाळा, वांढरी, नागाळा, पिपरी, धानोरा आणि सिदूर गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने चिचाळा प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु केली. काही वर्षे सुरळीत चाललेल्या या योजनेला आता ग्रहण लागले आहे. योजनेतील पाणी शुद्ध करण्यासाठी धानोरा येथे फिल्टर प्लांट आहे. मात्र हा प्लांट गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. येथे दोन मोटारपंप होते. त्यातील एक चोरी झाली आहे. सध्या एकच सुरुच आहे. पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकण्यात येत नाही. मोटारपंपाच्या शेजारी मातीचा गाळ जमा आहे. त्यामुळे अशुद्ध पाणीपुरवठा सुरु आहे. फिल्टर प्लांटची देखरेख करण्यासाठी कर्मचाºयांची नियुक्ती करणे आवश्यक होते.मात्र, येथे कोणत्याही कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली नाही. याकडे प्लांटकडे कुणाचेच लक्ष नसल्याने हा प्लांट बंद स्थितीत आहे. या परिसरात उद्योग आहेत. त्यामुळे जडवाहतूक दिवसरात्र सुरु राहते. पाईपलाईनवरुन वाहने गेल्याबरोबर ती लिक होत आहे. ही समस्या दररोजची असल्याने या आठ गावात सध्या पाण्यासाठी बोंबाबोंब सुरु आहे. शेणगाव, वांढरी येथील पाणीपुरवठा महिन्याभरापासून ठप्प आहे.अन्य गावातही कमी जास्त प्रमाणावर अशीच परिस्थिती आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सोमवारी समाजकल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे यांच्या कक्षात पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, आठही गावच्या सरपंच, सचिवांची बैठक पार पडली.या बैठकीत सरपंचानी फिल्टर प्लांट, पाईपलाईन लिकेज, एकच मोटारपंप यासह अन्य प्रश्न मांडून अधिकाºयांना हैराण केले. यावेळी सभापती ब्रिजभुषण पाझारे यांनी उपविभागीय अभियंता पराते यांची चांगलीच कानउघाडणी करुन समस्या सोडविण्यास सांगितले.