शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

चंद्रपूर जिल्ह्यात बैल बाजार सुरू होण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 12:19 IST

पणन संचालनालयाने काही अटी लागू करून चंद्रपूर जिल्ह्यात बैल बाजार सुरू करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधक व बाजार समितीच्या सभापतींना दिल्या आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील बैलबाजार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्दे पणन संचालनालयाने दिली परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे बैल बाजार भरविण्यास प्रशासनाने बंदी घातली. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात थोडी शिथिलता मिळाल्यामुळे काही प्रमाणात आर्थिक व्यवहार सुरू झाले. मात्र बैल बाजाराअभावी शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली होती. यावर पर्याय म्हणून पणन संचालनालयाने काही अटी लागू करून बैल बाजार सुरू करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधक व बाजार समितीच्या सभापतींना दिल्या आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील बैलबाजार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी बैलजोडीच्याच सहाय्यानेच शेती करतात. खरीब आणि रब्बी हे दोन्हीही हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकरी बैलजोडीची अदलाबदल करतात. ज्या शेतकऱ्यांकडे शेतीउपयोगी क्षमता नसलेले बैल नसतात, असे शेतकरी ऐन हंगामात बैल बाजारातून बैल खरेदी करतात. यंदा कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले. त्याचा जोरदार फटका बैलबाजाराला बसला. शेतकऱ्यांना ऐन शेतीच्या हंगामात बैल विकत घेण्याचे मार्ग बंद झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या मशागतीची कामे कशी करावी, यासाठी धावपळ सुरू केली. बºयाच शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता नसल्याने ते ट्रॅक्टरद्वारे मशागतीची कामे करू शकत नाही. असे शेतकरी बाजारातून बैल विकत घेतात. यंदा बैल बाजार बंद असल्याने काही शेतकऱ्यांची मशागतीची कामे अजूनही पूर्ण झाली नाही. कृषी उत्पन्न बाजार समित्यांद्वारे जिल्ह्यातील बैल बाजार चालविले जातात. यातून बाजार समित्यांना बऱ्यापैकी महसूल मिळतो. कोरोनामुळे समित्यांचेही नुकसान झाले.लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील बैल बाजार बंद होते. यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली होती. मशागतीची कामे कशी करावी, असा प्रश्न काही शेतकऱ्यांना पडला होता.बैल बाजार सुरू झाल्यास शेती हंगामामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.-दिनेश चोखारे,सभापती, कृषी उत्पन्नबाजार समिती ,चंद्रपूर

प्रतिबंधात्मक खबरदारी घ्यावी लागणारशेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन पणन संचालनालयाने बैल बाजार सुरू करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधक व बाजार समित्यांना दिल्या. मात्र स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी प्रतिबंधात्मक खबरदारीच्या दृष्टीने निर्देश देणार आहे. बैलबाजार चालविणाऱ्या संस्थांना या निर्देशाचे पालन करावे लागणार आहे. जिल्ह्यात राजुरा, कोरपना, वरोरा, जिवती यासोबतच नागभीड, सिंदेवाही या तालुक्यांमध्ये मोठ्या संख्येने बैलबाजार भरतात.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसagricultureशेती