शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

चंद्रपूर जिल्ह्यात बैल बाजार सुरू होण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 12:19 IST

पणन संचालनालयाने काही अटी लागू करून चंद्रपूर जिल्ह्यात बैल बाजार सुरू करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधक व बाजार समितीच्या सभापतींना दिल्या आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील बैलबाजार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्दे पणन संचालनालयाने दिली परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे बैल बाजार भरविण्यास प्रशासनाने बंदी घातली. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात थोडी शिथिलता मिळाल्यामुळे काही प्रमाणात आर्थिक व्यवहार सुरू झाले. मात्र बैल बाजाराअभावी शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली होती. यावर पर्याय म्हणून पणन संचालनालयाने काही अटी लागू करून बैल बाजार सुरू करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधक व बाजार समितीच्या सभापतींना दिल्या आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील बैलबाजार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी बैलजोडीच्याच सहाय्यानेच शेती करतात. खरीब आणि रब्बी हे दोन्हीही हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकरी बैलजोडीची अदलाबदल करतात. ज्या शेतकऱ्यांकडे शेतीउपयोगी क्षमता नसलेले बैल नसतात, असे शेतकरी ऐन हंगामात बैल बाजारातून बैल खरेदी करतात. यंदा कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले. त्याचा जोरदार फटका बैलबाजाराला बसला. शेतकऱ्यांना ऐन शेतीच्या हंगामात बैल विकत घेण्याचे मार्ग बंद झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या मशागतीची कामे कशी करावी, यासाठी धावपळ सुरू केली. बºयाच शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता नसल्याने ते ट्रॅक्टरद्वारे मशागतीची कामे करू शकत नाही. असे शेतकरी बाजारातून बैल विकत घेतात. यंदा बैल बाजार बंद असल्याने काही शेतकऱ्यांची मशागतीची कामे अजूनही पूर्ण झाली नाही. कृषी उत्पन्न बाजार समित्यांद्वारे जिल्ह्यातील बैल बाजार चालविले जातात. यातून बाजार समित्यांना बऱ्यापैकी महसूल मिळतो. कोरोनामुळे समित्यांचेही नुकसान झाले.लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील बैल बाजार बंद होते. यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली होती. मशागतीची कामे कशी करावी, असा प्रश्न काही शेतकऱ्यांना पडला होता.बैल बाजार सुरू झाल्यास शेती हंगामामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.-दिनेश चोखारे,सभापती, कृषी उत्पन्नबाजार समिती ,चंद्रपूर

प्रतिबंधात्मक खबरदारी घ्यावी लागणारशेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन पणन संचालनालयाने बैल बाजार सुरू करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधक व बाजार समित्यांना दिल्या. मात्र स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी प्रतिबंधात्मक खबरदारीच्या दृष्टीने निर्देश देणार आहे. बैलबाजार चालविणाऱ्या संस्थांना या निर्देशाचे पालन करावे लागणार आहे. जिल्ह्यात राजुरा, कोरपना, वरोरा, जिवती यासोबतच नागभीड, सिंदेवाही या तालुक्यांमध्ये मोठ्या संख्येने बैलबाजार भरतात.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसagricultureशेती