शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छता ही सेवा’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:49 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागामार्फत संपूर्ण देशात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ शनिवारी जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र वढा या गावातून करण्यात आला.

ठळक मुद्देप्रत्येक गावात श्रमदान : १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबरपर्यंत जिल्हाभर अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपुर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागामार्फत संपूर्ण देशात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ शनिवारी जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र वढा या गावातून करण्यात आला.नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबतची व्यापक जनजागृती करण्यासाठी सर्वांना स्वच्छतेची शपथ देऊन ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाअंतर्गत स्वच्छ आरोग्यपूर्ण आणि नवीन भारताच्या निर्मितीसाठी पूर्ण निष्ठेने आपला परिसर, कार्यालय, सार्वजनिक स्थळी स्वच्छता ठेवण्याचा तसेच स्वच्छतेची आवड अधिकाधिक निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा सर्वांनी संकल्प करावा. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान १५ सप्टेंबर ते २ आक्टोंबर २०१८ या कालावधीत यशस्वीरित्या राबवावयाचे आहे. त्या दृष्टीने जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व कार्यालये, शाळा, गावांमधील परिसर स्वच्छ सोयींयुक्त करण्यासाठी या अभियानात प्रत्येकाने सक्रियरित्या सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.जिल्ह्यातील सर्व गावे स्वच्छ करण्याच्या दृष्टीने या अभियानांतर्गत ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामविकास अधिकारी, गटसमन्वयक, समुहसमन्वयक, आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, रोजगार सेवक हे या अभियानाचे संवादक म्हणून गावातील लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतींचे सदस्य, सरपंच, विद्यार्थी, पालक यांच्याशी संवाद साधून स्वच्छतेचे महत्व पटवून देत या अभियानात होणाऱ्या विविध उपक्रमात सर्वांना उत्स्फुर्तपणे सहभागी करुन घेण्यात येणार आहे.गाव आणि तालुका पातळीवर स्वच्छता मेळाव्याचे आयोजन, शौचालयांना शंभर टक्के वापर करणाºया ग्रामपंचायतीतील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, गावकरी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. गृहभेटी अंतर्गत आंतरव्यक्ती संवादातून उदबोधन, शौचालय वापर, ग्रामस्तरीय वातावरण निर्मितीसाठी ग्रामसभा घेणे, कलापथकाच्या माध्यमातून लघुपट दाखविणे, शालेय विघ्यार्थ्यांची गावातुन स्वच्छता फेरी, गावातील ग्रामस्थांनी गावातच श्रमदान करणे, गावातील सार्वजनिक शौचालय, बसस्थानक, बाजाराची ठिकाणे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, पाण्याच्या स्रोतांचे परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. जनजागृतीवर प्रामुख्याने भर देऊन शालेय स्वच्छता दूत, पाणी व स्वच्छता या विषयांवर वक्तृत्व व निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, या विविध उपकमांचे आयोजन जिल्हा परिषद यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.स्वच्छतेची चळवळ निर्माण व्हावीमागील काही वर्षात जिल्ह्यातील गावागावात स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. शासनाने अतिशय गंभीरतेने यात लक्ष घालून संबंधित प्रशासनाला कामाला लावले आहे. त्यामुळे गावागावात काही प्रमाणात स्वच्छतेवर भर दिला जात आहे. असे असले तरी आणखी अनेक गावात अद्यापही घाणीचे साम्राज्य दिसून येते. त्यामुळे या विषयावर आणखी काम होणे गरजेचे आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज स्वच्छता ही सेवा या अभियानाचा शुभारंभ वढा या तिर्थक्षेत्रापासून करण्यात आला. स्वच्छता ही राष्ट्रभक्ती आहे. त्यामुळे सर्वांनी यात सहभागी होऊन मोठया प्रमाणात लोकसहभाग देऊन व्यापक स्वच्छतेची चळवळ निर्माण करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.