शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

‘स्वच्छता ही सेवा’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:49 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागामार्फत संपूर्ण देशात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ शनिवारी जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र वढा या गावातून करण्यात आला.

ठळक मुद्देप्रत्येक गावात श्रमदान : १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबरपर्यंत जिल्हाभर अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपुर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागामार्फत संपूर्ण देशात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ शनिवारी जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र वढा या गावातून करण्यात आला.नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबतची व्यापक जनजागृती करण्यासाठी सर्वांना स्वच्छतेची शपथ देऊन ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाअंतर्गत स्वच्छ आरोग्यपूर्ण आणि नवीन भारताच्या निर्मितीसाठी पूर्ण निष्ठेने आपला परिसर, कार्यालय, सार्वजनिक स्थळी स्वच्छता ठेवण्याचा तसेच स्वच्छतेची आवड अधिकाधिक निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा सर्वांनी संकल्प करावा. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान १५ सप्टेंबर ते २ आक्टोंबर २०१८ या कालावधीत यशस्वीरित्या राबवावयाचे आहे. त्या दृष्टीने जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व कार्यालये, शाळा, गावांमधील परिसर स्वच्छ सोयींयुक्त करण्यासाठी या अभियानात प्रत्येकाने सक्रियरित्या सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.जिल्ह्यातील सर्व गावे स्वच्छ करण्याच्या दृष्टीने या अभियानांतर्गत ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामविकास अधिकारी, गटसमन्वयक, समुहसमन्वयक, आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, रोजगार सेवक हे या अभियानाचे संवादक म्हणून गावातील लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतींचे सदस्य, सरपंच, विद्यार्थी, पालक यांच्याशी संवाद साधून स्वच्छतेचे महत्व पटवून देत या अभियानात होणाऱ्या विविध उपक्रमात सर्वांना उत्स्फुर्तपणे सहभागी करुन घेण्यात येणार आहे.गाव आणि तालुका पातळीवर स्वच्छता मेळाव्याचे आयोजन, शौचालयांना शंभर टक्के वापर करणाºया ग्रामपंचायतीतील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, गावकरी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. गृहभेटी अंतर्गत आंतरव्यक्ती संवादातून उदबोधन, शौचालय वापर, ग्रामस्तरीय वातावरण निर्मितीसाठी ग्रामसभा घेणे, कलापथकाच्या माध्यमातून लघुपट दाखविणे, शालेय विघ्यार्थ्यांची गावातुन स्वच्छता फेरी, गावातील ग्रामस्थांनी गावातच श्रमदान करणे, गावातील सार्वजनिक शौचालय, बसस्थानक, बाजाराची ठिकाणे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, पाण्याच्या स्रोतांचे परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. जनजागृतीवर प्रामुख्याने भर देऊन शालेय स्वच्छता दूत, पाणी व स्वच्छता या विषयांवर वक्तृत्व व निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, या विविध उपकमांचे आयोजन जिल्हा परिषद यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.स्वच्छतेची चळवळ निर्माण व्हावीमागील काही वर्षात जिल्ह्यातील गावागावात स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. शासनाने अतिशय गंभीरतेने यात लक्ष घालून संबंधित प्रशासनाला कामाला लावले आहे. त्यामुळे गावागावात काही प्रमाणात स्वच्छतेवर भर दिला जात आहे. असे असले तरी आणखी अनेक गावात अद्यापही घाणीचे साम्राज्य दिसून येते. त्यामुळे या विषयावर आणखी काम होणे गरजेचे आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज स्वच्छता ही सेवा या अभियानाचा शुभारंभ वढा या तिर्थक्षेत्रापासून करण्यात आला. स्वच्छता ही राष्ट्रभक्ती आहे. त्यामुळे सर्वांनी यात सहभागी होऊन मोठया प्रमाणात लोकसहभाग देऊन व्यापक स्वच्छतेची चळवळ निर्माण करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.