शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
2
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
3
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
4
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
5
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
6
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
7
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
8
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
9
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
10
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
11
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
12
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
13
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
14
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
15
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
16
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
17
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
18
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
19
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
20
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास

‘स्वच्छता ही सेवा’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:49 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागामार्फत संपूर्ण देशात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ शनिवारी जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र वढा या गावातून करण्यात आला.

ठळक मुद्देप्रत्येक गावात श्रमदान : १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबरपर्यंत जिल्हाभर अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपुर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागामार्फत संपूर्ण देशात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ शनिवारी जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र वढा या गावातून करण्यात आला.नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबतची व्यापक जनजागृती करण्यासाठी सर्वांना स्वच्छतेची शपथ देऊन ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाअंतर्गत स्वच्छ आरोग्यपूर्ण आणि नवीन भारताच्या निर्मितीसाठी पूर्ण निष्ठेने आपला परिसर, कार्यालय, सार्वजनिक स्थळी स्वच्छता ठेवण्याचा तसेच स्वच्छतेची आवड अधिकाधिक निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा सर्वांनी संकल्प करावा. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान १५ सप्टेंबर ते २ आक्टोंबर २०१८ या कालावधीत यशस्वीरित्या राबवावयाचे आहे. त्या दृष्टीने जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व कार्यालये, शाळा, गावांमधील परिसर स्वच्छ सोयींयुक्त करण्यासाठी या अभियानात प्रत्येकाने सक्रियरित्या सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.जिल्ह्यातील सर्व गावे स्वच्छ करण्याच्या दृष्टीने या अभियानांतर्गत ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामविकास अधिकारी, गटसमन्वयक, समुहसमन्वयक, आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, रोजगार सेवक हे या अभियानाचे संवादक म्हणून गावातील लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतींचे सदस्य, सरपंच, विद्यार्थी, पालक यांच्याशी संवाद साधून स्वच्छतेचे महत्व पटवून देत या अभियानात होणाऱ्या विविध उपक्रमात सर्वांना उत्स्फुर्तपणे सहभागी करुन घेण्यात येणार आहे.गाव आणि तालुका पातळीवर स्वच्छता मेळाव्याचे आयोजन, शौचालयांना शंभर टक्के वापर करणाºया ग्रामपंचायतीतील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, गावकरी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. गृहभेटी अंतर्गत आंतरव्यक्ती संवादातून उदबोधन, शौचालय वापर, ग्रामस्तरीय वातावरण निर्मितीसाठी ग्रामसभा घेणे, कलापथकाच्या माध्यमातून लघुपट दाखविणे, शालेय विघ्यार्थ्यांची गावातुन स्वच्छता फेरी, गावातील ग्रामस्थांनी गावातच श्रमदान करणे, गावातील सार्वजनिक शौचालय, बसस्थानक, बाजाराची ठिकाणे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, पाण्याच्या स्रोतांचे परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. जनजागृतीवर प्रामुख्याने भर देऊन शालेय स्वच्छता दूत, पाणी व स्वच्छता या विषयांवर वक्तृत्व व निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, या विविध उपकमांचे आयोजन जिल्हा परिषद यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.स्वच्छतेची चळवळ निर्माण व्हावीमागील काही वर्षात जिल्ह्यातील गावागावात स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. शासनाने अतिशय गंभीरतेने यात लक्ष घालून संबंधित प्रशासनाला कामाला लावले आहे. त्यामुळे गावागावात काही प्रमाणात स्वच्छतेवर भर दिला जात आहे. असे असले तरी आणखी अनेक गावात अद्यापही घाणीचे साम्राज्य दिसून येते. त्यामुळे या विषयावर आणखी काम होणे गरजेचे आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज स्वच्छता ही सेवा या अभियानाचा शुभारंभ वढा या तिर्थक्षेत्रापासून करण्यात आला. स्वच्छता ही राष्ट्रभक्ती आहे. त्यामुळे सर्वांनी यात सहभागी होऊन मोठया प्रमाणात लोकसहभाग देऊन व्यापक स्वच्छतेची चळवळ निर्माण करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.