शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

चुना टाकून रामाळा तलावाची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 23:09 IST

येथील गोंडकालीन रामाळा तलावात दरवर्षी निर्माल्य व इतर साहित्य टाकले जात असल्याने तलावात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे.

ठळक मुद्देकचराही काढला : वाल्मिकी मच्छुआ संस्थेचा पुढाकार

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : येथील गोंडकालीन रामाळा तलावात दरवर्षी निर्माल्य व इतर साहित्य टाकले जात असल्याने तलावात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. या अस्वच्छतेमुळे तलावाचे पाणी दूषित झाले. याची दखल घेत तलावाच्या स्वच्छतेसाठी वाल्मिकी मच्छुआ सहकारी संस्था चंद्रपूरच्या पदाधिकाºयांनी पुढाकार घेतला आहे. तलावाच्या पाण्यात चुना टाकून पाणी शुद्ध केले जात असून कचराही काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.रामाळा तलाव स्वच्छ दिसावा म्हणून संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य २३ नोव्हेंबरपासून चुना टाकण्याच्या कामाला लागले होते. संस्थेचे सभापती जगन पचारे, बंडू हजारे, संतोष झा, लक्ष्मण तोकला, किसन पचारे, शंकर बक्कलवार, देवराव मंचर्लावार, दीपक पचारे, वसंता पचारे, देविदास पचारे, रोशन कार्लेकर, राहुल बक्कलवार, राजेश येल्लेवार, उमेश तोक्कलवार, पांडुरंग गावतुरे, आनंदराव कस्तुरे, रवी मंचर्लावार, अशोक दडगेलवार व इतर सदस्य या अभियानात सहभागी झाले.चंद्रपूर शहरात एकमेव गोंड राजाने बांधून ठेवलेला रामाळा तलाव उरला आहे. त्याची निगा राखण्याचे काम शासन-प्रशासनाचे आहे. मात्र प्रशासनाची प्रतीक्षा न करतान मच्छिमार भोई समाजाने तलवाच्या स्वच्छतेला सुरूवात केली आहे. रामाळा तलावात इकार्निया वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढत असते. त्याचप्रमाणे नागरिक प्लॉस्टिकमध्ये भरुन पुजेचे निर्माल्य टाकत असतात.तलावाचे सौंदर्यीकरण झाले तेव्हापासून सायंकाळी फिरण्यास मोठ्या प्रमाणात नागरिक येथे येत असतात. मात्र खाऊच्या पिशव्या तलावात टाकतात. तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात कचरा वाढून झाडे झुडूपेही वाढली. ते साफ करण्याचे काम नेहमी केले जात आहे.शासनाने मदत द्यावीगणेशोत्सव व दुर्गाविसर्जनानंतर वाल्मिकी मच्छुआ सहकारी संस्थेच्या पदाधिकाºयांकडून तलावाची स्वच्छता केली जाते. यात अनेक भोई समाजबांधव सहभागी होतात. मात्र हे काम करित असताना शासनाकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही. त्यामुळे मच्छुआ सहकारी संस्थेच्या सभासदांवर उपासमारीची पाळी येते. त्यामुळे शासनाने संस्थेच्या पदाधिकाºयांना मोबदला द्यावा, असे पांडुरंग गावतुरे यांनी म्हटले आहे.