शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चुना टाकून रामाळा तलावाची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 23:09 IST

येथील गोंडकालीन रामाळा तलावात दरवर्षी निर्माल्य व इतर साहित्य टाकले जात असल्याने तलावात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे.

ठळक मुद्देकचराही काढला : वाल्मिकी मच्छुआ संस्थेचा पुढाकार

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : येथील गोंडकालीन रामाळा तलावात दरवर्षी निर्माल्य व इतर साहित्य टाकले जात असल्याने तलावात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. या अस्वच्छतेमुळे तलावाचे पाणी दूषित झाले. याची दखल घेत तलावाच्या स्वच्छतेसाठी वाल्मिकी मच्छुआ सहकारी संस्था चंद्रपूरच्या पदाधिकाºयांनी पुढाकार घेतला आहे. तलावाच्या पाण्यात चुना टाकून पाणी शुद्ध केले जात असून कचराही काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.रामाळा तलाव स्वच्छ दिसावा म्हणून संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य २३ नोव्हेंबरपासून चुना टाकण्याच्या कामाला लागले होते. संस्थेचे सभापती जगन पचारे, बंडू हजारे, संतोष झा, लक्ष्मण तोकला, किसन पचारे, शंकर बक्कलवार, देवराव मंचर्लावार, दीपक पचारे, वसंता पचारे, देविदास पचारे, रोशन कार्लेकर, राहुल बक्कलवार, राजेश येल्लेवार, उमेश तोक्कलवार, पांडुरंग गावतुरे, आनंदराव कस्तुरे, रवी मंचर्लावार, अशोक दडगेलवार व इतर सदस्य या अभियानात सहभागी झाले.चंद्रपूर शहरात एकमेव गोंड राजाने बांधून ठेवलेला रामाळा तलाव उरला आहे. त्याची निगा राखण्याचे काम शासन-प्रशासनाचे आहे. मात्र प्रशासनाची प्रतीक्षा न करतान मच्छिमार भोई समाजाने तलवाच्या स्वच्छतेला सुरूवात केली आहे. रामाळा तलावात इकार्निया वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढत असते. त्याचप्रमाणे नागरिक प्लॉस्टिकमध्ये भरुन पुजेचे निर्माल्य टाकत असतात.तलावाचे सौंदर्यीकरण झाले तेव्हापासून सायंकाळी फिरण्यास मोठ्या प्रमाणात नागरिक येथे येत असतात. मात्र खाऊच्या पिशव्या तलावात टाकतात. तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात कचरा वाढून झाडे झुडूपेही वाढली. ते साफ करण्याचे काम नेहमी केले जात आहे.शासनाने मदत द्यावीगणेशोत्सव व दुर्गाविसर्जनानंतर वाल्मिकी मच्छुआ सहकारी संस्थेच्या पदाधिकाºयांकडून तलावाची स्वच्छता केली जाते. यात अनेक भोई समाजबांधव सहभागी होतात. मात्र हे काम करित असताना शासनाकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही. त्यामुळे मच्छुआ सहकारी संस्थेच्या सभासदांवर उपासमारीची पाळी येते. त्यामुळे शासनाने संस्थेच्या पदाधिकाºयांना मोबदला द्यावा, असे पांडुरंग गावतुरे यांनी म्हटले आहे.