शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सीमावादात अडकली नाल्याची स्वच्छता

By admin | Updated: January 5, 2015 23:01 IST

गाव, मंदिराचे पावित्र्य जपण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपले घर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सध्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने स्वच्छता अभियान राबविले जात आहे.

सास्ती : गाव, मंदिराचे पावित्र्य जपण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपले घर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सध्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने स्वच्छता अभियान राबविले जात आहे. मात्र राजुरा शहरातील गडचांदूर रस्त्यावर असलेल्या नाल्यातील घाण व अस्वच्छतेमुळे भाविकांसह प्रवाशांचे आरोग्य सांभाळणे कठिण झाले आहे. नाल्याच्या काठावर असलेल्या भवानी मंदिराचे पावित्र्यही धोक्यात आले आहे. राजुरा- गडचांदूर रस्त्यावर राजुरा शहरालगतच मोठा नाला वाहतो. हा नाला राजुरा नगर परिषद व रामपूर ग्रामपंचायतीच्या सिमेवर आहे. नाल्याच्या एका बाजूने राजुरा नगर परिषद व दुसऱ्या बाजूला रामपूर ग्रामपंचायतीची हद्द आहे. याच नाल्याच्या काठावर पुरातन व जागृत भवानी मंदिर आहे. तर नाल्याच्या काठावरच राजुरा, रामपूर व परिसरातील गावांतील नागरिक अंतिमसंस्कार पार पाडतात. नाला शहराच्या अगदी जवळून वाहत असल्यामुळे शहरातील महिला गौरी विसर्जनाकरिता याच ठीकाणी मोठी गर्दी करतात. शहरातील घरगुती गणेश विसर्जनही येथे केले जाते. जंगलातून वाहत येणारा हा नाला नेहमी जिवंत राहत असून या नाल्याला मोठे महत्व आहे. परंतु या नाल्यात राजुरा शहरातील सांडपाणी सोडल्या जात असल्याने तसेच नाल्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. कचरा सडल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.भवानी मंदिरात नागरिक मनशांतीसाठी येतात परंतु दुर्गंधीमुळे मनशांती सोडाच, त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मोक्षधामात येणाऱ्या मृतकांच्या कुटुंबियांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. अंतिमसंस्काराप्रसंगी नाल्याच्या पाण्यात डुबकी मारण्याची प्रभा आहे. परंतु मोक्षधामालगत नाला असूनसुद्धा नाल्यातील अस्वच्छतेमुळे याठिकाणी ही प्रथा पाळता येत नाही. अनेकवेळा मृतकांचे कुटुंबीय दुसरीकडे जात आहे. औद्योगिकरणामुळे राजुरा शहरात मोठ्या प्रमाणात बाहेरून कामगार तसेच इतर व्यावसायिक स्थायिक झाले आहे. अनेकवेळा मोठ्या प्रमाणात कचरा नाल्यात टाकल्या जात आहे. सदर नाला राजुरा नगर परिषद व रामपूर ग्रामपंचायतीच्या सिमेवर असल्यामुळे याची स्वच्छता नेमकी कुणी करायची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याकडे राजुरा नगर परिषद लक्ष द्यायला तयार ना नाही तर ग्रामपंचायतही दुर्लक्ष करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. त्यामुळे शासकीय, निमशासकीय संघटनांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला आहे. परंतु पंतप्रधानाच्या या निर्देशाला मात्र याठिकाणी विसर पडला आहे. (वार्ताहर)