शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

सीमावादात अडकली नाल्याची स्वच्छता

By admin | Updated: January 5, 2015 23:01 IST

गाव, मंदिराचे पावित्र्य जपण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपले घर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सध्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने स्वच्छता अभियान राबविले जात आहे.

सास्ती : गाव, मंदिराचे पावित्र्य जपण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपले घर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सध्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने स्वच्छता अभियान राबविले जात आहे. मात्र राजुरा शहरातील गडचांदूर रस्त्यावर असलेल्या नाल्यातील घाण व अस्वच्छतेमुळे भाविकांसह प्रवाशांचे आरोग्य सांभाळणे कठिण झाले आहे. नाल्याच्या काठावर असलेल्या भवानी मंदिराचे पावित्र्यही धोक्यात आले आहे. राजुरा- गडचांदूर रस्त्यावर राजुरा शहरालगतच मोठा नाला वाहतो. हा नाला राजुरा नगर परिषद व रामपूर ग्रामपंचायतीच्या सिमेवर आहे. नाल्याच्या एका बाजूने राजुरा नगर परिषद व दुसऱ्या बाजूला रामपूर ग्रामपंचायतीची हद्द आहे. याच नाल्याच्या काठावर पुरातन व जागृत भवानी मंदिर आहे. तर नाल्याच्या काठावरच राजुरा, रामपूर व परिसरातील गावांतील नागरिक अंतिमसंस्कार पार पाडतात. नाला शहराच्या अगदी जवळून वाहत असल्यामुळे शहरातील महिला गौरी विसर्जनाकरिता याच ठीकाणी मोठी गर्दी करतात. शहरातील घरगुती गणेश विसर्जनही येथे केले जाते. जंगलातून वाहत येणारा हा नाला नेहमी जिवंत राहत असून या नाल्याला मोठे महत्व आहे. परंतु या नाल्यात राजुरा शहरातील सांडपाणी सोडल्या जात असल्याने तसेच नाल्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. कचरा सडल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.भवानी मंदिरात नागरिक मनशांतीसाठी येतात परंतु दुर्गंधीमुळे मनशांती सोडाच, त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मोक्षधामात येणाऱ्या मृतकांच्या कुटुंबियांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. अंतिमसंस्काराप्रसंगी नाल्याच्या पाण्यात डुबकी मारण्याची प्रभा आहे. परंतु मोक्षधामालगत नाला असूनसुद्धा नाल्यातील अस्वच्छतेमुळे याठिकाणी ही प्रथा पाळता येत नाही. अनेकवेळा मृतकांचे कुटुंबीय दुसरीकडे जात आहे. औद्योगिकरणामुळे राजुरा शहरात मोठ्या प्रमाणात बाहेरून कामगार तसेच इतर व्यावसायिक स्थायिक झाले आहे. अनेकवेळा मोठ्या प्रमाणात कचरा नाल्यात टाकल्या जात आहे. सदर नाला राजुरा नगर परिषद व रामपूर ग्रामपंचायतीच्या सिमेवर असल्यामुळे याची स्वच्छता नेमकी कुणी करायची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याकडे राजुरा नगर परिषद लक्ष द्यायला तयार ना नाही तर ग्रामपंचायतही दुर्लक्ष करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. त्यामुळे शासकीय, निमशासकीय संघटनांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला आहे. परंतु पंतप्रधानाच्या या निर्देशाला मात्र याठिकाणी विसर पडला आहे. (वार्ताहर)