शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या नगरसेवकांचा नगराध्यक्षांना घेराव

By admin | Updated: April 21, 2017 00:58 IST

गेल्या काही दिवसांपासून शहरात पाण्याची समस्या असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

आश्वासनाची पूर्तता नाही : आंदोलनाचा दिला इशारावरोरा : गेल्या काही दिवसांपासून शहरात पाण्याची समस्या असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. त्याकरिता विरोधी गट नेता गजानन मेश्राम यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या नगरसेवकांनी शहरातील विविध समस्या सोडविण्यासंदर्भात जनतेला घेऊन नगराध्यक्ष यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. मोर्चेकरांना नगराध्यक्ष यांनी सर्व समस्या ३ ते ४ दिवसात सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ८ दिवस होऊनही एकही समस्या मार्गी लागली नसल्याने गुरुवारला नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले. नगराध्यक्ष साहेब आश्वासन दिले, पण पूर्तता केव्हा करता? असा सवाल उपस्थित करीत नगराध्यक्षांना त्यांनी घेराव घातला.वरोरा शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी १३ एप्रिलला नगरपालिकेवर शेकडो जनतेला घेऊन मोर्चा काढला होता. गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असून राजीव गांधी वॉर्डात येत्या तीन दिवसात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन तसेच जोपर्यंत ट्यूबवेल लावली जात नाही, तोपर्यंत वॉर्डमध्ये टँकरने पाणी देण्याचे चर्चेत ठरले होते. पण ८ दिवस लोटूनही एकही टँकर आले नसल्याचा आरोप नागरसेवकांनी केला आहे. तसेच शहरातील विविध प्रभागातील नाल्या, मोठे नाले यांची सफाई, अनेक वर्षांपासून वॉर्डात राहत असलेल्या नागरिकांना एटॅक्स लागलेला नाही, त्यांना एटॅक्स लावण्याबाबत, तसेच शहरातील पथदिवे बंद अवस्थेत आहे, शहरातील हातपंप बंद अवस्थेत आहे, अनेक कामांचे उदघाटन झाले आहे; पण कामे सुरु झाली नाहीत, अश्या अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी शिवसेनेने मोर्चा काढला होता व त्यात चर्चे अंती ३ ते ४ दिवसात सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी नगरसेवकांना दिले होते. मात्र आठ दिवस लोटूनही आश्वासनाची पूर्ती न झाल्यामुळे २० एप्रिलला शिवसेना नागसेवकांनी नगराध्यक्ष यांना घेराव घातला. येत्या सात दिवसात सर्व समस्या निकाली निघाल्या नाही तर शिवसेना मोठे आंदोलन करेल व गरज पडल्यास नागपालिकेला कुलूप ठोकण्यासही मागेपुढे बघणार नाही, असा इशारा देण्यात आला.त्यानंतर नगरसेवकांनी नगराध्यक्षांना समस्यांचे निवेदन सादर केले. यावेळी पंकज नाशिककर, चंद्रकला चिमुरकर, राखी गिरडकर, सन्नि गुप्ता, दिनेश यादव, सुषमा भोयर, प्रणाली मेश्राम , गजानन मेश्राम, राशी चौधरी, राजेश महाजन आदी नगरसेवक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी )