शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या वणव्यात होरपळताहेत येनोली (खुर्द) गावचे नागरिक

By admin | Updated: November 3, 2015 00:25 IST

आजच्या स्थितीत राज्यात पसरलेल्या दुष्काळावर मोठी चर्चा सुरू आहे.

हरिशचंद्र पाल तळोधी (बां)आजच्या स्थितीत राज्यात पसरलेल्या दुष्काळावर मोठी चर्चा सुरू आहे. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही गावात दुष्काळ नसून पीक परिस्थिती ठीक असल्याचा निर्वाळा प्रशासकीय यंत्रणा जाहीर करून मोकळी झाली. मात्र परिस्थिती काहीशी वेगळीच आहे. कारण शासकीय यंत्रणा फक्त शहरात, मोठ्या गावात, सिमेंट रोड, काँक्रीट रोड असलेल्या गावातच पोहचतच असल्याचा प्रत्यक्ष अनुभव नागभीड तालुक्यातील येनोली (खुर्द) गावात पोहचल्यावरच लक्षात येईल. शेतीचा संपूर्ण हंगाम संपूनही या गावातील ८० टक्के शेतकऱ्यांच्या शेतात धानाची रोवणी झालीच नाही. मात्र त्यांच्या गावापर्यंत प्रशासकीय यंत्रणेचा मागमुसही दिसत नाही. एकंदरीत येनोली (खु.) या गावातील आदिवासी नागरिक दुष्काळाच्या गर्तेत पूर्णत: होरपळून निघाले असून अनेकांनी आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे ‘लोकमत’जवळ बोलून दाखविले.नागभीडपासून अवघ्या २५ किमी अंतरावर असलेले येनोली (खूर्द) गावाची लोकसंख्या जेमतेम २७५ एवढी आहे. या गावात परधान, गोंड, ढिवर या जातीचे ९५ टक्के लोक तर कोहळी समाजाचे फक्त पाच टक्के लोक राहतात. या गावातील जनतेचा उदरनिर्वाह फक्त शेतीवरच चालतो. या गावात जायला कच्चा रस्ता असून हिच प्रशासनाची मेहरबानी दिसून येते. गावाच्या चारही बाजूंना घनदाट जंगल आहे. या गावात पटवारी, ग्रामसेवक कृषी सहायक व इतरही अधिकाऱ्यांचे दर्शन होणे दुर्लभच आहे. परंतु, शेती करून प्रसंगी बाहेरगावी मजूरीसाठी जावून कोणतीही कुरकूर न करता मुकाट्याने जीवन जगणे एवढेच येथील लोकांना माहीत आहे. म्हणूनच या गावातील २५० एकर शेतजमीन असलेल्या भागाला पाणी उपलब्ध करून देणाऱ्या ६० एकरातील मामा तलाव तसेच २५ एकराचे क्षेत्र असलेल्या झाडाची बोडी या दोन्ही तलावाकडे प्रशासनाने लक्ष न पुरविल्याने या आदिवासी, दुर्गम गावातील शेतकऱ्यांच्या ९० टक्के शेतकऱ्यांच्या शेतजमीनीत भाताची रोवणी झालीच नाही. टाकलेले पऱ्हे पूर्णत: वाळून गेले. ६० एकरातील तलावाचे पाच वर्षापूर्वी रोहयोमधून थातूर-मातूर केलेल्या कामामुळे तलावात पाणीच नाही. याबाबत गावकऱ्यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, कृषी विभागाकडे तक्रार केली. जि.प. सदस्या लीना पेंदाम व भाजपा तालुकाध्यक्ष होमदेव मेश्राम समवेत कृषी अधिकारी पठाण यांनी भागाला भेट दिली. परंत, इतर अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही.