शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
5
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
6
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
7
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
8
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
9
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
10
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
11
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
12
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
13
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
14
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
15
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
16
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
17
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
18
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
19
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
20
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!

दुष्काळाच्या वणव्यात होरपळताहेत येनोली (खुर्द) गावचे नागरिक

By admin | Updated: November 3, 2015 00:25 IST

आजच्या स्थितीत राज्यात पसरलेल्या दुष्काळावर मोठी चर्चा सुरू आहे.

हरिशचंद्र पाल तळोधी (बां)आजच्या स्थितीत राज्यात पसरलेल्या दुष्काळावर मोठी चर्चा सुरू आहे. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही गावात दुष्काळ नसून पीक परिस्थिती ठीक असल्याचा निर्वाळा प्रशासकीय यंत्रणा जाहीर करून मोकळी झाली. मात्र परिस्थिती काहीशी वेगळीच आहे. कारण शासकीय यंत्रणा फक्त शहरात, मोठ्या गावात, सिमेंट रोड, काँक्रीट रोड असलेल्या गावातच पोहचतच असल्याचा प्रत्यक्ष अनुभव नागभीड तालुक्यातील येनोली (खुर्द) गावात पोहचल्यावरच लक्षात येईल. शेतीचा संपूर्ण हंगाम संपूनही या गावातील ८० टक्के शेतकऱ्यांच्या शेतात धानाची रोवणी झालीच नाही. मात्र त्यांच्या गावापर्यंत प्रशासकीय यंत्रणेचा मागमुसही दिसत नाही. एकंदरीत येनोली (खु.) या गावातील आदिवासी नागरिक दुष्काळाच्या गर्तेत पूर्णत: होरपळून निघाले असून अनेकांनी आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे ‘लोकमत’जवळ बोलून दाखविले.नागभीडपासून अवघ्या २५ किमी अंतरावर असलेले येनोली (खूर्द) गावाची लोकसंख्या जेमतेम २७५ एवढी आहे. या गावात परधान, गोंड, ढिवर या जातीचे ९५ टक्के लोक तर कोहळी समाजाचे फक्त पाच टक्के लोक राहतात. या गावातील जनतेचा उदरनिर्वाह फक्त शेतीवरच चालतो. या गावात जायला कच्चा रस्ता असून हिच प्रशासनाची मेहरबानी दिसून येते. गावाच्या चारही बाजूंना घनदाट जंगल आहे. या गावात पटवारी, ग्रामसेवक कृषी सहायक व इतरही अधिकाऱ्यांचे दर्शन होणे दुर्लभच आहे. परंतु, शेती करून प्रसंगी बाहेरगावी मजूरीसाठी जावून कोणतीही कुरकूर न करता मुकाट्याने जीवन जगणे एवढेच येथील लोकांना माहीत आहे. म्हणूनच या गावातील २५० एकर शेतजमीन असलेल्या भागाला पाणी उपलब्ध करून देणाऱ्या ६० एकरातील मामा तलाव तसेच २५ एकराचे क्षेत्र असलेल्या झाडाची बोडी या दोन्ही तलावाकडे प्रशासनाने लक्ष न पुरविल्याने या आदिवासी, दुर्गम गावातील शेतकऱ्यांच्या ९० टक्के शेतकऱ्यांच्या शेतजमीनीत भाताची रोवणी झालीच नाही. टाकलेले पऱ्हे पूर्णत: वाळून गेले. ६० एकरातील तलावाचे पाच वर्षापूर्वी रोहयोमधून थातूर-मातूर केलेल्या कामामुळे तलावात पाणीच नाही. याबाबत गावकऱ्यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, कृषी विभागाकडे तक्रार केली. जि.प. सदस्या लीना पेंदाम व भाजपा तालुकाध्यक्ष होमदेव मेश्राम समवेत कृषी अधिकारी पठाण यांनी भागाला भेट दिली. परंत, इतर अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही.