शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
2
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
3
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
4
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
5
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
6
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
7
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
8
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
9
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
10
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
11
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
12
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
13
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण
14
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
15
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
16
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
स्पाय कॅमेरा, ७४ तरुणींचे व्हिडिओ, खाजगी एअरलाइन्समधील पायलटचं धक्कादायक कृत्य, असं फुटलं बिंग   
19
तिला फोटोशूटसाठी भारतात पाठवण्यास राजी नाही पाकिस्तान; वर्ल्ड कप आधी घेतला मोठा निर्णय
20
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला

रेल्वेच्या पत्रामुळे ताडाळी येथील नागरिक संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 06:00 IST

मध्य रेल्वेच्या भांदक येथील कार्यालयातून ग्रामपंचायत ताडाळी कार्यालयाला पत्र प्राप्त झाले. त्यानुसार रेल्वे फाटक क्र. ३९ बी कायमस्वरूपी बंद करून गावालगतच्या पुलाखालून रहदारीसाठी मार्ग खुला राहील, असे सुचविण्यात आले.

ठळक मुद्देग्रामपंचायतीचे निवेदन : समस्या सोडविण्याची केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कघोडपेठ : ताडाळी येथील रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करून गावालगतअसलेल्या रेल्वेच्या पुलाखालून वाहतूक सुरू करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीला रेल्वेचे पत्र प्राप्त झाले आहे. सोबतच ताडाळी येथून तिसऱ्या रेल्वे लाईनच्या प्रस्तावित कार्याला कागदोपत्री सुरुवात झाली आहे. त्यामुळे रेल्वेने रहदारीसाठी सुचविलेला पुल येत्या काळात राहील की, नाही याबद्दल ताडाळी ग्रामपंचायत व नागरिक संभ्रमात पडले आहेत.मध्य रेल्वेच्या भांदक येथील कार्यालयातून ग्रामपंचायत ताडाळी कार्यालयाला पत्र प्राप्त झाले. त्यानुसार रेल्वे फाटक क्र. ३९ बी कायमस्वरूपी बंद करून गावालगतच्या पुलाखालून रहदारीसाठी मार्ग खुला राहील, असे सुचविण्यात आले. सदर पत्र प्राप्त होताच ग्रामपंचायत कार्यालयाकडून विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.यामध्ये रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले. ताडाळी गावातून जाणारी प्रस्तावित तिसरी रेल्वे लाईन व ग्रामस्थांचा बंद होणारा मुख्य रस्ता याविषयी चर्चा करून समन्वयाने मार्ग काढण्यासाठी ही ग्रामसभा महत्वाची ठरणारी होती. मात्र रेल्वे प्रशासनाचे कोणतेही अधिकारी या ग्रामसभेला उपस्थित झाले नसल्याचे ग्रामपंचायत कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे.उड्डाणपुलाची मागणीताडाळी हा एमआयडीसी परिसर असून परिसरातील कारखाण्यांमुळे येथे कामगार व मजूर वर्गाची संख्या मोठी आहे. सोबतच पोस्ट ऑफिस, पशुवैद्यकीय दवाखाना तसेच पा्रथमिक आरोग्य केंद्र यामुळे गावात सतत गजबज असते. शेतकरी, शेतमजूर व विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे भविष्यात रहदारीची समस्या निर्माण होवू शकते. त्यामुळे सर्वांच्या सोयीनुसार रहदारीसाठी पायी मार्ग असावा व वाहनांसाठी उड्डाणपूल असावा अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे.या मागणीची दखल घेत ग्रामपंचायत ताडाळीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे यांच्यासह सरपंच इंदिरा कासवटे, उपसरपंच क्रीष्णा बाम, ग्राम पंचायत सदस्य सुबोध कासवटे, साईबाबा झाडे, ज्योती आसेकर, प्रफुल गोठी, मनोज चिवंडे, कवडू दिवसे, खुशाल चिवंडे, अभय चिवंडे, दिनेश आमटे, पवन चनकापुरे, सुवर्णा सुरपाम यांच्या शिष्टमंडळाने संबंधितांना निवेदन दिले आहे.

टॅग्स :railwayरेल्वे