शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

महागाई वाढल्याने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:28 IST

बाबूपेठ परिसरात घाणीचे साम्राज्य चंद्रपूर : शहरातील काही वाॅर्डांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा ...

बाबूपेठ परिसरात घाणीचे साम्राज्य

चंद्रपूर : शहरातील काही वाॅर्डांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: बाबूपेठ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी कचरा साचला आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

पेन्शनमध्ये वाढ करावी

चंद्रपूर : खासगी कंपन्या, महामंडळे, सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांना मागील अनेक वर्षांपासून पेन्शन मिळत आहे. मात्र ते अत्यल्प आहे. सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या कामगारांच्या पेेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे.

सराई मार्केट परिसरात अस्वच्छता

चंद्रपूर : शहरातील सराई इमारत परिसरामध्ये कचरा टाकल्या जात असल्यामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. परिणामी, परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

बचतगटही आले अडचणीत

चंद्रपूर : कोरोना संकटामु‌ळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश बचत गटही अडचणीत आले आहेत. काही बचत गटातील सदस्यांना उचललेले कर्जच भरता आले नाही. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत आहे.

तलावांच्या सर्वेक्षणाची मागणी

चंदपूर : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे. कृषी सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले मामा तलाव केवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तलावांचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

रेडियम लावण्याची मागणी

चंद्रपूर : शहरातील अनेक वळण रस्त्यावर रेडियम नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन प्रत्येक रस्त्यावर रेडियम लावून अपघात टाळावा, अशी मागणी सहयोगी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

मोकाट जनावरांमुळे अपघाताची शक्यता

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील काही वार्डामध्ये मोकाट जनावरांमुळे अपघाताची शक्यता आहे. या जनावरांचा बंदोबस्त करून अपघाताला आळा घालण्याची मागणी केली जात आहे.

वीज ग्राहक त्रस्त

चंद्रपूर : शहरातील काही भागामध्ये नियमित वीज खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषत: बंगाली कॅम्प, बाबूपेठ परिसरामध्ये ही समस्या आहे. याकडे महावितरणने लक्ष देऊन सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी केली जात आहे.