शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:24 IST

बल्लारपूर : येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून नळयोजनेद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. पाणी मुबलक असतानाही मागील एक ते ...

बल्लारपूर : येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून नळयोजनेद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. पाणी मुबलक असतानाही मागील एक ते दीड महिन्यापासून येथील नागरिकांना अनियमित पाणीपुरवठा केला जात आहे.

त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकावे लागत आहे. अनेकवेळा मजुरीही बुडत आहे. त्यामुळे येथील पाणी पुरवठा नियमित करण्याची मागणी संत गाडगेबाबा जनसेवा समितीने केली आहे. यासंदर्भात त्यांनी लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाला निवेदन दिले आहे.

बलारपुरात कामगार, मजुरांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कामावर गेल्याशिवाय या मजुरांना पर्याय नाही. मात्र, मागील एक ते दीड महिन्यापासून येथे अनियमित पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे अनेकवेळा मजुरांची मजुरी बुडत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे पाणीपुरवठा केला जात असतानाही याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही उपाययोजना करण्यात आली नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी संत गाडगेबाबा जनसेवा समिती बल्लारपूरचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, माजी मंत्री, तसेच आमदार सुधीर मुनगंटीवार, नगराध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हाधिकारी, जिल्हा प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे.