शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

बंद पथदिव्यामुळे नागरिकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:33 IST

पाण्याच्या टाक्या दुरुस्त कराव्या चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांत नळयोजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या, ...

पाण्याच्या टाक्या दुरुस्त कराव्या

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांत नळयोजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या, परंतु अद्यापही सुरळीत पाणीपुरवठा केला जात नाही. परिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.

अल्पवयीनांच्या हाती वाहनांच्या चाव्या

चंद्रपूर: दिवसेंदिवस वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अल्पवयीन मुले मोटारसायकलवर स्वार होऊन सुसाट वेगाने वाहने चालवितात. त्यांच्याजवळ गाडी चालविण्याचा परवानाही नसतो. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस प्रशासनाने अल्पवयीन वाहनचालकांवर नजर ठेवून त्यांना आवर घालावा, अशी मागणी होत आहे.

समाजमंदिरांची दुरुस्ती करावी

चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश समाजमंदिर दुर्लक्षित झाले आहे. त्यामुळे याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ते दुरुस्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

जुन्या मनोरंजन साधनांकडे कल

चंद्रपूर : कोरोना संकट आता काही प्रमाणात ओरसत आहे. असे असले तरी भीती कायम आहे. त्यामुळे काही नागरिक आजही घरात रहाणे पसंत करीत आहेत. काही घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक मुलांसोबतच जुन्या मनोरंजन साधनांत दंग झाले आहेत. घरातील चिमुकल्यांसह ज्येष्ठ मंडळी हा वेळ वाचनासोबतच कॅरम, बुद्धिबळ, चव्वाअष्टा यासारख्या जुन्या मनोरंजनाच्या साधनातून घालवित आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेने नागरिक त्रस्त

चंद्रपूर : तालुक्यातील काही गावांतील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या पावसाचे दिवस आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

चित्रपटगृह सुरू करण्याची मागणी

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे सिनेमागृहसुद्धा बंद आहे. मात्र, सिनेमागृहात जाऊन चित्रपट बघणाऱ्यांची बरीच निराशा होत आहे. त्यामुळे काहीजण आता टीव्हीवर जुने चित्रपट बघून आपली हौस भागवित आहेत. ग्रामीण, तसेच शहरी भागात असेच चित्र दिसत आहे. त्यामुळे इतर व्यवहाराप्रमाणे चित्रपटगृहसुद्धा सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

नालीचे पाणी रस्त्यावर

चंद्रपूर : शहरातील सिस्टर काॅलनी, नगिनाबाग, बंगाली कॅम्प आदी परिसरातील नाल्यांमध्ये कचरा तुंबला आहे. त्यामुळे नालीचे पाणी रस्त्यावर येत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नाल्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी केली जात आहे. मागील काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे परिसरात चिखल साचला आहे.