शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

कुकूऽऽच कूऽ’ हा अलार्मच बिघडला; वेळीअवेळी कोंबडा आरवल्याने नागरिकांची झोपमोड

By साईनाथ कुचनकार | Updated: November 6, 2022 17:41 IST

कोरपना तालुक्यातील काही गावांमध्ये कोंबडे रात्री दोन ते तीन वाजेपासून मोठमोठ्याने आरवत असल्याने नागरिकांची झोपमोड होत आहे.

चंद्रपूर - पूर्वी कोंबड्याने बांग दिली की पहाट झाली, असे समजून गाव जागे होत होते आणि प्रत्येक जण आपापल्या कामाला लागत होते. ग्रामीण भागात याच अलार्मवर नागरिकांचा शंभर टक्के विश्वास होता. आता ग्रामीण भागातील हा अलार्म बिघडल्याचे चित्र आहे. वेळीअवेळी कोंबडे आरवत असल्याने थकून- भागून झोपी गेलेल्या नागरिकांची झोपमोड होत आहे. नैसर्गिक चक्र बदलल्याचा हा परिणाम आहे की आणखी कोणता हा प्रश्न सध्या ग्रामीण नागरिकांना पडला आहे. विशेष म्हणजे, झोपमोड होत असल्याने नेमकी तक्रार तरी कुठे करायची, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

सूर्योदयापूर्वी कोंबडे बांग देतात. हा त्यांचा नैसर्गिक नियम आहे. याच नियमावरून नागरिकांचाही दिवस सुरू होतो. मात्र, कोरपना तालुक्यातील काही गावांमध्ये कोंबडे रात्री दोन ते तीन वाजेपासून मोठमोठ्याने आरवत असल्याने नागरिकांची झोपमोड होत आहे. विशेष म्हणजे, एक कोंबडा आरवला की, गावातील इतरही कोंबडे आरवणे सुरू करतात. यामुळे रात्री दोन ते तीन वाजेपासून गावात गलबला होत आहे. हे नेमके कशामुळे होते हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, नागरिकांची झोपमोड होत असल्याने पूर्वीचा हा अलार्म आता त्रासदायक बनू पाहत आहे. अशीच झोपमोड झालेल्या कोरपना तालुक्यातील बोरी नवेगाव येथील एका नागरिकाने चक्क पहाटे तीन वाजता उठून कोंबड्यांच्या गलबल्याचा व्हिडिओ काढला असून तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

नैसर्गिक चक्र बदलले काय?

मागील काही वर्षांमध्ये नैसर्गिक चक्र बदलले आहे. त्याचा थेट परिणाम प्रत्येक जीवावर होत आहे. त्यामुळे या कोंबड्यांनी आपला वेळ तर बदलविला नसेल ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर