शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

कुकूऽऽच कूऽ’ हा अलार्मच बिघडला; वेळीअवेळी कोंबडा आरवल्याने नागरिकांची झोपमोड

By साईनाथ कुचनकार | Updated: November 6, 2022 17:41 IST

कोरपना तालुक्यातील काही गावांमध्ये कोंबडे रात्री दोन ते तीन वाजेपासून मोठमोठ्याने आरवत असल्याने नागरिकांची झोपमोड होत आहे.

चंद्रपूर - पूर्वी कोंबड्याने बांग दिली की पहाट झाली, असे समजून गाव जागे होत होते आणि प्रत्येक जण आपापल्या कामाला लागत होते. ग्रामीण भागात याच अलार्मवर नागरिकांचा शंभर टक्के विश्वास होता. आता ग्रामीण भागातील हा अलार्म बिघडल्याचे चित्र आहे. वेळीअवेळी कोंबडे आरवत असल्याने थकून- भागून झोपी गेलेल्या नागरिकांची झोपमोड होत आहे. नैसर्गिक चक्र बदलल्याचा हा परिणाम आहे की आणखी कोणता हा प्रश्न सध्या ग्रामीण नागरिकांना पडला आहे. विशेष म्हणजे, झोपमोड होत असल्याने नेमकी तक्रार तरी कुठे करायची, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

सूर्योदयापूर्वी कोंबडे बांग देतात. हा त्यांचा नैसर्गिक नियम आहे. याच नियमावरून नागरिकांचाही दिवस सुरू होतो. मात्र, कोरपना तालुक्यातील काही गावांमध्ये कोंबडे रात्री दोन ते तीन वाजेपासून मोठमोठ्याने आरवत असल्याने नागरिकांची झोपमोड होत आहे. विशेष म्हणजे, एक कोंबडा आरवला की, गावातील इतरही कोंबडे आरवणे सुरू करतात. यामुळे रात्री दोन ते तीन वाजेपासून गावात गलबला होत आहे. हे नेमके कशामुळे होते हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, नागरिकांची झोपमोड होत असल्याने पूर्वीचा हा अलार्म आता त्रासदायक बनू पाहत आहे. अशीच झोपमोड झालेल्या कोरपना तालुक्यातील बोरी नवेगाव येथील एका नागरिकाने चक्क पहाटे तीन वाजता उठून कोंबड्यांच्या गलबल्याचा व्हिडिओ काढला असून तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

नैसर्गिक चक्र बदलले काय?

मागील काही वर्षांमध्ये नैसर्गिक चक्र बदलले आहे. त्याचा थेट परिणाम प्रत्येक जीवावर होत आहे. त्यामुळे या कोंबड्यांनी आपला वेळ तर बदलविला नसेल ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर