शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
2
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
4
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
5
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
6
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
7
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
8
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
9
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
10
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
11
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
12
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
13
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
14
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
15
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
16
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
17
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
18
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
19
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
20
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्तीसाठी नागरिकांनी घ्यावी खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST

एरवी तीन महिने आणि त्यातही ब्रह्मपूरी व सिंदेवाही या दोन्ही तालुक्यांना कोरोनाने धडक देऊनही नागभीड शहर कोरोनापासून दूर होते. मात्र ७ जून रोजी तालुक्यातील ४ व्यक्तींचे वैद्यकीय अहवाल एकाचवेळी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ माजली. अहवाल प्राप्त होताच प्रशासनाने तातडीच्या हालचाली करून संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केल्या.

ठळक मुद्दे६० व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह, मात्र कोरोनापासून होणारा धोका अद्याप टळला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेल्या तालुक्यातील सर्व ६० व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आल्याने प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला. मात्र, कोरोनाचा धोका अद्याप टळला नाही. यापुढेही तालुका कोरोनामुक्त ठेवण्यासाठी खबरदारी व जबाबदारी प्रत्येकालाच पार पाडावी लागणार आहे.एरवी तीन महिने आणि त्यातही ब्रह्मपूरी व सिंदेवाही या दोन्ही तालुक्यांना कोरोनाने धडक देऊनही नागभीड शहर कोरोनापासून दूर होते. मात्र ७ जून रोजी तालुक्यातील ४ व्यक्तींचे वैद्यकीय अहवाल एकाचवेळी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ माजली. अहवाल प्राप्त होताच प्रशासनाने तातडीच्या हालचाली करून संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केल्या. रूग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची यादी तयार करून त्यांना संस्थात्मक अलगीकरण केले. रूग्ण ज्या भागात राहत होता तो संपूर्ण परिसर सील करण्यात आला. कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या उद्देशाने नागभीड नगर परिषदेच्या वतीने ३६ तासांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊनला नागरिकांनी प्रतिसाद दिला. ४ रूग्णांच्या संपर्कात कोण आणि किती व्यक्ती आले आहेत, याचे सर्वेक्षण आरोग्य विभागाकडून करण्यात आले. या ४ रूग्णांच्या संपर्कात एकूण ६० व्यक्ती आल्याचे स्पष्ट होताच त्यांना विलगीकरण करून तपासणीसाठी स्कॅब प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.या ६० व्यक्तींच्या नमुन्यांचे अहवाल शुक्रवारी आरोग्य विभागास प्राप्त झाल. सर्व नमुने निगेटिव्ह आल्याले एका मोठ्या संकटातून तालुक्याची तुर्त सुटका झाली आहे. त्या ४ रूग्णांच्या संपर्कात आलेल्या ६० व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले म्हणून सगळाच धोका संपला असे मुळीच नाही. त्यामुळे खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य प्रशासनाने दिल्या आहेत.पावसाळ्यात समस्या वाढण्याची शक्यतारोजच परराज्य व परजिल्ह्यातील रेडझोनमधून येणाऱ्या नागरिकांची संख्या बरीच आहे. बाहेरून येणाºया व्यक्तींची माहिती प्रशासनाला कळविणे हे स्थानिक नागरिकांचे कर्तव्य काम आहे. अशा व्यक्तींना नियमानुसार अलगीकरणात ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पावसाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वत: आणि कुटुंबाची खबरदारी घेतली पाहिजे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या