शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोरोनामुक्तीसाठी नागरिकांनी घ्यावी खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST

एरवी तीन महिने आणि त्यातही ब्रह्मपूरी व सिंदेवाही या दोन्ही तालुक्यांना कोरोनाने धडक देऊनही नागभीड शहर कोरोनापासून दूर होते. मात्र ७ जून रोजी तालुक्यातील ४ व्यक्तींचे वैद्यकीय अहवाल एकाचवेळी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ माजली. अहवाल प्राप्त होताच प्रशासनाने तातडीच्या हालचाली करून संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केल्या.

ठळक मुद्दे६० व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह, मात्र कोरोनापासून होणारा धोका अद्याप टळला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेल्या तालुक्यातील सर्व ६० व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आल्याने प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला. मात्र, कोरोनाचा धोका अद्याप टळला नाही. यापुढेही तालुका कोरोनामुक्त ठेवण्यासाठी खबरदारी व जबाबदारी प्रत्येकालाच पार पाडावी लागणार आहे.एरवी तीन महिने आणि त्यातही ब्रह्मपूरी व सिंदेवाही या दोन्ही तालुक्यांना कोरोनाने धडक देऊनही नागभीड शहर कोरोनापासून दूर होते. मात्र ७ जून रोजी तालुक्यातील ४ व्यक्तींचे वैद्यकीय अहवाल एकाचवेळी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ माजली. अहवाल प्राप्त होताच प्रशासनाने तातडीच्या हालचाली करून संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केल्या. रूग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची यादी तयार करून त्यांना संस्थात्मक अलगीकरण केले. रूग्ण ज्या भागात राहत होता तो संपूर्ण परिसर सील करण्यात आला. कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या उद्देशाने नागभीड नगर परिषदेच्या वतीने ३६ तासांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊनला नागरिकांनी प्रतिसाद दिला. ४ रूग्णांच्या संपर्कात कोण आणि किती व्यक्ती आले आहेत, याचे सर्वेक्षण आरोग्य विभागाकडून करण्यात आले. या ४ रूग्णांच्या संपर्कात एकूण ६० व्यक्ती आल्याचे स्पष्ट होताच त्यांना विलगीकरण करून तपासणीसाठी स्कॅब प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.या ६० व्यक्तींच्या नमुन्यांचे अहवाल शुक्रवारी आरोग्य विभागास प्राप्त झाल. सर्व नमुने निगेटिव्ह आल्याले एका मोठ्या संकटातून तालुक्याची तुर्त सुटका झाली आहे. त्या ४ रूग्णांच्या संपर्कात आलेल्या ६० व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले म्हणून सगळाच धोका संपला असे मुळीच नाही. त्यामुळे खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य प्रशासनाने दिल्या आहेत.पावसाळ्यात समस्या वाढण्याची शक्यतारोजच परराज्य व परजिल्ह्यातील रेडझोनमधून येणाऱ्या नागरिकांची संख्या बरीच आहे. बाहेरून येणाºया व्यक्तींची माहिती प्रशासनाला कळविणे हे स्थानिक नागरिकांचे कर्तव्य काम आहे. अशा व्यक्तींना नियमानुसार अलगीकरणात ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पावसाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वत: आणि कुटुंबाची खबरदारी घेतली पाहिजे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या