शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
3
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
4
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
5
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
6
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
7
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
8
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
9
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
10
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
11
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
12
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
13
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
14
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
15
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
16
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
17
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
18
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
19
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
20
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!

नागरिकांनी जगविले १२ हजार चंदन वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

२०१६ रोजी हरित मित्र परिवारातील सदस्यांना लातूर जिल्ह्यातील हैसूर येथील एका शेतकºयाने मोठ्या प्रमाणात चंदन वृक्षाची लागवड केल्याची माहिती वृत्तपत्रातून मिळाली होती. सदस्यांनी त्या गावात भेट देवून शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. वरोरा परिसरात आल्यानंतर चंदन वृक्षलागवडीबाबत जनजागृती सुरू केली.

ठळक मुद्देहरित मित्र परिवारचे पाठबळ : चंदन वृक्ष संगोपनावर येतो अल्प खर्च

प्रवीण खिरटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : चार वर्षांपासून शहरातील हरित मित्र परिवाराने परिसरात चंदनवृक्ष लावण्याकरिता जनजागृती सुरू केली. वृक्षरोपणाचे महत्त्व ओळखून नागरिक व शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिल्याने १२ हजार चंदनाची वृक्ष अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यापूर्वी शहरात एकही चंदन वृक्ष नव्हता हे विशेष.२०१६ रोजी हरित मित्र परिवारातील सदस्यांना लातूर जिल्ह्यातील हैसूर येथील एका शेतकºयाने मोठ्या प्रमाणात चंदन वृक्षाची लागवड केल्याची माहिती वृत्तपत्रातून मिळाली होती. सदस्यांनी त्या गावात भेट देवून शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. वरोरा परिसरात आल्यानंतर चंदन वृक्षलागवडीबाबत जनजागृती सुरू केली. चंदन वृक्ष लावताना हरित मित्र परिसराचे सदस्य स्वत: जावून मदत करतात. चंदनाचे रोपटे लावताना त्याच्या सभोताल तुरीचे दाणे किंवा पपईचे बियाणे टाकले जाते. चंदन रोपटे काही दिवस स्वत: अन्न घेवू शकत नाही. त्यामुळे चंदन वृक्षाला सभोवताल तूर व पपईपासून अन्न घेण्यास मदत होते. सातत्याने जनजागृती केल्याने चार वर्षांत १२ हजार चंदनाचे वृक्ष जगले आहेत. काही झाडांची उंची ३५ फुटाहून अधिक झालीआहे. जिल्ह्याचे तापमान उष्ण असल्याने चंदन वृक्षाची वाढ झपाट्याने होते. काही शेतकºयांनी चंदन वृक्ष बांधावर लावले. त्यांचीही वाढ मोठ्या झपाट्याने झाल्याची माहिती हरित मित्र परिवाराच्या सदस्यांनी दिली.१५ वर्षांनंतर होतो मोठा आर्थिक लाभचंदन वृक्षांचे वेळोवेळी संगोपन करण्याची गरज नाही. चंदनाचे रोपटे लावल्यानंतर दोन उन्हाळ्यात काळजी घेवून पाणी दिल्यास जिवंत राहते. वाढही झपाट्याने होते. १५ वर्षांनंतर मोठा आर्थिक लाभ होतो. संगोपनावर अधिक खर्च नसल्याने अनेक व्यक्ती चंदनाचे वृक्ष लावत आहे. वरोरा परिसरात येत्या काही दिवसात चंदन वृक्ष लागवडीचे क्षेत्र वाढणार आहे.शेतकऱ्यांनी चंदन वृक्ष शेतीच्या बांधावर लावून दोन वर्षे काळजी घेतल्यास मोठा आर्थिक लाभ होतो. बाजारात चंदन वृक्षाला मागणी आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीपेक्षा काळानुसार आज विचार बदलविण्याची गरज आहे.- किशोर उत्तरवार,हरित मित्र, परिवार

टॅग्स :agricultureशेती