शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

नागरिकांनी जगविले १२ हजार चंदन वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

२०१६ रोजी हरित मित्र परिवारातील सदस्यांना लातूर जिल्ह्यातील हैसूर येथील एका शेतकºयाने मोठ्या प्रमाणात चंदन वृक्षाची लागवड केल्याची माहिती वृत्तपत्रातून मिळाली होती. सदस्यांनी त्या गावात भेट देवून शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. वरोरा परिसरात आल्यानंतर चंदन वृक्षलागवडीबाबत जनजागृती सुरू केली.

ठळक मुद्देहरित मित्र परिवारचे पाठबळ : चंदन वृक्ष संगोपनावर येतो अल्प खर्च

प्रवीण खिरटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : चार वर्षांपासून शहरातील हरित मित्र परिवाराने परिसरात चंदनवृक्ष लावण्याकरिता जनजागृती सुरू केली. वृक्षरोपणाचे महत्त्व ओळखून नागरिक व शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिल्याने १२ हजार चंदनाची वृक्ष अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यापूर्वी शहरात एकही चंदन वृक्ष नव्हता हे विशेष.२०१६ रोजी हरित मित्र परिवारातील सदस्यांना लातूर जिल्ह्यातील हैसूर येथील एका शेतकºयाने मोठ्या प्रमाणात चंदन वृक्षाची लागवड केल्याची माहिती वृत्तपत्रातून मिळाली होती. सदस्यांनी त्या गावात भेट देवून शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. वरोरा परिसरात आल्यानंतर चंदन वृक्षलागवडीबाबत जनजागृती सुरू केली. चंदन वृक्ष लावताना हरित मित्र परिसराचे सदस्य स्वत: जावून मदत करतात. चंदनाचे रोपटे लावताना त्याच्या सभोताल तुरीचे दाणे किंवा पपईचे बियाणे टाकले जाते. चंदन रोपटे काही दिवस स्वत: अन्न घेवू शकत नाही. त्यामुळे चंदन वृक्षाला सभोवताल तूर व पपईपासून अन्न घेण्यास मदत होते. सातत्याने जनजागृती केल्याने चार वर्षांत १२ हजार चंदनाचे वृक्ष जगले आहेत. काही झाडांची उंची ३५ फुटाहून अधिक झालीआहे. जिल्ह्याचे तापमान उष्ण असल्याने चंदन वृक्षाची वाढ झपाट्याने होते. काही शेतकºयांनी चंदन वृक्ष बांधावर लावले. त्यांचीही वाढ मोठ्या झपाट्याने झाल्याची माहिती हरित मित्र परिवाराच्या सदस्यांनी दिली.१५ वर्षांनंतर होतो मोठा आर्थिक लाभचंदन वृक्षांचे वेळोवेळी संगोपन करण्याची गरज नाही. चंदनाचे रोपटे लावल्यानंतर दोन उन्हाळ्यात काळजी घेवून पाणी दिल्यास जिवंत राहते. वाढही झपाट्याने होते. १५ वर्षांनंतर मोठा आर्थिक लाभ होतो. संगोपनावर अधिक खर्च नसल्याने अनेक व्यक्ती चंदनाचे वृक्ष लावत आहे. वरोरा परिसरात येत्या काही दिवसात चंदन वृक्ष लागवडीचे क्षेत्र वाढणार आहे.शेतकऱ्यांनी चंदन वृक्ष शेतीच्या बांधावर लावून दोन वर्षे काळजी घेतल्यास मोठा आर्थिक लाभ होतो. बाजारात चंदन वृक्षाला मागणी आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीपेक्षा काळानुसार आज विचार बदलविण्याची गरज आहे.- किशोर उत्तरवार,हरित मित्र, परिवार

टॅग्स :agricultureशेती