शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी नागरिक रस्त्यावर

By admin | Updated: August 7, 2016 00:32 IST

ब्रह्मपुरी जिल्हा व्हावा, ही मागणी ब्रह्मपुरी तालुक्यातील नागरिकांसह इतरही गावांनी मागील अनेक वर्षांपासून शासनाकडून रेटून धरली आहे.

कडकडीत बंद : मोर्चात हजारो नागरिकांची उपस्थितीब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी जिल्हा व्हावा, ही मागणी ब्रह्मपुरी तालुक्यातील नागरिकांसह इतरही गावांनी मागील अनेक वर्षांपासून शासनाकडून रेटून धरली आहे. मात्र प्रत्येक वेळी ब्रह्मपुरीला डावलले जात आहे. अशातच आता शासनाने नवीन जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव मागितला आहे. मात्र यावेळी अनेक तालुक्यांकडूनही जिल्ह्याची मागणी आहे. यावेळी तरी ब्रह्मपुरीला डावलले जाऊ नये, शासनाने ब्रह्मपुरीचा जिल्ह्यासाठी गांभीर्याने विचार करावा व जिल्ह्याचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी आज शनिवारी हजारो नागरिक रस्त्यावर आले. यासोबतच ब्रह्मपुरी तालुक्यात कडकडीत बंदही पाळण्यात आला.जिल्हा निर्माण कृती समिती, युवा जिल्हा कृती समिती, ज्येष्ठ नागरिक संघटना, सिनीअर सिटीझन फोरम, महिला आघाडी, व्यापारी मंडळ यांच्यासह सर्वपक्षांचे नेते व कार्यकर्त्यांनी या बंदचे आवाहन केले होते. त्या नुसार, शनिवारी सकाळपासूनच ब्रह्मपुरी शहरासह तालुक्यातील दुकाने, शाळा, महाविद्यालये, भाजी मंडी व इतर प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद करण्यात आली. शेकडो युवकांनी मोटरसायकल रॅली काढून आपल्या मागणीकडे लक्ष वेधले. त्यानंतर सर्व नागरिक हुतात्मा स्मारकाजवळ एकत्रित आले. महिला, ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयीन युवक, नेते, पदाधिकारी, व्यापारी, शेतकरी, शेतमजूर यांचा यात समावेश होता. त्यानंतर तिथूनच मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सम्राट अशोक चौक, रेणुकामाता चौक, सावरकर चौक आदी मार्गाने घोषणा देत मोर्चा शिवाजी चौकाकडे निघाला. शिवाजी चौकात मोर्चाला अडविण्यात आले. तिथेच उपविभागीय अधिकारी उमेश काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण परदेशी यांनी मोर्चाला सामोरे जात निवेदन स्वीकारले. मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी केले. यावेळी अशोक भैय्या, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, अशोक रामटेके, नगराध्यक्ष योगिता बनपूरकर, माजी नगराध्यक्ष रिता उराडे, खेमराज तिडके, माजी आमदार उध्दव सिंगाडे, विनोद झोडगे, प्रा. राजेश कांबळे, सुधीर शेलोकर, हरिश्चंद्र सोले, डॉ. प्रेमलाल मेश्राम, प्रभाकर सेलोकर, डॉ. डी.एन. मेश्राम, सुयोग बाळबुध्दे, प्रतिभा फुलझेले, सर्व नगरसेवक व हजारो नागरिक उपस्थित होते. जिल्ह्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरी तालुक्यातील महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. मोर्चात तालुक्यातील तरुणाई उत्साहाने सहभागी झाली होती. त्यांच्या घोषणामुळे ब्रह्मपुरी दुमदुमले. ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी तशी १९८२ पासूनची आहे. परंतु वारंवार शासनाने याकडे वारंवार दुर्लक्षच केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. याचे पडसाद या मोर्चात उमटले. नागरिकांच्या भावना या मोर्चाच्या निमीत्ताने पुन्हा उफळून आल्या. आता पुन्हा शासन चंद्रपूर जिल्ह्याची विभागणी करण्याच्या विचारात आहे. यावेळी तरी ब्रह्मपुरी जिल्हा घोषित करावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चा आणि बंदचे हे आयोजन होते. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. (तालुका प्रतिनिधी)आजच्या मोर्चादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. २० पोलीस अधिकारी व २०० च्या वर पोलीस, दंगा नियंत्रक पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण परदेशी व पोलीस निरीक्षक ओ.पी. अंबाडकर हे वेळोवेळी परिस्थितीची माहिती घेत होते. तरीही विद्यानगर व आमले बी.एड. कॉलेज परिसराच्या रस्त्यावर टायर जाळून मागणीकडे लक्ष वेधण्यात आले.