शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

उद्ध्वस्त किल्ल्यासाठी नागरिकांचा पुढाकार

By admin | Updated: July 25, 2016 01:16 IST

शहराचे वैभव असलेल्या गोंड राजाचा किल्ला पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे शहराची ओळख धुळीस मिळाली आहे.

पुरातत्व विभागाला निवेदन : किल्ल्याची पुनर्बांधणी करण्याची मागणी मिलिंद कीर्ती चंद्रपूर शहराचे वैभव असलेल्या गोंड राजाचा किल्ला पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे शहराची ओळख धुळीस मिळाली आहे. ही ओळख कायम राहावी आणि ऐतिहासिक पुरातन वारशाची जपणूक व्हावी, यासाठी आंबेकर ले-आऊटमधील नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. पुरातत्व विभाग, खासदार, आमदार व चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देऊन उद्ध्वस्त वारसा पुन्हा उभा करण्याची मागणी करण्यात आली आहे. बल्लारपूर, चंद्रपूर आणि नागपूर ही गोंड राजांची वारसा स्थळे आहेत. या तिन्ही शहरांमध्ये गोंड राजांनी बांधलेले किल्ले आहेत. मोगलांच्या मांडलिकत्वाखाली या भागात गोंड राजांची भरभराट झाली होती. गोंड संस्कृती आणि मोगल संस्कृतीचा मिलाफ असलेल्या काही वास्तू, शिल्पे गोंड राजांनी उभी केली होती. त्यांचा ऐतिहासिक पुरावा नागपूर, चंद्रपूर व बल्लारशाहा येथील गोंडराजाचे किल्ले आहे. मात्र या तिन्ही शहरातील किल्ल्यांची पुरातत्व विभागाने निगा राखली नाही. परिणामी तिन्ही ठिकाणच्या किल्ल्यांचे केवळ अवशेष शिल्लक आहेत. बल्लारपूर नगर परिषद बल्लारशाहा किल्ल्याचा वारसा जपण्याबाबत विचार करीत आहे. इरई नदीच्या काठावरील किल्ला परिसर विकसित करण्याचा विषय मुख्याधिकारी विपीन मुधा यांनी अग्रक्रमावर घेतला आहे. तसा प्रयत्न चंद्रपुरातही करता येणे शक्य आहे. चंद्रपूर येथील गोंडराजाच्या किल्ल्याचे अवशेष म्हणजे शहराच्या सभोवताल परकोट शाबूत आहे. पण या परकोटावरही काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. अनेक ठिकाणी परकोट उद्ध्वस्त झाल्याचा फायदा घेऊन परकोटाच्या भिंतीवर बांधकाम करण्यात आले आहे. त्याकडे पुरातत्व विभागाने साफ दुर्लक्ष चालविले आहे. किल्ल्यावरील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. चंद्रपूर मनपा अतिक्रमणधारकांकडून कर वसुली करून त्या अतिक्रमणाला वैधता प्राप्त करून देत आहे. पण मनपा व पुरातत्व विभागांनी ठरविले तर किल्ल्यातील अतिक्रमण थांबविणे शक्य आहे. किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा जपण्याचे काम चंद्रपूरचे नागरिकदेखील करू शकतात. नागरिकांनी आपापल्या परिसरातील अतिक्रमणाविरोधात आवाज उठविला तर चंद्रपूर महानगरपालिकेलाही त्याची दखल घ्यावी लागेल. शेवटी आपला इतिहास जपण्याची जबाबदारी तो इतिहास घडविणाऱ्या नागरिकांचीच असते, त्यांच्या वंशजांची असते. त्यामुळे नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आंबेकर ले-आऊट परिसरातील किल्ल्यावरील अतिक्रमणाविरोधात स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी पुरातत्व विभाग आणि चंद्रपूर मनपा आयुक्तांना नुकतेच निवेदन सादर केले आहे. निवेदनात नागरिकांनी चोर खिडकी ते पाण्याची टाकीपर्यंत ढासळलेल्या किल्ल्याची पुनर्बांधणी करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर आनंद कवाडे, जितेंद्र रायपुरे, मो. फारूख मो. हारूण, परवन नदीम शेख, वाय. के. यासन, वसीम जीना, अय्युब खान, तारिक अहमद आणि डॉ. इसादास भडके आदींच्या स्वाक्षरी आहे.