शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

उद्ध्वस्त किल्ल्यासाठी नागरिकांचा पुढाकार

By admin | Updated: July 25, 2016 01:16 IST

शहराचे वैभव असलेल्या गोंड राजाचा किल्ला पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे शहराची ओळख धुळीस मिळाली आहे.

पुरातत्व विभागाला निवेदन : किल्ल्याची पुनर्बांधणी करण्याची मागणी मिलिंद कीर्ती चंद्रपूर शहराचे वैभव असलेल्या गोंड राजाचा किल्ला पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे शहराची ओळख धुळीस मिळाली आहे. ही ओळख कायम राहावी आणि ऐतिहासिक पुरातन वारशाची जपणूक व्हावी, यासाठी आंबेकर ले-आऊटमधील नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. पुरातत्व विभाग, खासदार, आमदार व चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देऊन उद्ध्वस्त वारसा पुन्हा उभा करण्याची मागणी करण्यात आली आहे. बल्लारपूर, चंद्रपूर आणि नागपूर ही गोंड राजांची वारसा स्थळे आहेत. या तिन्ही शहरांमध्ये गोंड राजांनी बांधलेले किल्ले आहेत. मोगलांच्या मांडलिकत्वाखाली या भागात गोंड राजांची भरभराट झाली होती. गोंड संस्कृती आणि मोगल संस्कृतीचा मिलाफ असलेल्या काही वास्तू, शिल्पे गोंड राजांनी उभी केली होती. त्यांचा ऐतिहासिक पुरावा नागपूर, चंद्रपूर व बल्लारशाहा येथील गोंडराजाचे किल्ले आहे. मात्र या तिन्ही शहरातील किल्ल्यांची पुरातत्व विभागाने निगा राखली नाही. परिणामी तिन्ही ठिकाणच्या किल्ल्यांचे केवळ अवशेष शिल्लक आहेत. बल्लारपूर नगर परिषद बल्लारशाहा किल्ल्याचा वारसा जपण्याबाबत विचार करीत आहे. इरई नदीच्या काठावरील किल्ला परिसर विकसित करण्याचा विषय मुख्याधिकारी विपीन मुधा यांनी अग्रक्रमावर घेतला आहे. तसा प्रयत्न चंद्रपुरातही करता येणे शक्य आहे. चंद्रपूर येथील गोंडराजाच्या किल्ल्याचे अवशेष म्हणजे शहराच्या सभोवताल परकोट शाबूत आहे. पण या परकोटावरही काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. अनेक ठिकाणी परकोट उद्ध्वस्त झाल्याचा फायदा घेऊन परकोटाच्या भिंतीवर बांधकाम करण्यात आले आहे. त्याकडे पुरातत्व विभागाने साफ दुर्लक्ष चालविले आहे. किल्ल्यावरील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. चंद्रपूर मनपा अतिक्रमणधारकांकडून कर वसुली करून त्या अतिक्रमणाला वैधता प्राप्त करून देत आहे. पण मनपा व पुरातत्व विभागांनी ठरविले तर किल्ल्यातील अतिक्रमण थांबविणे शक्य आहे. किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा जपण्याचे काम चंद्रपूरचे नागरिकदेखील करू शकतात. नागरिकांनी आपापल्या परिसरातील अतिक्रमणाविरोधात आवाज उठविला तर चंद्रपूर महानगरपालिकेलाही त्याची दखल घ्यावी लागेल. शेवटी आपला इतिहास जपण्याची जबाबदारी तो इतिहास घडविणाऱ्या नागरिकांचीच असते, त्यांच्या वंशजांची असते. त्यामुळे नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आंबेकर ले-आऊट परिसरातील किल्ल्यावरील अतिक्रमणाविरोधात स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी पुरातत्व विभाग आणि चंद्रपूर मनपा आयुक्तांना नुकतेच निवेदन सादर केले आहे. निवेदनात नागरिकांनी चोर खिडकी ते पाण्याची टाकीपर्यंत ढासळलेल्या किल्ल्याची पुनर्बांधणी करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर आनंद कवाडे, जितेंद्र रायपुरे, मो. फारूख मो. हारूण, परवन नदीम शेख, वाय. के. यासन, वसीम जीना, अय्युब खान, तारिक अहमद आणि डॉ. इसादास भडके आदींच्या स्वाक्षरी आहे.