शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चंद्रपुरातील रस्त्यांवरील धुळीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 22:56 IST

शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मनपाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने मातीचा वापर केला. त्यामुळे रस्त्यावरुन वाहन गेल्यास मोठ्या प्रमाणात धुळ उडत आहे. परिणामी वाहनचालकांना समोरचे कोणतेही वाहन दिसत नसून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.मात्र याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देरस्त्याची दुरुस्ती करावी : खड्डे बुजविण्यासाठी मातीचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मनपाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने मातीचा वापर केला. त्यामुळे रस्त्यावरुन वाहन गेल्यास मोठ्या प्रमाणात धुळ उडत आहे. परिणामी वाहनचालकांना समोरचे कोणतेही वाहन दिसत नसून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.मात्र याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे.मागील महिन्यात चंद्रपुरात बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे चंद्रपुरातील रस्ते पुर्णपणे उखळले. त्यामुळे रामनगर पोलीस स्टेशन ते बंगाली कॅम्प, सावरकर चौक ते वाहतूक कार्यालय, जटपूरा गेट ते रामनगर, दवाबाजार ते पाण्याची टंकी, तुकूम येथील गुरुद्वारा रोड, दुर्गापूर, महाकाली मंदिर ते बाग्ला चौक, जिल्हाधिकारी कार्यालय ते दुध डेअरी, सपना टॉकीज ते रेल्वे स्टेशन आदी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले.या खड्यांमुळे मागील महिन्यात चंद्रपुरात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा बळी गेला. त्यानंतर मनपाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची मलमपट्टी सुरु केली. मात्र रस्त्यावर मातीमिश्रित साहित्याचा वापर केल्याने रस्त्यावरुन जळ वाहन गेल्यास मोठ्या प्रमाणात धुळ उडते.त्यामुळे त्या वाहनाच्या मागे असलेल्या वाहनचालक तसेच पदचाºयांना समोरचे काहीच दिसत नाही. परिणामी अपघाताची शक्यता आहे.चंद्रपूर जिल्हा पूर्वीच प्रदूषणयुक्त म्हणून ओळखला जातो. आता धुळीमुळे नागरिकांना विविध आजाराला समोर जावे लागत आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.श्वसनाच्या आजारात वाढशहरातील रस्त्यावर माती टाकल्याने वाहन गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असते. त्यामुळे नागरिकांना श्वसनाच्या विविध आजाराला सामोर जावे लागत आहे. चंद्रपूर जिल्हा प्रदूषणयुक्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पूर्वीच नागरिकांना विविध आजारांना सामोर जावे लागत आहेत. त्यातच आता मोठ्या प्रमाणात धुळ निघत असल्याने नागरिकांना आजार बळावण्याची शक्यता आहे.धुळीमधून कॉर्बन, हायड्रोकार्बन वातावरणात समाविष्ट होतात. त्यामुळे श्वसनलिकेला त्रास होत असतो. परिणामी अस्थमा, दमा, छातीमध्ये पाणी, सर्दी, खोकला, आदी रोग नागरिकांना होण्याची शक्यता असते.- मंगेश गुलवाडे,कान, नाक, घसा, रोग तज्ज्ञ, चंद्रपूर