शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

चंद्रपुरातील रस्त्यांवरील धुळीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 22:56 IST

शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मनपाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने मातीचा वापर केला. त्यामुळे रस्त्यावरुन वाहन गेल्यास मोठ्या प्रमाणात धुळ उडत आहे. परिणामी वाहनचालकांना समोरचे कोणतेही वाहन दिसत नसून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.मात्र याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देरस्त्याची दुरुस्ती करावी : खड्डे बुजविण्यासाठी मातीचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मनपाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने मातीचा वापर केला. त्यामुळे रस्त्यावरुन वाहन गेल्यास मोठ्या प्रमाणात धुळ उडत आहे. परिणामी वाहनचालकांना समोरचे कोणतेही वाहन दिसत नसून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.मात्र याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे.मागील महिन्यात चंद्रपुरात बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे चंद्रपुरातील रस्ते पुर्णपणे उखळले. त्यामुळे रामनगर पोलीस स्टेशन ते बंगाली कॅम्प, सावरकर चौक ते वाहतूक कार्यालय, जटपूरा गेट ते रामनगर, दवाबाजार ते पाण्याची टंकी, तुकूम येथील गुरुद्वारा रोड, दुर्गापूर, महाकाली मंदिर ते बाग्ला चौक, जिल्हाधिकारी कार्यालय ते दुध डेअरी, सपना टॉकीज ते रेल्वे स्टेशन आदी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले.या खड्यांमुळे मागील महिन्यात चंद्रपुरात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा बळी गेला. त्यानंतर मनपाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची मलमपट्टी सुरु केली. मात्र रस्त्यावर मातीमिश्रित साहित्याचा वापर केल्याने रस्त्यावरुन जळ वाहन गेल्यास मोठ्या प्रमाणात धुळ उडते.त्यामुळे त्या वाहनाच्या मागे असलेल्या वाहनचालक तसेच पदचाºयांना समोरचे काहीच दिसत नाही. परिणामी अपघाताची शक्यता आहे.चंद्रपूर जिल्हा पूर्वीच प्रदूषणयुक्त म्हणून ओळखला जातो. आता धुळीमुळे नागरिकांना विविध आजाराला समोर जावे लागत आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.श्वसनाच्या आजारात वाढशहरातील रस्त्यावर माती टाकल्याने वाहन गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असते. त्यामुळे नागरिकांना श्वसनाच्या विविध आजाराला सामोर जावे लागत आहे. चंद्रपूर जिल्हा प्रदूषणयुक्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पूर्वीच नागरिकांना विविध आजारांना सामोर जावे लागत आहेत. त्यातच आता मोठ्या प्रमाणात धुळ निघत असल्याने नागरिकांना आजार बळावण्याची शक्यता आहे.धुळीमधून कॉर्बन, हायड्रोकार्बन वातावरणात समाविष्ट होतात. त्यामुळे श्वसनलिकेला त्रास होत असतो. परिणामी अस्थमा, दमा, छातीमध्ये पाणी, सर्दी, खोकला, आदी रोग नागरिकांना होण्याची शक्यता असते.- मंगेश गुलवाडे,कान, नाक, घसा, रोग तज्ज्ञ, चंद्रपूर