शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

भूकंपाने नागरिक धास्तावले

By admin | Updated: December 20, 2014 00:55 IST

वेळ सकाळी सव्वा नऊची. नागरिक आपापल्या कामात व्यस्त असताना अचानक भूगर्भातून विचित्र आवाज येऊ लागला.

नागभीड : वेळ सकाळी सव्वा नऊची. नागरिक आपापल्या कामात व्यस्त असताना अचानक भूगर्भातून विचित्र आवाज येऊ लागला. सोबतच मोबाईलच्या व्हॉयब्रेशनसारखा आवाज येऊन जमीन थरथरायला लागली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीची लाट पसरली. हा भूकंपाचा धक्का असल्याचे लक्षात येताच सर्वच घाबरून घराबाहेर पडू लागले. एकाचवेळी अनेक गावांत असा प्रकार घडल्याने याची वार्ता क्षणार्धात तालुक्यात तर काही वेळातच जिल्ह्यात पसरली. विशेष म्हणजे, प्रशासकीय यंत्रणेने हा भूकंपाचाच सौम्य धक्का असल्याचे मान्य केले असले तरी खगोल अभ्यासक भूगर्भात खडक फुटून भेगा पडतात व त्यामुळे असा प्रकार घडत असतो, असे सांगत आहे. याबाबत अद्याप कुणीही स्पष्ट सांगायला तयार नाही. असे असले तरी नागरिक या घटनेमुळे कमालीचे दहशतीत होते. रात्री उशिरा असा प्रकार तर घडणार नाही ना, अशी भीतीही नागरिकांच्या मनात कायम होती. ॉनागभीड तालुक्यातील नागभीड, भिकेश्वर, नवखळा, चिखल परसोडी, मांगली, बाम्हणी, मिंथूर, मिंडाळा, नवेगाव पांडव या गावात भूकंपाचा धक्का जाणवला. नेहमीप्रमाणे नागरिक आपल्या कामात व्यस्त असताना भूगर्भातून अचानक आवाज यायला लागला. प्रारंभी नागरिकांनी याकडे लक्ष दिले नाही. काही नागरिक कामात व्यस्त असल्याने त्यांना हा प्रकार लक्षात आला नाही. त्यानंतर व्हायब्रेशनवर असलेल्या मोबाईल सारखा आवाज होऊन जमीन क्षणभर थरथरायला लागली. नागभीड, भिकेश्वर, मांगली, मिंथूर या गावात तर भिंती हलल्याचा अनेकांना अनुभव आला. त्यानंतर मात्र हा प्रकार गंभीर असल्याचे लक्षात येताच नागरिक चांगलेच घाबरले. आपापली नियोजित कामे सोडून अनेकजण घराबाहेर पडले. संपूर्ण गावातच हा प्रकार जाणवल्याने हे भुकंपाचे धक्केच असावेत, यावर सर्वांचा विश्वास बसला. काही वेळानंतर तालुक्यातील दहा ते बारा गावात असाच अनुभव आल्याने नागरिकात दहशत पसरली. रिस्टर स्केलवर याची नोंद करण्यात आली नसली तरी रिस्टर स्केलप्रमाणे दोनपर्यंत याची तिव्रता असावी, असे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याबाबत नागभीडचे तहसीलदार श्रीराम मुंधडा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या भूकंपाचा केंद्रबिंदू नागपूरपासून ८६ किमी अंतरावर उत्तरेला असल्याचे सांगितले. त्याचा अक्षांश २१.४८.२ तर रेखांश ७८.२९.४ आहे. नागभीडचा अक्षांश २०.३४.४८ तर रेखांश ७९.४१.१ असा आहे. (तालुका प्रतिनिधी)रात्री उशिरापर्यंत भूकंपाचीच चर्चासकाळी सव्वा नऊ वाजताच्या दरम्यान सर्वप्रथम भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर दुपारी असा प्रकार घडला नाही. मात्र नागभीडसह तालुक्यातील बहुतांश गावात हे धक्के जाणवल्याने संपूर्ण तालुक्यातच दिवसभर भूकंपाचीच चर्चा होती. भूकंप कसा होतो, भूकंपाने काय हानी होऊ शकते, यापूर्वी मोठा भूकंप कुठे आला होता, याची चर्चा पानटपरी व चौकाचौकामध्ये सुरू असल्याचे दिसून आले. रात्री झोपेत पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले तर, या भीतीने रात्री उशिरापर्यंत नागरिक दहशतीतच होते.