शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

भूकंपाने नागरिक धास्तावले

By admin | Updated: December 20, 2014 00:55 IST

वेळ सकाळी सव्वा नऊची. नागरिक आपापल्या कामात व्यस्त असताना अचानक भूगर्भातून विचित्र आवाज येऊ लागला.

नागभीड : वेळ सकाळी सव्वा नऊची. नागरिक आपापल्या कामात व्यस्त असताना अचानक भूगर्भातून विचित्र आवाज येऊ लागला. सोबतच मोबाईलच्या व्हॉयब्रेशनसारखा आवाज येऊन जमीन थरथरायला लागली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीची लाट पसरली. हा भूकंपाचा धक्का असल्याचे लक्षात येताच सर्वच घाबरून घराबाहेर पडू लागले. एकाचवेळी अनेक गावांत असा प्रकार घडल्याने याची वार्ता क्षणार्धात तालुक्यात तर काही वेळातच जिल्ह्यात पसरली. विशेष म्हणजे, प्रशासकीय यंत्रणेने हा भूकंपाचाच सौम्य धक्का असल्याचे मान्य केले असले तरी खगोल अभ्यासक भूगर्भात खडक फुटून भेगा पडतात व त्यामुळे असा प्रकार घडत असतो, असे सांगत आहे. याबाबत अद्याप कुणीही स्पष्ट सांगायला तयार नाही. असे असले तरी नागरिक या घटनेमुळे कमालीचे दहशतीत होते. रात्री उशिरा असा प्रकार तर घडणार नाही ना, अशी भीतीही नागरिकांच्या मनात कायम होती. ॉनागभीड तालुक्यातील नागभीड, भिकेश्वर, नवखळा, चिखल परसोडी, मांगली, बाम्हणी, मिंथूर, मिंडाळा, नवेगाव पांडव या गावात भूकंपाचा धक्का जाणवला. नेहमीप्रमाणे नागरिक आपल्या कामात व्यस्त असताना भूगर्भातून अचानक आवाज यायला लागला. प्रारंभी नागरिकांनी याकडे लक्ष दिले नाही. काही नागरिक कामात व्यस्त असल्याने त्यांना हा प्रकार लक्षात आला नाही. त्यानंतर व्हायब्रेशनवर असलेल्या मोबाईल सारखा आवाज होऊन जमीन क्षणभर थरथरायला लागली. नागभीड, भिकेश्वर, मांगली, मिंथूर या गावात तर भिंती हलल्याचा अनेकांना अनुभव आला. त्यानंतर मात्र हा प्रकार गंभीर असल्याचे लक्षात येताच नागरिक चांगलेच घाबरले. आपापली नियोजित कामे सोडून अनेकजण घराबाहेर पडले. संपूर्ण गावातच हा प्रकार जाणवल्याने हे भुकंपाचे धक्केच असावेत, यावर सर्वांचा विश्वास बसला. काही वेळानंतर तालुक्यातील दहा ते बारा गावात असाच अनुभव आल्याने नागरिकात दहशत पसरली. रिस्टर स्केलवर याची नोंद करण्यात आली नसली तरी रिस्टर स्केलप्रमाणे दोनपर्यंत याची तिव्रता असावी, असे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याबाबत नागभीडचे तहसीलदार श्रीराम मुंधडा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या भूकंपाचा केंद्रबिंदू नागपूरपासून ८६ किमी अंतरावर उत्तरेला असल्याचे सांगितले. त्याचा अक्षांश २१.४८.२ तर रेखांश ७८.२९.४ आहे. नागभीडचा अक्षांश २०.३४.४८ तर रेखांश ७९.४१.१ असा आहे. (तालुका प्रतिनिधी)रात्री उशिरापर्यंत भूकंपाचीच चर्चासकाळी सव्वा नऊ वाजताच्या दरम्यान सर्वप्रथम भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर दुपारी असा प्रकार घडला नाही. मात्र नागभीडसह तालुक्यातील बहुतांश गावात हे धक्के जाणवल्याने संपूर्ण तालुक्यातच दिवसभर भूकंपाचीच चर्चा होती. भूकंप कसा होतो, भूकंपाने काय हानी होऊ शकते, यापूर्वी मोठा भूकंप कुठे आला होता, याची चर्चा पानटपरी व चौकाचौकामध्ये सुरू असल्याचे दिसून आले. रात्री झोपेत पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले तर, या भीतीने रात्री उशिरापर्यंत नागरिक दहशतीतच होते.