शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

नागरिकांनो, मत हे दुधारी तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:24 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव गावागावात आहे. श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून हजारो नागरिक जनसेवेसाठी योगदान देत आहेत. ...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव गावागावात आहे. श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून हजारो नागरिक जनसेवेसाठी योगदान देत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात ग्रामगीता ग्रंथाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. राष्ट्रसंतांनी भारतीय मतदारांना लोकशाहीची शिकवण दिली. मतदारांनी आपल्या एका अमूल्य मताची किंमत ओळखून निवडणुकीतील योग्य उमेदवाराची निवड करावी, यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून मोलाचे मार्गदर्शन केले आहे.

भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे ।

आपुल्या मनावरीच साचे।

एकेक मत लाख मोलाचे।

ओळखावे याचे महिमान।।

मत हे दुधारी तलवार।

उपयोग न केला बरोबर।

तरी आपलाची उलटतो वार।

निवडणूक नव्हे बाजार- चुणूक।

निवडणूक ही संधी अचूक।

भवितव्याची।।

निवडणूक जणू स्वयंवर।

ज्या हाती देणे जीवनाचे बागडोर।

त्यासी लावावी कसोटी सुंदर।

सावधपणे।।

सर्व मतदारांनी मतदानाच्या हक्काचे महत्त्व ओळखायला हवे. मताधिकारामुळे भारताची लोकशाही जिवंत राहू शकते. त्यासाठी योग्य व सक्षम उमेदवाराची निवड करावी. आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ग्रंथातून केले आहे. मतदानाचा योग्य वापर न केल्यास भविष्यात संकटांचा सामना करावा लागेल, गावाची दुर्दशा होईल, गाव विकासापासून मागे पडले, असा इशाराही राष्ट्रसंतांनी मतदारांना दिला आहे.