शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

नागरिकांनो, मत हे दुधारी तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:24 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव गावागावात आहे. श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून हजारो नागरिक जनसेवेसाठी योगदान देत आहेत. ...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव गावागावात आहे. श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून हजारो नागरिक जनसेवेसाठी योगदान देत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात ग्रामगीता ग्रंथाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. राष्ट्रसंतांनी भारतीय मतदारांना लोकशाहीची शिकवण दिली. मतदारांनी आपल्या एका अमूल्य मताची किंमत ओळखून निवडणुकीतील योग्य उमेदवाराची निवड करावी, यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून मोलाचे मार्गदर्शन केले आहे.

भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे ।

आपुल्या मनावरीच साचे।

एकेक मत लाख मोलाचे।

ओळखावे याचे महिमान।।

मत हे दुधारी तलवार।

उपयोग न केला बरोबर।

तरी आपलाची उलटतो वार।

निवडणूक नव्हे बाजार- चुणूक।

निवडणूक ही संधी अचूक।

भवितव्याची।।

निवडणूक जणू स्वयंवर।

ज्या हाती देणे जीवनाचे बागडोर।

त्यासी लावावी कसोटी सुंदर।

सावधपणे।।

सर्व मतदारांनी मतदानाच्या हक्काचे महत्त्व ओळखायला हवे. मताधिकारामुळे भारताची लोकशाही जिवंत राहू शकते. त्यासाठी योग्य व सक्षम उमेदवाराची निवड करावी. आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ग्रंथातून केले आहे. मतदानाचा योग्य वापर न केल्यास भविष्यात संकटांचा सामना करावा लागेल, गावाची दुर्दशा होईल, गाव विकासापासून मागे पडले, असा इशाराही राष्ट्रसंतांनी मतदारांना दिला आहे.