शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

देशमुखगुड्यातील नागरिकांनी भीतीपोटी सणाकडे फिरविली पाठ

By admin | Updated: August 21, 2015 01:18 IST

वाढत्या डासांमुळे आणि हातपंपातील दूषित पाण्यामुळे देशमुखगुडा गावात गेल्या १५ दिवसांपासून हिवतापाच्या साथीने अख्खे गावच बेजार झाले आहे.

गावात सर्वाधिक मलेरियाचे रुग्ण : शाळकरी मुलीचा बळी गेल्याने पसरली दहशत

लोकमतआॅन द स्पॉटशंकर चव्हाण/संघरक्षित तावाडे जिवतीवाढत्या डासांमुळे आणि हातपंपातील दूषित पाण्यामुळे देशमुखगुडा गावात गेल्या १५ दिवसांपासून हिवतापाच्या साथीने अख्खे गावच बेजार झाले आहे. याच आजाराची लागण होऊन एका शाळकरी मुलीचा बळी गेल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्षातून एकदा येणारा सणही आम्ही आनंदाने साजरा करू शकलो नाही, अशी खंत देशमुखगुड्यातील नागरिक डोळ्यात अश्रू आणून व्यक्त करीत होते. लोकप्रतिनिधी व प्रशासनाविषयी त्यांच्या मनात संताप दिसून आला. टेकामांडवा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या देशमुखगुडा गावची लोकसंख्या केवळ ७० असून १२ घरांची वस्ती आहे. हिमायतनगरपासून दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या या छोट्याशा वस्तीत गेल्या १५ दिवसांपासून मलेरिया या आजाराने नागरिक बेजार झाले आहेत. या गावात आरोग्याच्या कोणत्याही सोयीसुविधा नसून आरोग्य कर्मचारीही कधीच गावात येत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. ग्रामसेवक तर गेल्या वर्षापासून गावात आलाच नाही. येथील लोकांना ये-जा करण्यासाठी पक्क्या रस्त्याची व वाहनाची सोय नाही. आजारी रुग्णांना उपचारासाठी घेवून जाताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. आजही गावात धुरपताबाई शिवशंकर दुधभाते (४०), अर्चना शिवशंकर दुधभाते (१५), सविता नानासाहेब देशमुख (४०), नितीन नानासाहेब देशमुख (१२), खेडू माणिकराव देशमुख (४०), भाग्यश्री खेडेराव देशमुख (१५), शिला खंडेराव देशमुख (३५), राजश्री गोपाळ देशमुख (६), सुमनबाई शहाजीराव देशमुख (५०), मेघराज खंडेराव देशमुख (१३), आशा शिवशंकर दुधभाते (९), विष्णू शिवशंकर दुधभाते (८), पल्लवी गंगाधर दुधभाते (९), पूजा गंगाधर दुधभाते (१०), महेश गोपाळ देशमुख ९५), जनाबाई शहाजी चौधरी (४५), नंदा विश्वनाथ देशमुख (३५), नानासाहेब पांडुरंग देशमुख (४५), विद्या घुले (५५) यांना मलेरियाची लागण झाली आहे. यामुळे गावातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. गावातील पथदिवेही पडले बंदपावसाळ्यामुळे गावात केरकचरा व गवताचे प्रमाण वाढले असुन गावालगतच शेती आहे. त्यामुळे या गावात प्रत्येक दिवशी विद्युत पुरवठा असणे आवश्यक आहे. मात्र संबंधित ग्रामपंचायतीकडून याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. दिवाळीला लावलेले पथदिवे खराब झाले. आता येणाऱ्या दिवाळीतच पथदिवे लावणार काय? असा गावकऱ्यांचा सवाल आहे. घर टॅक्स भरण्यासाठी ग्रामपंचायतीकडून नेहमीच सक्ती केली जाते. या गावातून शंभर टक्के घर टॅक्स वसुल केल्या जातो. मग आमच्या समस्या सोडविण्याकडे का दुर्लक्ष केले जाते, असाही त्यांचा प्रश्न आहे. रक्त तपासणी करून आरोग्य विभागाची चमू परतलीदेशमुखगुड्यात आजाराचे थैमान, असे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच, आरोग्य विभागाची चमू गावात पोहोचली. रुग्णांच्या रक्ताची तपासणी केली. त्यात २० ते २२ जणांना मलेरिया आजाराने ग्रासले असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना गोळ्या देवून चमू परत गेली. ब्लिचिंग पावडरचा वापरच नाहीपावसाळ्याच्या दिवसांत दोन ते तीन दिवसाआड पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतात ब्लिचिंग पावडर टाकावे लागते. मात्र ग्रामपंचायतीने त्याकडे कमालिचे दुर्लक्ष केल्याने पिण्यायोग्य असलेले पाणीही दूषित झाले. त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे. आजुबाजूची घाण, केरकचरा यामुळे डासाचे प्रमाण वाढले आहे. याबाबत ग्रामसेवकाशी दूरध्वनीवर संपर्क केला असता, ते म्हणाले, ब्लिचिंग पावडर आम्ही गावात पाठवितो. परंतु ते टाकत नसतील त्याला आम्ही काय करणार. आज पुन्हा मी आमच्या कर्मचाऱ्याला ब्लिचिंग पावडर घेवून पाठवित आहे, असे त्यांनी सांगितले. सणावर आली संक्रांतसर्वत्र मोठ्या उत्साहाने आणि पारंपारिक पद्धतीने नागपंचमीचा सण आणि नागोबाजी पूजा केली जात असताना देशमुखगुडा गावात स्मशान शांतता होती. नागपंचमी सणही साजरा करता आला नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितेल. १९ आॅगस्ट रोजी देशमुखगुडा गावात भेट देऊन आजारी रुग्णांची रक्त तपासणी केली. तसेच मृत मुलीच्या वडिलांची भेट घेतली. सदर मुलीला आठ दिवसांपासून ताप येत होता. उपचारासाठी जवळच्या शेणगाव येथील खासगी दवाखान्यात नेले होते. मात्र तिच्यावर योग्य उपचार न झाल्याने ती दगावल्याचे समजते. आमचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी वेळीच गाव भेटी केली असती तर ही घटना टळली असती. आम्ही संबंधित कर्मचाऱ्यांना सतत गाव भेटी करण्यासाठी पत्र दिले असुन आम्ही त्या गावात पुन्हा जाणार आहोत.- डॉ. के.जी. कोरडे, आरोग्य अधिकारी, जिवती