शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

बंदीवानातून राष्ट्रोत्कर्षाला अपेक्षित नागरिक घडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 22:48 IST

जगातील सर्वात मोठी लोकशाही राज्यपध्दती असलेल्या भारत देशात संविधानाने सर्वांना समान अधिकार बहाल केल्यानंतरही कुणी मुक्त तर कुणी बंदीवानाचे जीवन का जगतो, याबाबत चिंतनाची गरज आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : चंद्रपूर जिल्हा कारागृहात सत्कार कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जगातील सर्वात मोठी लोकशाही राज्यपध्दती असलेल्या भारत देशात संविधानाने सर्वांना समान अधिकार बहाल केल्यानंतरही कुणी मुक्त तर कुणी बंदीवानाचे जीवन का जगतो, याबाबत चिंतनाची गरज आहे. संयम गमावला, क्रोधावर मात करण्यास अपयश आले हेतुत: गुन्हा घडला किंबहुना अजानतेपणी अपराध झाला, यासाठी शिक्षा ही ठरलीच आहे. त्यामुळे क्रोधावर नियंत्रण व सद्सदविवेकी वर्तणूकीतून गुन्हेगारीवर मात करावी, व राष्ट्राच्या उत्कर्षाला हातभार लावणारे नागरिक आपल्यामधून घडावे, अशी भावना केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा कारागृहात कार्यक्रम पार पडला. यावेळी उत्कृष्ठ कामगीरी बजाविणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आ. नाना श्यामकुळे, अ‍ॅड. दत्ता हजारे, नगरसेविका शितल कुळमेथे, कारागृह अधीक्षक वैभव आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते.अहीर पुढे म्हणाले, काश्मिर वगळता देशातील सर्वांना कुठेही नोकरी व्यवसाय करण्याची, मुक्त जीवन, संचाराची मुभा आहे. असे असतांना आपण बंदीवानांचे जीवन का जगतो आहे, असा मनाशी विचार करण्याचा चिंतनाचा हा पवित्रा दिवस आहे असे ते म्हणाले.भारत देश अनेक महान विभुंतीच्या परिसस्पर्शाने कर्तृत्वाने पुणीत झालेला आहे. इथे राम, श्रीकृष्ण, भगवान बुध्द, महावीर, गुरूनानक जन्मले त्यांची वाणी आणि विचारातून हा देश घडला आहे. त्यांच्या विचारवाणीतून अपराध मुक्त भारताची संकल्पना साकार करण्याचा प्रयत्न संकल्प प्रत्येक व्यक्तीने केला तर देशाचे स्वरूप बदलेल असे ते म्हणाले. आजच्या दिवशी प्रत्येक बंदीवान बांधवांनी प्रण करावा की, दुसºयांदा या ठिकाणी येवू तर जीवनमुल्ये शिकविणारे मार्गदर्शक म्हणूनच येऊ, असे आवाहन केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.