शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

बोंड अळीच्या जागृतीसाठी निघाला चित्ररथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 22:44 IST

गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता मागील काही दिवसांपासून व्यक्त होत आहेत. तसेच काही ठिकाणी ही अळी आढळून येत असल्याबाबतच्या सूचनाही कृषी विभागाला मिळाल्या आहेत.

ठळक मुद्देउदय पाटील : गुलाबी बोंड अळीवर वेळीच फवारणी करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता मागील काही दिवसांपासून व्यक्त होत आहेत. तसेच काही ठिकाणी ही अळी आढळून येत असल्याबाबतच्या सूचनाही कृषी विभागाला मिळाल्या आहेत. त्यामुळे सोमवारी बोंडअळी संदर्भातील जनजागरण करणाऱ्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. कापसाच्या पिकाला पाती लागायला सुरूवात झाल्यावर किंवा ४५ दिवसांनंतर गुलाबी बोंड अळीचे पतंगाचे पाहणी करुन फवारणी करावी, असे आवाहन जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी यावेळी केले.राज्य शासनाच्यामार्फत गुलाबी बोंड अळी पासून कपासीचे संरक्षण व्हावे, यासाठी अनेक मोहिम राबवली जात आहे. यासाठी सर्वत्र जनजागरण करण्यात येत आहे. मागील वर्षी कपाशीचे पीक घेऊ नये, अशा पद्धतीचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले होते. तरीही अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी आपल्या जमिनीमध्ये लाखो हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी केलेली आहे. मात्र आता पेरणी केल्यानंतर ४० ते ४५ दिवसांच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात लक्ष ठेवण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केलेले आहे. जर पाती लागायला सुरुवात झाली असेल आणि ४५ दिवसांनंतर गुलाबी बोंडअळीच्या पतंगाची अस्तित्व दिसून येत असेल तर फवारणी करणे आवश्यक आहे. यासाठी प्रति लिटर पाण्यामध्ये २ मिलीलीटर क्वीनॉलफॉस, थायोडीकार्ब, क्लोरोपायरी फॉस, सायपरमेथ्रीन आदी किटकनाशके योग्य प्रमाणात वापरावे, असे आवाहन त्यांनी केले.शेतकऱ्यांना जागृत करण्यात जिल्हाभरात चित्ररथाच्यामार्फत गुलाबी बोंड अळीची ओळख व जीवनक्रम याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. नागरिकांनी आपल्या गावामध्ये येणाऱ्या चित्ररथाचे स्वागत करावे, जनजागृतीसाठी वाटण्यात येणाºया पत्रकांतून गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाबाबत निर्णय घ्यावा, अशा सूचनाही कृषी विभागाकडून करण्यात आल्या.फवारणी करताना काळजी घ्याशासनाने शिफारस केलेलीच कीटकनाशके परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, तसेच त्याची काळजीपूर्वक फवारणी करवी, मागील वर्षी यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी कीटकनाशकांमुळे विषबाधा झाल्याचे अनेक दुर्घटना घडल्या होत्या. या दुर्घटना टाळण्यासाठी फवारणी करताना संरक्षक पोषाख, बूट हातमोजे, नाकावरील मास्कचा वापर करावा, अशा सूचनाही दिल्या.