शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

हजार वर्षांपेक्षा अधिक काळ टिकते चिरान सागवान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2023 20:44 IST

Chandrapur News चिरान सागवानाची लाकडे ही तब्बल एक हजार वर्ष टिकत असल्याने त्यांची निवड अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाकरिता करण्यात आली आहे.

चंद्रपूर : सुमारे एक हजार वर्ष श्रीराम मंदिराची वास्तू उभी राहावी या अनुषंगाने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला मंदिराचे महाद्वार, गर्भगृहाचा दरवाजा, मुख्य मंदिर वास्तूतील इतर दरवाजे, यासाठी देशातील सर्वोत्तम सागवान लाकडाची गरज आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेन्द्र मिश्र यांनी उत्तराखंडमधील डेहरादून येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटशी संपर्क साधल्यानंतर त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान भारतात सर्वोत्कृष्ट असल्याचे सांगण्यात आले. चंद्रपूर येथील सागवान काष्ठाच्या काही नमुन्यांची ट्रस्टचे अभियंता तथा लार्सन ॲन्ड टुब्रो टीसीईच्या अभियंत्यांनी चाचणी घेतली. चाचणीत हे काष्ठ सर्वोत्तम असल्याचे सिद्ध झाल्यानंतर मंदिर निर्माण समितीने ना. मुनगंटीवार यांच्याकडे पत्राद्वारे फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडच्या डेपोतून चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान काष्ठ पुरविण्याची मागणी केली. ना. मुनगंटीवार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.

हजार ८५० घनफूट लाकडाचा करार...

राम मंदिराचे बांधकाम करणाऱ्या एल अँड टी कंपनीच्या तज्ज्ञांनी वनविकास महामंडळाच्या बल्लारपूर तसेच आलापल्ली येथील डेपाेत नोव्हेंबर २०२२ रोजी जाऊन तेथील लाकडांची पाहणी केली. १ हजार ८५४ घनफूट चिरान सागवान लाकूड खरेदीचा करार वनविकास महामंडळाशी केला. या लाकडाची किंमत एक कोटी ३१ लाख ३१ हजार ८५० रुपये आहे. कटाई केलेल्या लाकडाची पहिली खेप बुधवार, २९ मार्च २०२३ रोजी बल्लारशाह वनविकास महामंडळाच्या डेपोतून रवाना होऊन येथीलच वनविभागाच्या काष्ट भांडारात विधिवत पूजन करून रवाना करण्यात आली. उरलेले लाकूड येथून पुढे टप्प्या-टप्प्याने पाठविले जाणार आहे.

प्रत्येक लाकडावर ‘श्रीराम’

गडचिरोली जिल्ह्याच्या आलापल्ली येथे आलेल्या प्रत्येक लठ्ठा (पूर्ण लाकूड)वर श्रीराम असे लिहिलेले होते. आराम मशीनवर लहान स्वरूपात कटाई केल्यानंतर आता प्रत्येक साइजवर श्रीराम असे लिहिण्यात आले आहे. श्रीराम मंदिर बांधण्यासाठी आपल्या हातून अयोध्येला लाकूड जात असल्याचे समाधान तेथील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. बल्लारपूर येथील वनविभागाचा काष्ट भांडार परिसर व भिंती विविध चित्रांनी सजविण्यात आल्या होत्या.

...असा असेल लाकडांचा प्रवास

बल्लारपुरातून रवाना होणारे लाकूड थेट अयोध्येला न नेता प्रथम नागपूरला नेण्यात येईल. तेथे लाकडांवर प्रक्रिया करून त्यातील अनावश्यक पाणी बाहेर काढण्यात येणार आहे. तेथून हैदराबाद किंवा गुजरात येथे नेल्यानंतर त्यावर नक्षीकाम होईल. त्यानंतर हे लाकूड अयोध्या येथे नेण्यात येणार आहे.

सेंट्रल व्हिस्टामध्ये चंद्रपुरातील सागवान काष्ठ

दिल्लीतील नवे संसद भवन सेंट्रल व्हिस्टासाठीही या सागवान लाकडाची निवड करण्यात आली होती. त्यानंतर आता राम मंदिरासाठीही याच लाकडाची निवड झाली आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्या