शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

हजार वर्षांपेक्षा अधिक काळ टिकते चिरान सागवान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2023 20:44 IST

Chandrapur News चिरान सागवानाची लाकडे ही तब्बल एक हजार वर्ष टिकत असल्याने त्यांची निवड अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाकरिता करण्यात आली आहे.

चंद्रपूर : सुमारे एक हजार वर्ष श्रीराम मंदिराची वास्तू उभी राहावी या अनुषंगाने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला मंदिराचे महाद्वार, गर्भगृहाचा दरवाजा, मुख्य मंदिर वास्तूतील इतर दरवाजे, यासाठी देशातील सर्वोत्तम सागवान लाकडाची गरज आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेन्द्र मिश्र यांनी उत्तराखंडमधील डेहरादून येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटशी संपर्क साधल्यानंतर त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान भारतात सर्वोत्कृष्ट असल्याचे सांगण्यात आले. चंद्रपूर येथील सागवान काष्ठाच्या काही नमुन्यांची ट्रस्टचे अभियंता तथा लार्सन ॲन्ड टुब्रो टीसीईच्या अभियंत्यांनी चाचणी घेतली. चाचणीत हे काष्ठ सर्वोत्तम असल्याचे सिद्ध झाल्यानंतर मंदिर निर्माण समितीने ना. मुनगंटीवार यांच्याकडे पत्राद्वारे फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडच्या डेपोतून चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान काष्ठ पुरविण्याची मागणी केली. ना. मुनगंटीवार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.

हजार ८५० घनफूट लाकडाचा करार...

राम मंदिराचे बांधकाम करणाऱ्या एल अँड टी कंपनीच्या तज्ज्ञांनी वनविकास महामंडळाच्या बल्लारपूर तसेच आलापल्ली येथील डेपाेत नोव्हेंबर २०२२ रोजी जाऊन तेथील लाकडांची पाहणी केली. १ हजार ८५४ घनफूट चिरान सागवान लाकूड खरेदीचा करार वनविकास महामंडळाशी केला. या लाकडाची किंमत एक कोटी ३१ लाख ३१ हजार ८५० रुपये आहे. कटाई केलेल्या लाकडाची पहिली खेप बुधवार, २९ मार्च २०२३ रोजी बल्लारशाह वनविकास महामंडळाच्या डेपोतून रवाना होऊन येथीलच वनविभागाच्या काष्ट भांडारात विधिवत पूजन करून रवाना करण्यात आली. उरलेले लाकूड येथून पुढे टप्प्या-टप्प्याने पाठविले जाणार आहे.

प्रत्येक लाकडावर ‘श्रीराम’

गडचिरोली जिल्ह्याच्या आलापल्ली येथे आलेल्या प्रत्येक लठ्ठा (पूर्ण लाकूड)वर श्रीराम असे लिहिलेले होते. आराम मशीनवर लहान स्वरूपात कटाई केल्यानंतर आता प्रत्येक साइजवर श्रीराम असे लिहिण्यात आले आहे. श्रीराम मंदिर बांधण्यासाठी आपल्या हातून अयोध्येला लाकूड जात असल्याचे समाधान तेथील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. बल्लारपूर येथील वनविभागाचा काष्ट भांडार परिसर व भिंती विविध चित्रांनी सजविण्यात आल्या होत्या.

...असा असेल लाकडांचा प्रवास

बल्लारपुरातून रवाना होणारे लाकूड थेट अयोध्येला न नेता प्रथम नागपूरला नेण्यात येईल. तेथे लाकडांवर प्रक्रिया करून त्यातील अनावश्यक पाणी बाहेर काढण्यात येणार आहे. तेथून हैदराबाद किंवा गुजरात येथे नेल्यानंतर त्यावर नक्षीकाम होईल. त्यानंतर हे लाकूड अयोध्या येथे नेण्यात येणार आहे.

सेंट्रल व्हिस्टामध्ये चंद्रपुरातील सागवान काष्ठ

दिल्लीतील नवे संसद भवन सेंट्रल व्हिस्टासाठीही या सागवान लाकडाची निवड करण्यात आली होती. त्यानंतर आता राम मंदिरासाठीही याच लाकडाची निवड झाली आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्या