शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

चिमूरला अतिरिक्त जिल्हाधिकारी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:48 IST

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात चिमूरची क्रांती सुवर्ण अक्षराने नोंदविली आहे. पारतंत्रातही स्वातंत्र्याचा पहिला झेंडा चिमूरमध्ये फडकला.

ठळक मुद्देशहीद स्मृती दिन सोहळा २०१७ : श्रद्धांजलीसाठी लक्षणीय गर्दीक्षणचित्रेअभ्यंकर मैदानात शहीद बालाजी रायपूरकर, नागफणा हुतात्मा स्मारकाला मुख्यमंत्री व इतर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले.शासकीय हुतात्मा स्मारक येथे मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण.मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते विविध कामाचे ई-भूमिपूजनभिसी व तळोधी येथील अतिरिक्त तहसील कार्यालयाचे उद्घाटनकार्यक्रमाला जिल्हाभरातून लाखोंची उपस्थिती३० ट्रॅक्टर, पाच ई-रिक्षांचे वाटपशहीद बालाजी रायपूरकर परिवारातील नातेवाईकांचा मुख्यमंत्री व पाहुण्यांच्या हस्ते सत्कार.

राजकुमार चुनारकर/अमोद गौरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात चिमूरची क्रांती सुवर्ण अक्षराने नोंदविली आहे. पारतंत्रातही स्वातंत्र्याचा पहिला झेंडा चिमूरमध्ये फडकला. यासाठी कित्येक लोक शहीद झाले. या शहिदांना व स्वातंत्र्यविरांना नमन करण्यासाठी आलो असून चिमूरमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीे.चिमूर क्रांती शहिदांना विनम्र श्रद्धांजली वाहण्यासाठी या क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी आयोजीत केलेल्या शहीद स्मृती दिन सोहळा २०१७ या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास व वन राज्यमंत्री अम्बरीशराव आत्राम, खा. अशोक नेते, आ. मितेश भांगडिया, आ. नाना श्यामकुळे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, माजी राज्यमंत्री संजय देवतळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, उपाध्यक्ष कृष्णाजी सहारे, चिमूरच्या नगराध्यक्ष शिल्पा राचलवार आदी उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशाचा राष्ट्रीय प्रकल्प असलेला गोसेखुर्द प्रकल्प काँग्रेसच्या कार्यकाळात सुरू करण्यात आला. तेव्हा या प्रकल्पाची किंमत ३७२ हजार कोटी होती. मात्र आज या गोसेखुर्द प्रकल्पाची किंमत १८ हजार ७४९ कोटी झाली आहे. हा प्रकल्प हनुमानाच्या शेपटीप्रमाणे सपंतच नव्हता. मात्र आमच्या सरकारने हा प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करून विदर्भातील इतर सिंचन प्रकल्पही पूर्ण करण्याचा विडा उचलला आहे.चिमूर येथील क्रांतीकारकांनी केलेली क्रांती भारत कधीही विसरणार नाही. कारण या भूमीने देशात प्रथम तिरंगा फ डकाविण्याचा मान मिळविला आहे. क्रांती काय असते, हे चिमूरकरांनी दाखवून दिले आहे. देशाला स्वराज्य मिळाले. मात्र सुराज्य प्राप्त झाले नाही. जोपर्यंत सुराज्य प्राप्त होणार नाही, तोपर्यंत हा लढा सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले.यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चिमूर शहीद स्मृती दिन संकल्प दिवस आहे. मागील सरकारने जे प्रश्न निर्माण केलेत, त्यांना चले जाव म्हणण्याची वेळ आली आहे. आम्ही सत्तेवर प्रेम करणारे नाही तर सत्यावर प्रेम करणारे आहोत. यावेळी ना.गिरीष महाजन, खासदार अशोक नेते, आमदार मितेश भांगडीया, आमदार किर्तीकुमार भांगडीया यांची समायोजित भाषणे झाली.